एक्स्प्लोर

India Wheat Production : देशातील गव्हाचे उत्पादन 20 वर्षांच्या नीचांकी पातळीवर; आगामी काळात त्याचे काय परिणाम होतील?

India Wheat Production : देशातील गव्हाचे उत्पादन 20 वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचलं आहे. कडक उष्णतेमुळे, भारतात 20 वर्षांपेक्षा जास्त काळातील सर्वात कमी गव्हाचे उत्पादन झाले आहे.

India Wheat Production : भारतातील गहू उत्पादनाची (Wheat Production) अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. कडक उष्णतेमुळे, भारतात 20 वर्षांपेक्षा जास्त काळातील सर्वात कमी गव्हाचे उत्पादन झाले आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या गव्हाचे सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या राज्यांमध्ये यंदा उत्पादन चांगले आले नाही. कडक उन्हामुळे गव्हाची पिके करपून गेली आहेत.

सूर्यप्रकाशामुळे गव्हाची पिके तपकिरी झाली आहेत. एका अहवालानुसार, पंजाबमधील एका जिल्ह्यातील पिके सोनेरी पिवळ्या ते तपकिरी रंगात बदलली आहेत. कडक उन्हात पिके आणि धान्ये कमी होण्याचे ही लक्षणं असल्याचं एका गहू उत्पादक शेतकऱ्याने सांगितलं आहे.

2010 पासून प्रचंड नुकसान

पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये गव्हाच्या उत्पादकतेत दोन दशकांत सर्वाधिक घट झाली आहे. या वर्षीचे नुकसान 2010 पेक्षा मोठे आहे. 2010 मध्ये हीच उष्णतेची लाट दिसली होती. गव्हासारख्या मुख्य पिकावर हवामानाचा घातक परिणाम दीर्घकालीन भारताच्या अन्नसुरक्षेसाठी चांगला नाही असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

काय परिणाम होईल?

पीक कापणी प्रयोगाच्या आधारे शास्त्रज्ञांनी गव्हाच्या उत्पादनाशी संबंधित आकडेवारी जाहीर केली आहे. ही पद्धत शास्त्रज्ञांना उत्पादन निश्चित करण्यास आणि पीक नुकसानाचे मूल्यांकन करण्यास मदत करते. त्याचे दीर्घकालीन परिणाम दिसून येतात, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 

ज्या भागात गव्हाचे उत्पादन जास्त आहे ते भौगोलिकदृष्ट्या प्रभावित होऊ शकतात. याशिवाय आर्थिक दृष्टिकोनातून पाहिले तर त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होऊ शकतो. कमी उत्पादन म्हणजे बाजारात गव्हाचा तुटवडा आणि भाव वाढणे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. 

प्रतिक्विंटल 12 ते 18 हजार रुपयांचे नुकसान झाले असून कर्जबाजारी झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रति हेक्टर उत्पादन सुमारे 20 टक्क्यांनी घटले असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलं आहे

आणखी घट होईल?

तापमानात 2.5 ते 4.9 अंश सेल्सिअस वाढ झाल्यामुळे गव्हाचे उत्पादन 41-52 टक्क्यांनी कमी होऊ शकते असं 2016 मध्ये प्रकाशित झालेल्या एका सरकारी अहवालात म्हटले आहे. ओस्लो येथील सेंटर फॉर इंटरनॅशनल क्लायमेट रिसर्च येथे पोस्ट केलेल्या एएस दलोज यांच्या नेतृत्वाखाली हवामान बदलावरील संशोधन जर्नल ऑफ अॅग्रिकल्चर अँड फूड रिसर्चमध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. 

या अहवालानुसार भारतातील गंगेच्या मैदानात वाढत्या उष्णतेचा परिणाम दिसून येईल. महत्त्वाचे म्हणजे, हे असे क्षेत्र आहे जे जगातील प्रमुख गहू उत्पादक प्रदेशांपैकी एक आहे.

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
नाशिकच्या NCCF खरेदी केंद्रावर पर राज्यातील हलक्या प्रतीचा कांदा, शेतकऱ्यांनी अडवले 20 ते 35 ट्रक, सखोल चौकशी करण्याची मागणी
नाशिकच्या NCCF खरेदी केंद्रावर पर राज्यातील हलक्या प्रतीचा कांदा, शेतकऱ्यांनी अडवले 20 ते 35 ट्रक, सखोल चौकशी करण्याची मागणी
सावधान! राज्यातील 'या' भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, पुढील तीन दिवस कसं असणार हवामान? 
सावधान! राज्यातील 'या' भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, पुढील तीन दिवस कसं असणार हवामान? 

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget