एक्स्प्लोर

Independence Day 2022: जाणून घ्या स्वतंत्र भारतात घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांबद्दल, ज्यामुळे देशात झाला मोठा बदल

Big Decisions In Independent India: स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त संपूर्ण देश 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करत आहे.

Big Decisions In Independent India: स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त संपूर्ण देश 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करत आहे. भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले. या 75 वर्षांत भारत जगाच्या नकाशावर एक शक्तिशाली देश म्हणून उदयास आला आहे. स्वातंत्र्यानंतर देशात असे अनेक निर्णय घेण्यात आले, ज्यामुळे देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि न्यायिक क्षेत्रात मोठे बदल दिसून आले. आम्ही तुम्हाला स्वतंत्र भारतात घेतलेल्या अशा मोठ्या निर्णयांबद्दल सांगणार आहोत.

बँकांचे राष्ट्रीयीकरण (1969)

केंद्रातील इंदिरा गांधी सरकारने 1969 मध्ये 14 मोठ्या खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. यामुळे बँकांना लोककल्याणासाठी काम करण्यास प्रोत्साहन मिळाले. त्यानंतर 1980 मध्ये अनेक बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

केशवानंद भारती प्रकरण (1973)

केशवानंद भारती प्रकरणी जो निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला, तो ऐतिहासिक मानला जातो. याचे कारण म्हणजे या प्रकरणी न्यायालयाने संविधानाच्या मूलभूत रचनेशी संबंधित निर्णय दिला होता. संसदेच्या घटनादुरुस्ती करण्याच्या अमर्याद अधिकारांना वेसण घालून कुठलीही घटनादुरुस्ती करताना राज्य घटनेच्या मूलतत्त्वांना हात लावता येणार नाही, असे सांगण्यात आले होते. त्याचबरोबर जर घटनादुरुस्ती केली तर त्याचा फेरआढावा घेण्याचा अधिकार न्यायालयाला राहील असेही स्पष्ट करण्यात आले होते.

आणीबाणी (1975)

इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली. भारताच्या लोकशाहीच्या इतिहासातील हा एक वाईट निर्णय होता. त्यावेळी याचा निषेध करणाऱ्या देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक करण्यात आली होती. या निर्णयानंतर देशात लोकशाही अधिकारांबाबत लोकांमध्ये जागरुकता वाढली.

मतदान वय 18 वर्षे (1989)

मतदानाचे वय 18 वर्षे करण्यात आले. यामुळे देशातील तरुण लोकसंख्येला मतदान करण्याचा आणि सरकार निवडण्याचा अधिकार मिळाला.

आर्थिक उदारीकरण (1991)

तत्कालीन देशाचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. याद्वारे भारतीय बाजारपेठ संपूर्ण जगासाठी खुली झाली. भारताच्या आर्थिक विकासाचे हे एक प्रमुख कारण बनले.

ओबीसी आरक्षण (1990)

ओबीसी आरक्षणाबाबत मंडल आयोगाच्या शिफारशी व्ही पी सिंह सरकारने लागू केल्या होत्या. त्यामुळे देशातील मोठ्या लोकसंख्येला नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व मिळू लागले.

नरेगा/मनरेगा (2005 आणि 2009)

प्रत्येक हाताला रोजगार या विचाराने 2005 मध्ये नरेगा योजना सुरू करण्यात आली. 2 ऑक्टोबर 2009 रोजी महात्मा गांधी यांच्या नावाने मनरेगा असे याचे पुन्हा नामकरण करण्यात आले. ही एक अतिशय ऐतिहासिक योजना आहे, जी ग्रामीण भारतातील गरिबी दूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prayagraj Mahakumbh Delhi : महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांचा चेंगराचेंगरीत मृत्यू Special ReportBhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special ReportMumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special ReportAjit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.