एक्स्प्लोर

India Wheat Production : देशातील गव्हाचे उत्पादन 20 वर्षांच्या नीचांकी पातळीवर; आगामी काळात त्याचे काय परिणाम होतील?

India Wheat Production : देशातील गव्हाचे उत्पादन 20 वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचलं आहे. कडक उष्णतेमुळे, भारतात 20 वर्षांपेक्षा जास्त काळातील सर्वात कमी गव्हाचे उत्पादन झाले आहे.

India Wheat Production : भारतातील गहू उत्पादनाची (Wheat Production) अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. कडक उष्णतेमुळे, भारतात 20 वर्षांपेक्षा जास्त काळातील सर्वात कमी गव्हाचे उत्पादन झाले आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या गव्हाचे सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या राज्यांमध्ये यंदा उत्पादन चांगले आले नाही. कडक उन्हामुळे गव्हाची पिके करपून गेली आहेत.

सूर्यप्रकाशामुळे गव्हाची पिके तपकिरी झाली आहेत. एका अहवालानुसार, पंजाबमधील एका जिल्ह्यातील पिके सोनेरी पिवळ्या ते तपकिरी रंगात बदलली आहेत. कडक उन्हात पिके आणि धान्ये कमी होण्याचे ही लक्षणं असल्याचं एका गहू उत्पादक शेतकऱ्याने सांगितलं आहे.

2010 पासून प्रचंड नुकसान

पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये गव्हाच्या उत्पादकतेत दोन दशकांत सर्वाधिक घट झाली आहे. या वर्षीचे नुकसान 2010 पेक्षा मोठे आहे. 2010 मध्ये हीच उष्णतेची लाट दिसली होती. गव्हासारख्या मुख्य पिकावर हवामानाचा घातक परिणाम दीर्घकालीन भारताच्या अन्नसुरक्षेसाठी चांगला नाही असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

काय परिणाम होईल?

पीक कापणी प्रयोगाच्या आधारे शास्त्रज्ञांनी गव्हाच्या उत्पादनाशी संबंधित आकडेवारी जाहीर केली आहे. ही पद्धत शास्त्रज्ञांना उत्पादन निश्चित करण्यास आणि पीक नुकसानाचे मूल्यांकन करण्यास मदत करते. त्याचे दीर्घकालीन परिणाम दिसून येतात, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 

ज्या भागात गव्हाचे उत्पादन जास्त आहे ते भौगोलिकदृष्ट्या प्रभावित होऊ शकतात. याशिवाय आर्थिक दृष्टिकोनातून पाहिले तर त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होऊ शकतो. कमी उत्पादन म्हणजे बाजारात गव्हाचा तुटवडा आणि भाव वाढणे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. 

प्रतिक्विंटल 12 ते 18 हजार रुपयांचे नुकसान झाले असून कर्जबाजारी झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रति हेक्टर उत्पादन सुमारे 20 टक्क्यांनी घटले असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलं आहे

आणखी घट होईल?

तापमानात 2.5 ते 4.9 अंश सेल्सिअस वाढ झाल्यामुळे गव्हाचे उत्पादन 41-52 टक्क्यांनी कमी होऊ शकते असं 2016 मध्ये प्रकाशित झालेल्या एका सरकारी अहवालात म्हटले आहे. ओस्लो येथील सेंटर फॉर इंटरनॅशनल क्लायमेट रिसर्च येथे पोस्ट केलेल्या एएस दलोज यांच्या नेतृत्वाखाली हवामान बदलावरील संशोधन जर्नल ऑफ अॅग्रिकल्चर अँड फूड रिसर्चमध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. 

या अहवालानुसार भारतातील गंगेच्या मैदानात वाढत्या उष्णतेचा परिणाम दिसून येईल. महत्त्वाचे म्हणजे, हे असे क्षेत्र आहे जे जगातील प्रमुख गहू उत्पादक प्रदेशांपैकी एक आहे.

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस, 8 जुलैपासून पावसात घट होणार, शेतकरी चिंतेत
राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस, 8 जुलैपासून पावसात घट होणार, शेतकरी चिंतेत
Vidarbha Cow Scam: पशुसंवर्धन विभागाचा संतापजनक कारभार! जन्मात कोंबडी पाळली नाही, त्याच्या नावावर लाटले गाईंचे पैसे; विदर्भातील 'त्या' योजनेचा धक्कादायक खुलासा
पशुसंवर्धन विभागाचा संतापजनक कारभार! जन्मात कोंबडी पाळली नाही, त्याच्या नावावर लाटले गाईंचे पैसे; विदर्भातील 'त्या' योजनेचा धक्कादायक खुलासा
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
कर्जमाफी लांबणीवर! 5 जुलैची डेडलाईन हुकणार, सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती, कृषीमंत्र्यांचा मोठं वक्तव्य  
कर्जमाफी लांबणीवर! 5 जुलैची डेडलाईन हुकणार, सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती, कृषीमंत्र्यांचा मोठं वक्तव्य  

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
लोणावळ्यात रिसॉर्ट परिसरात भूस्खलन, दरड कोसळून दोघे अडकले; शोधमोहिम सुरू, प्रशासन अलर्ट मोडवर
लोणावळ्यात रिसॉर्ट परिसरात भूस्खलन, दरड कोसळून दोघे अडकले; शोधमोहिम सुरू, प्रशासन अलर्ट मोडवर
Supriya Sule: जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
High Court on FDA Actions: तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
Embed widget