एक्स्प्लोर

Solar Eclipse : रविकिरणांच्या सावलीचा वैज्ञानिक परिणाम अनुभवण्याची संधी

काळी काच, काळा गॉगल, एक्स रे फिल्म, चंदेरी रंगाच्या अॅल्युमिनिअम फिल्मचे गॉगल यामध्ये सूर्याकडून येणारी हानिकारक अवरक्त व अतिनील प्रारणे शोषली जात नाहीत. सुरक्षित पद्धतीने ग्रहण बघण्याचे आवाहन

लातूर : रविकिरणांच्या सावलीचा वैज्ञानिक परिणाम अनुभवण्याची संधी गुरुवारी (२6 डिसेंबरला) मिळणार आहे.  अवकाशात कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. सुमारे 15 वर्षांनी भारतातून सूर्यग्रहण दिसणार आहे. लातूर मध्ये हे ग्रहण खंडग्रास पद्धतीचे दिसणार आहे. यावेळी सूर्याचा सुमारे 75 टक्के भाग चांद्रमुळे झाकला जाणार असून सुमारे एक मिनिटभर ही अवस्था दिसेल. यावर्षी भारतातून दिसणारे हे शेवटचे ग्रहण असून पुढच्याच वर्षी 21 जूनला आणखी एक कंकणाकृती ग्रहण भारतात दिसणार आहे. परंतु त्याकाळात मान्सूनमुळे ढगाळ वातावरण असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यानंतर 2027 आणि 2028 साली खंडग्रास, तर 2031 साली कंकणाकृती ग्रहण भारतातून दिसेल. त्यामुळे यावर्षी 26 डिसेंबरला दिसणाऱ्या ग्रहणाचा अनुभव सर्वांनी घ्यावा. तसेच निसर्गातील विविध गोष्टी जसे झाडांची पाने, फुले, पशू, पक्षी यांच्या वर्तनात ग्रहण काळात होणाऱ्या बदलाचे निरीक्षण नोंदवावे, त्यांची छायाचित्रे घ्यावीत. काळी काच, काळा गॉगल, एक्स रे फिल्म, चंदेरी रंगाच्या अॅल्युमिनिअम फिल्मचे गॉगल यामध्ये सूर्याकडून येणारी हानिकारक अवरक्त व अतिनील प्रारणे शोषली जात नाहीत. ही सर्व साधने खूप स्वस्त असली व त्यातून सूर्य दिसत असला तरी त्यामुळे डोळ्यांना इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रहण बघण्यासाठी बनवलेल्या सुरक्षित ग्रहण चष्म्यातूनच ग्रहण बघावे, असे आवाहन लातूर विज्ञान केंद्रातर्फे केले आहे. ग्रहण म्हणजे काय? जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत आणि एकाच प्रतलात येतात त्यावेळी त्यांच्यामध्ये एकप्रकारचा लपंडाव होतो. सावलीमुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यामुळे सूर्य पृथ्वीवरून काही काळासाठी दिसत नाही, त्याला सूर्यग्रहण म्हणतात. तर पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे काही काळ चंद्र दिसत नाही त्याला चंद्रग्रहण असे म्हणतात. सूर्यग्रहण कुठल्या प्रकारचे असतात? ज्यावेळी चंद्रामुळे सूर्य पूर्णपणे झाकला जातो त्यास खग्रास सूर्यग्रहण म्हणले जाते. ज्यावेळी चंद्रा मुळे सूर्य मध्यभागात गोलाकृती आकारात झाकला जातो त्यास कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणले जाते. ज्यावेळी चंद्रा मुळे सूर्य अंशतः झाकला जातो त्यावेळी त्यास खंडग्रास सूर्यग्रहण म्हणले जाते. यावेळेसचे ग्रहण कुठल्या प्रकारचे आहे? 26 डिसेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण हे कंकणाकृती प्रकारचे आहे. परंतु ही कंकणाकृती अवस्था दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू येथील ठराविक भागातच दिसणार असून, भारताच्या उर्वरित भागात खंडग्रास पद्धतीचे ग्रहण पहायला मिळेल. दक्षिण भारतात जास्तीत जास्त तीन मिनिट चाळीस सेकंद एवढ्या कालावधीसाठी सूर्याचा सुमारे 97 टक्के भाग झाकला जाईल. तर लातूरमध्ये दीड मिनिटांसाठी जास्तीत जास्त सुमारे 75 टक्के भाग झाकला गेलेला दिसेल. ग्रहण केव्हा होते? चंद्रग्रहण हे पौर्णिमेला तर सूर्यग्रहण हे नेहमीच अमावास्येला घडते. दर पौर्णिमा किंवा अमावास्येला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एकाच प्रतालात नसतात त्यामुळे दर अमावस्या आणि पौर्णिमेला चंद्रग्रहण घडत नाही. ग्रहण अशुभ असते काय? प्राचीन काळी जेव्हा मनुष्याला खगोलशास्त्राविषयी विशेष ज्ञान नव्हते तेव्हा ग्रहणे का घडतात याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे चंद्र अथवा सूर्य अचानकपणे आकाशात दिसणे बंद झाल्याने लोक भयभीत होत असत. त्यामुळे ग्रहण म्हणजे आपल्यावर आलेले संकट अशी एक धारणा निर्माण झाली. त्यातूनच ग्रहण अशुभ किंवा अरिष्ट ही अंधश्रद्धा तयार झाली. वास्तविक ग्रहणे हा निसर्गाचा अद्भुत आविष्कार असून तो सर्वांनी आवश्यक ती काळजी घेऊन समाजातील सर्वच घटकांनी ( गर्भवती स्त्रिया, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक) अनुभवला पाहिजे.  ग्रहण कसे बघावे? उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण कधीही बघू नये. दुर्बिणी, साधे गॉगल्स, काळया काचा, एक्सरे फिल्मस, सीडी यातून ग्रहणे पाहू नयेत त्यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते. ग्रहण बघण्यासाठी बनवलेला ग्रहण चष्मा किंवा पिन होल कॅमेरा यातूनच ग्रहण पहावे.
 सूर्याकडे जास्त वेळ आणि एकटक पाहू नये.
 ग्रहणाची वेळ काय? लातूर शहरातील ग्रहणाच्या वेळा खालील प्रमाणे: सकाळी 8:०6 वाजता ग्रहण सुरू होईल ( स्पर्श) यात सूर्य झाकायला सुरुवात होईल. सकाळी 9:26 वाजता ग्रहणाची सर्वाधिक अवस्था दिसून येईल (मध्य). लातूरात साधारणपणे 75 टक्के सूर्य झाकलेला दिसेल. ही अवस्था सुमारे दीड मिनिट राहील. यानंतर झाकलेला सूर्य हळूहळू पूर्ववत दिसायला सुरुवात होईल. याला ग्रहण सुटणे असे म्हटले जाते. सकाळी 11.03 वाजता सूर्य पूर्णपणे दिसू लागेल ( मोक्ष). या ग्रहणाचे वैशिष्ठ काय? दर वर्षात जास्तीत जास्त सात ग्रहणे अवकाशात घडून येऊ शकतात. त्यातील 4 ते 5 सूर्यग्रहण ग्रहणे तर 3 ते 4 चंद्रग्रहण ग्रहणे असतात. वर्षभरात किमान दोन वेळा तरी सूर्यग्रहण घडतेच. असे असले तरी सर्व ग्रहणे आपल्याला ( भारतातून) दिसतीलच असे नाही. यावर्षी भारतातून दिसणारे हे शेवटचे ग्रहण असून, पुढच्याच वर्षी 21 जूनला आणखी एक कंकणाकृती ग्रहण भारतात दिसणार आहे. परंतु त्याकाळात मान्सूनमुळे ढगाळ वातावरण असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यानंतर 2027 आणि 2028 साली खंडग्रास, तर 2031 साली कंकणाकृती ग्रहण भारतातून दिसेल. त्यामुळे यावर्षी 26 डिसेंबरला दिसणाऱ्या ग्रहणाचा अनुभव सर्वांनी घ्यावा. तसेच निसर्गातील विविध गोष्टी जसे झाडांची पाने, फुले, पशू, पक्षी यांच्या वर्तनात ग्रहण काळात होणाऱ्या बदलाचे निरीक्षण नोंदवावे, त्यांची छायाचित्रे घ्यावीत असे आवाहन लातूर विज्ञान केंद्रातर्फे केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ajay Baraskar On Manoj Jarange: मोठी बातमी : मनोज जरांगेंविरुद्ध थेट ED मध्ये तक्रार, वाळू तस्करी केल्याचा आरोप, अजय बावसकर आक्रमक
मोठी बातमी : मनोज जरांगेंविरुद्ध थेट ED मध्ये तक्रार, वाळू तस्करी केल्याचा आरोप, अजय बावसकर आक्रमक
मोठी बातमी : कॅबिनेट मंत्र्याच्या सख्ख्या भावाला रक्त सांडेपर्यंत मारहाण, जमिनीच्या वाद पेटला, भाऊ आणि पुतण्या रुग्णालयात
मोठी बातमी : कॅबिनेट मंत्र्याच्या सख्ख्या भावाला रक्त सांडेपर्यंत मारहाण, जमिनीच्या वाद पेटला, भाऊ आणि पुतण्या रुग्णालयात
माधुरी हत्तीणीला वनतारामध्येच ठेवा; 'पेटा'कडून नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचाली सुरू होताच राज्य सरकारला पत्र
माधुरी हत्तीणीला वनतारामध्येच ठेवा; 'पेटा'कडून नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचाली सुरू होताच राज्य सरकारला पत्र
लग्नासाठी 1 लाख द्या, सरकारी सर्वधर्मीय विवाह नोंदणी पोर्टल सुरू करा; लग्नाळू युवकाचं जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
लग्नासाठी 1 लाख द्या, सरकारी सर्वधर्मीय विवाह नोंदणी पोर्टल सुरू करा; लग्नाळू युवकाचं जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

व्हिडीओ

Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माधुरी हत्तीणीला वनतारामध्येच ठेवा; 'पेटा'कडून नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचाली सुरू होताच राज्य सरकारला पत्र
माधुरी हत्तीणीला वनतारामध्येच ठेवा; 'पेटा'कडून नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचाली सुरू होताच राज्य सरकारला पत्र
Mumbai Cat Death: मुंबईत मांजरांना निर्घृणपणे संपवलं! चेंबूरमध्ये 20हून अधिक मांजरींचे छिन्नविछिन्न मृतदेह आढळले; अज्ञात मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास 50 हजारांचं बक्षीस
मुंबईत मांजरांना निर्घृणपणे संपवलं! चेंबूरमध्ये 20हून अधिक मांजरींचे छिन्नविछिन्न मृतदेह आढळले; अज्ञात मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास 50 हजारांचं बक्षीस
मोठी बातमी : कॅबिनेट मंत्र्याच्या सख्ख्या भावाला रक्त सांडेपर्यंत मारहाण, जमिनीच्या वाद पेटला, भाऊ आणि पुतण्या रुग्णालयात
मोठी बातमी : कॅबिनेट मंत्र्याच्या सख्ख्या भावाला रक्त सांडेपर्यंत मारहाण, जमिनीच्या वाद पेटला, भाऊ आणि पुतण्या रुग्णालयात
लग्नासाठी 1 लाख द्या, सरकारी सर्वधर्मीय विवाह नोंदणी पोर्टल सुरू करा; लग्नाळू युवकाचं जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
लग्नासाठी 1 लाख द्या, सरकारी सर्वधर्मीय विवाह नोंदणी पोर्टल सुरू करा; लग्नाळू युवकाचं जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
Spiritual: आत्महत्येचे विचार मनात येतात तेव्हा काय करावे? गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा मानव जातीसाठी मोलाचा सल्ला, जाणून घ्याच...
आत्महत्येचे विचार मनात येतात तेव्हा काय करावे? गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा मानव जातीसाठी मोलाचा सल्ला, जाणून घ्याच...
गणेशोत्सव विसर्जन व्यवस्थेचं कंत्राट गैरहिंदूंना नको; भाजपा नगरसेवकाची मागणी, महापालिका आयुक्तांना पत्र
गणेशोत्सव विसर्जन व्यवस्थेचं कंत्राट गैरहिंदूंना नको; भाजपा नगरसेवकाची मागणी, महापालिका आयुक्तांना पत्र
iPhone Duo Marathi News: युरोप ट्रिप, दोन तोळे सोनं, की नवी कोरी बाईक...; आयफोन ड्युओ'च्या ऐवजी त्याच किमतीत तुम्ही काय-काय खरेदी करू शकता?
युरोप ट्रिप, दोन तोळे सोनं, की नवी कोरी बाईक...; आयफोन ड्युओ'च्या ऐवजी त्याच किमतीत तुम्ही काय-काय खरेदी करू शकता?
Pune Crime News: मैत्रीणीशी बोलल्याचा राग अन् संशय आला, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाचं अपहरण करून नेलं; 112 वर कॉल लावला अन् अवघ्या 53 मिनिटांत सुटका, तरुणाने सांगितला थरारक अनुभव
मैत्रीणीशी बोलल्याचा राग अन् संशय आला, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाचं अपहरण करून नेलं; 112 वर कॉल लावला अन् अवघ्या 53 मिनिटांत सुटका, तरुणाने सांगितला थरारक अनुभव
Embed widget