एक्स्प्लोर

Independence Day 2022: जाणून घ्या स्वतंत्र भारतात घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांबद्दल, ज्यामुळे देशात झाला मोठा बदल

Big Decisions In Independent India: स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त संपूर्ण देश 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करत आहे.

Big Decisions In Independent India: स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त संपूर्ण देश 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करत आहे. भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले. या 75 वर्षांत भारत जगाच्या नकाशावर एक शक्तिशाली देश म्हणून उदयास आला आहे. स्वातंत्र्यानंतर देशात असे अनेक निर्णय घेण्यात आले, ज्यामुळे देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि न्यायिक क्षेत्रात मोठे बदल दिसून आले. आम्ही तुम्हाला स्वतंत्र भारतात घेतलेल्या अशा मोठ्या निर्णयांबद्दल सांगणार आहोत.

बँकांचे राष्ट्रीयीकरण (1969)

केंद्रातील इंदिरा गांधी सरकारने 1969 मध्ये 14 मोठ्या खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. यामुळे बँकांना लोककल्याणासाठी काम करण्यास प्रोत्साहन मिळाले. त्यानंतर 1980 मध्ये अनेक बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

केशवानंद भारती प्रकरण (1973)

केशवानंद भारती प्रकरणी जो निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला, तो ऐतिहासिक मानला जातो. याचे कारण म्हणजे या प्रकरणी न्यायालयाने संविधानाच्या मूलभूत रचनेशी संबंधित निर्णय दिला होता. संसदेच्या घटनादुरुस्ती करण्याच्या अमर्याद अधिकारांना वेसण घालून कुठलीही घटनादुरुस्ती करताना राज्य घटनेच्या मूलतत्त्वांना हात लावता येणार नाही, असे सांगण्यात आले होते. त्याचबरोबर जर घटनादुरुस्ती केली तर त्याचा फेरआढावा घेण्याचा अधिकार न्यायालयाला राहील असेही स्पष्ट करण्यात आले होते.

आणीबाणी (1975)

इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली. भारताच्या लोकशाहीच्या इतिहासातील हा एक वाईट निर्णय होता. त्यावेळी याचा निषेध करणाऱ्या देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक करण्यात आली होती. या निर्णयानंतर देशात लोकशाही अधिकारांबाबत लोकांमध्ये जागरुकता वाढली.

मतदान वय 18 वर्षे (1989)

मतदानाचे वय 18 वर्षे करण्यात आले. यामुळे देशातील तरुण लोकसंख्येला मतदान करण्याचा आणि सरकार निवडण्याचा अधिकार मिळाला.

आर्थिक उदारीकरण (1991)

तत्कालीन देशाचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. याद्वारे भारतीय बाजारपेठ संपूर्ण जगासाठी खुली झाली. भारताच्या आर्थिक विकासाचे हे एक प्रमुख कारण बनले.

ओबीसी आरक्षण (1990)

ओबीसी आरक्षणाबाबत मंडल आयोगाच्या शिफारशी व्ही पी सिंह सरकारने लागू केल्या होत्या. त्यामुळे देशातील मोठ्या लोकसंख्येला नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व मिळू लागले.

नरेगा/मनरेगा (2005 आणि 2009)

प्रत्येक हाताला रोजगार या विचाराने 2005 मध्ये नरेगा योजना सुरू करण्यात आली. 2 ऑक्टोबर 2009 रोजी महात्मा गांधी यांच्या नावाने मनरेगा असे याचे पुन्हा नामकरण करण्यात आले. ही एक अतिशय ऐतिहासिक योजना आहे, जी ग्रामीण भारतातील गरिबी दूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले

व्हिडीओ

Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी
Raj Uddhav And Kiyan Thackeray:राज-उद्धव आजोबांच्या गप्पांमध्ये नातवाची एन्ट्री; पाहा पुढे काय झालं
Cash Bomb Politics : राजकीय बंडलबाजी, महापुरुषांवरुन टोलेबाजी; स्तुती करताय की टीका Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
Embed widget