![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Chanakya Niti : 'अधीत्येदं यथाशास्त्रं नरो जानाति सत्तमः’, चाणक्यंच्या या श्लोकात दडलेय यशाचे रहस्य!
Chanakya Niti : चाणक्य नीति आचार्य चाणक्य यांनी लिहिलेली आहे. चाणक्य नीतिचा प्रत्येक श्लोक जीवन यशस्वी करण्याची प्रेरणा देतो. चला जाणून घेऊया आजची चाणक्य नीति...
![Chanakya Niti : 'अधीत्येदं यथाशास्त्रं नरो जानाति सत्तमः’, चाणक्यंच्या या श्लोकात दडलेय यशाचे रहस्य! Chanakya Niti The secret of success hidden in this verse of Chanakya Chanakya Niti : 'अधीत्येदं यथाशास्त्रं नरो जानाति सत्तमः’, चाणक्यंच्या या श्लोकात दडलेय यशाचे रहस्य!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/12/6fde7b2fe295e95b9668d057ebfe5e42_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Motivation Thought, Chanakya Niti : चाणक्य नीतिनुसार, जीवनात यश मिळविण्यासाठी सर्वोत्तम गुण अंगीकारणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जेव्हा एखादी व्यक्ती सदाचारी असते, तेव्हा त्याचे वागणे, भाषा, बोलणे सर्वांना आकर्षित करते. आयुष्यात यश हवे असेल, तर चाणक्याच्या या गोष्टी जीवनात आचरणात आणाव्यात.
अधीत्येदं यथाशास्त्रं नरो जानाति सत्तमः ।
धर्मोपदेशं विख्यातं कार्याऽकार्य शुभाऽशुभम् ।।
चाणक्य नीतिच्या या श्लोकाचा अर्थ असा आहे की, जो मनुष्य शास्त्राच्या नियमांचे सतत आचरण करून शिक्षण घेतो, त्याला योग्य, अयोग्य आणि शुभ कर्मांचे ज्ञान होते. अशा व्यक्तीला उत्तम ज्ञान असते. म्हणजेच असे लोक जीवनात अपार यश मिळवतात.
चाणक्य नीतिनुसार, व्यक्तीने नेहमी सावध आणि ज्ञानाच्या दिशेने व्यस्त असले पाहिजे. शास्त्रातून ज्ञान मिळते. म्हणजेच जे शास्त्राशी संलग्न आहेत. शास्त्रातून मिळालेल्या गोष्टी अनुभवाच्या कसोटीवर मनुष्याला मजबूत बनवत असतात. अशा व्यक्ती बरोबर-अयोग्य यातला फरक सहज ओळखतात. अशा लोकांना कोणीही फसवू शकत नाही. असे लोक गोंधळाच्या स्थितीपासूनही दूर राहतात. आचार्य चाणक्य यांच्यानुसार असे लोक जीवनातील प्रत्येक गोष्टीत यश मिळवतात.
आपदर्थे धनं रक्षेद्दारान् रक्षेध्दनैरपि ।
नआत्मानं सततं रक्षेद्दारैरपि धनैरपि ।।
चाणक्य नीतिच्या या श्लोकाचा अर्थ प्रत्येकाने जाणून घेतला पाहिजे. या श्लोकाद्वारे चाणक्य सांगतात की, येणाऱ्या संकटांपासून वाचण्यासाठी पैशाची बचत करावी. संपत्तीचा त्याग करूनही त्याने पत्नीचे रक्षण करावे. पण, जर आत्म्याच्या रक्षणाचा प्रश्न आला, तर त्याने संपत्ती आणि पत्नी या दोन्ही गोष्टी तुच्छ समजल्या पाहिजेत.
चाणक्यंच्या मते, भौतिक युगात पैशाची विशेष भूमिका असते. त्यामुळे त्याचे संरक्षण केले पाहिजे. ज्यांना पैसा आला की, त्याचे महत्त्व कळत नाही, अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च केल्याने त्यांना नंतर त्रास सहन करावा लागतो. संपत्तीच्या रक्षणापेक्षा आत्म्याचे रक्षण अधिक महत्त्वाचे आहे. जर आत्मा शुद्ध आणि पवित्र असेल, तर धन लक्ष्मीजींचा आशीर्वादही कायम राहतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा)
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)