एक्स्प्लोर

India Wheat Production : देशातील गव्हाचे उत्पादन 20 वर्षांच्या नीचांकी पातळीवर; आगामी काळात त्याचे काय परिणाम होतील?

India Wheat Production : देशातील गव्हाचे उत्पादन 20 वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचलं आहे. कडक उष्णतेमुळे, भारतात 20 वर्षांपेक्षा जास्त काळातील सर्वात कमी गव्हाचे उत्पादन झाले आहे.

India Wheat Production : भारतातील गहू उत्पादनाची (Wheat Production) अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. कडक उष्णतेमुळे, भारतात 20 वर्षांपेक्षा जास्त काळातील सर्वात कमी गव्हाचे उत्पादन झाले आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या गव्हाचे सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या राज्यांमध्ये यंदा उत्पादन चांगले आले नाही. कडक उन्हामुळे गव्हाची पिके करपून गेली आहेत.

सूर्यप्रकाशामुळे गव्हाची पिके तपकिरी झाली आहेत. एका अहवालानुसार, पंजाबमधील एका जिल्ह्यातील पिके सोनेरी पिवळ्या ते तपकिरी रंगात बदलली आहेत. कडक उन्हात पिके आणि धान्ये कमी होण्याचे ही लक्षणं असल्याचं एका गहू उत्पादक शेतकऱ्याने सांगितलं आहे.

2010 पासून प्रचंड नुकसान

पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये गव्हाच्या उत्पादकतेत दोन दशकांत सर्वाधिक घट झाली आहे. या वर्षीचे नुकसान 2010 पेक्षा मोठे आहे. 2010 मध्ये हीच उष्णतेची लाट दिसली होती. गव्हासारख्या मुख्य पिकावर हवामानाचा घातक परिणाम दीर्घकालीन भारताच्या अन्नसुरक्षेसाठी चांगला नाही असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

काय परिणाम होईल?

पीक कापणी प्रयोगाच्या आधारे शास्त्रज्ञांनी गव्हाच्या उत्पादनाशी संबंधित आकडेवारी जाहीर केली आहे. ही पद्धत शास्त्रज्ञांना उत्पादन निश्चित करण्यास आणि पीक नुकसानाचे मूल्यांकन करण्यास मदत करते. त्याचे दीर्घकालीन परिणाम दिसून येतात, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 

ज्या भागात गव्हाचे उत्पादन जास्त आहे ते भौगोलिकदृष्ट्या प्रभावित होऊ शकतात. याशिवाय आर्थिक दृष्टिकोनातून पाहिले तर त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होऊ शकतो. कमी उत्पादन म्हणजे बाजारात गव्हाचा तुटवडा आणि भाव वाढणे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. 

प्रतिक्विंटल 12 ते 18 हजार रुपयांचे नुकसान झाले असून कर्जबाजारी झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रति हेक्टर उत्पादन सुमारे 20 टक्क्यांनी घटले असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलं आहे

आणखी घट होईल?

तापमानात 2.5 ते 4.9 अंश सेल्सिअस वाढ झाल्यामुळे गव्हाचे उत्पादन 41-52 टक्क्यांनी कमी होऊ शकते असं 2016 मध्ये प्रकाशित झालेल्या एका सरकारी अहवालात म्हटले आहे. ओस्लो येथील सेंटर फॉर इंटरनॅशनल क्लायमेट रिसर्च येथे पोस्ट केलेल्या एएस दलोज यांच्या नेतृत्वाखाली हवामान बदलावरील संशोधन जर्नल ऑफ अॅग्रिकल्चर अँड फूड रिसर्चमध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. 

या अहवालानुसार भारतातील गंगेच्या मैदानात वाढत्या उष्णतेचा परिणाम दिसून येईल. महत्त्वाचे म्हणजे, हे असे क्षेत्र आहे जे जगातील प्रमुख गहू उत्पादक प्रदेशांपैकी एक आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kunal Kamra Special Report : कामराची कॉमडी, प्रेक्षकांना समन्स; पोलीस नोंदवणार प्रेक्षकांचे जबाबSuresh Dhas Full PC : कृषी केंद्राची कंत्राट अप्रत्यक्षपणे कृषी अधिकाऱ्यांकडेच : सुरेश धसSpecial Report Sanjay Raut : मोदींची सप्टेंबरमध्ये निवृत्ती,राऊतांची भविष्यवाणी;भाजप जाळ्यात अडकणार?Anjali Damania On Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला:दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Embed widget