Jitendra Awhad: बेशरमपणे पोलिसांच्या पाठबळ देणाऱ्या सरकारला सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा तळतळाट लागेल, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
Jitendra Awhad in Vidhan Sabha: पाशवी बहुमत मिळाल्यामुळे लोकशाहीवर बलात्कार करण्याचा अधिकार आपल्याला मिळाला आहे, असे सरकारला वाटत असल्याचे टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

मुंबई: सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलीस कोठडीत होऊनही कोणावरही कारवाई झालेली नाही. या सरकारला गरिबांची जाण नाही का? मग त्यांनी न्याय कोणाकडे मागायचा? राज्य सरकारने सोमनाथ सूर्यवंशीच्या (Somnath Suryawanshi) मृत्यूचे कारण सांगावे. मात्र, सरकार बेशरमपणे पोलिसांच्या पाठीशी उभे राहत आहे. या सरकारला सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा तळतळाट सहन करावा लागेल, असे वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले. त्यांनी सोमवारी विधानसभेत परभणीतील संतोष सूर्यवंशी मृ्त्यूप्रकरणावरुन पोलीस यंत्रणा आणि राज्य सरकारला धारेवर धरले.
एखाद्या सरकारला पाशवी बहुमत मिळतं तेव्हा पाशवी बलात्कार होत असतात. हे सहन करण्याची ताकद तुम्ही ठेवा. विरोधी पक्षाला काही किंमत द्यायची नाही, म्हणून सभागृहात समोर कोण बसत नाही. त्याच्या हातात हातकड्या असताना त्यांनी पिस्तुल खेचण्याचा प्रयत्न कसा केला? पीएसआय अधिकारी आतमध्ये बसतो. जर असे एन्काउंटर होणार असतील तर न्यायपालिकेचे महत्त्व काय? सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलीस कोठडीत झाला. मात्र, कोणावरही कारवाई झाली नाही. सरकार बेशरमपणे पोलिसांच्या मागे उभे राहत आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.
पुण्यातील विक्रम गायकवाड प्रकरण समोर आले आहे. त्याने आंतरजातीय विवाह केला आहे. विक्रम गायकवाड याच्यावर जोरदार हल्ला करण्यात आला. त्याच्या शरीरातील प्रत्येक भागातून रक्त वाहत होते. त्याला धमक्या येत होत्या. जातीय प्रकरण समोर आलं की, पैसे आणि जमिनीचा विषय समोर येतो. यात पीएसआय चव्हाण याने सर्वांना वाचवण्याचा प्रयत्न केला. वर्षभरात ऑनर किलिंगची 9 प्रकरणे झाली, याकडे जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आले नसते तर मुंडेंचा राजीनामा झाला नसता: जितेंद्र आव्हाड
संतोष देशमुख यांची हत्या झाली. जोपर्यंत फोटो येत नव्हते, तोपर्यंत कारवाई होत नव्हती. फोटो कसे बाहेर आले, यावर मला बोलायचं नाही. फोटो आले नसते तर राजीनामा झाला नसता. शंभर जण संभाळण्यापेक्षा वाल्मिक कराडला सांभाळा तुम्हाला त्रास होणार नाही, असे सुदर्शन घुले कंपनीला सांगतो. एक वाल्मिक कराड बीडमध्ये आहे. मात्र, असे अनेक वाल्मिक प्रत्येक जिल्ह्यात आहे. अरे तुम्हाला तो आंधळे सापडत नाही. प्रशांत कोरटकर तुमच्या नजरेखालून दुबईला पळून जातो आणि तुम्ही एआय इंटलिजन्सच्या बाता मारता, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.
आणखी वाचा
महाराष्ट्राला कमजोर गृहमंत्री लाभला, कुणाल कामरा प्रकरणावर राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ही गांXXX
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
