एक्स्प्लोर

Zero Hour Full : सरपंच हत्याकांड ते मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती; सविस्तर चर्चा

नमस्कार मी विजय साळवी... झीरो अवर या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.. 

मंडळी, एखादं शहर... एखादं गाव.. एखादं राज्य... किंवा अगदी एखादा देशही... यांची तिथल्या वैशिष्ट्यांनुसार एक विशिष्ट ओळख असते.. 

मंडळी.. पाकिस्तान किंवा चीन म्हटलं ना की ते दोन्ही देश आपल्या कुरापतींसाठी प्रसिद्ध आहेत.. तसंच अमेरिका आणि रशिया त्यांच्या सामरिक शक्तीसाठी तर इंग्लंड त्यांच्या साम्राज्यासाठी... मंडळी, यात कधीकधी एखादी ओळख मिरवण्यासारखी असते... पण एखादी ओळख लाजिरवाणीही असू शकते...

अशीच काही बिरुदं आपल्या देशातही आहेत.. ती सांगताना एखाद्या राज्याचा अपमान करण्याचा आमचा कोणताही हेतू नाहीय.. पण, वाढत्या गुन्हेगारीचं उदाहरण देताना आपले राजकारणी एखाद्या शहराची किंवा राज्याची तुलना उत्तरेतील राज्यांची नावं घेऊन करतात..

नेत्यांच्या भाषणांपासून अगदी चित्रपटांपर्यंत काही राज्यं ही फक्त गुन्हेगारीसाठीच प्रसिद्ध आहेत.. असंच सांगण्यात आलंय.. दाखवण्यात आलंय..

आता तुम्ही म्हणाल की हे मी का सांगतोय.. तर मंडळी.. त्यांचं कारण आहे.. 
ते म्हणजे सोळा दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाच्या सरपंचाची म्हणजे संतोष देशमुखांची झालेली निर्घृण हत्या..

आणि आज सोळा दिवसांनंतरही या घटनेवरून सुरु झालेलं राजकारण थांबलेलं नाही...

घटना एका गावाची... एका जिल्ह्याची जरी असली.. तरी त्यावरुन अवघ्या राज्याचं राजकारण पेटलंय..

बरं, फक्त राजकीय आरोप प्रत्यारोप असते.. तर मी शहरांच्या वेगवेगळ्या बिरुदांचा इतिहास तुम्हाला सांगितला नसता.. पण, बीडच्या हत्याकांडावरून सुरु झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपात आपल्या शहरांची तुलना गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यांशी केली जात आहे. आणि हा नक्कीच एक चिंतेचा मुद्दा आहे.. आधी पाहूयात विरोधकांनी नेमकं काय म्हटलंय?

 

तुम्ही पाहाताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर सुरुय झीरो अवर. 

मंडळी, महायुतीच्या नव्या सरकारच्या मंत्र्यांनी पदभार स्वीकारून आता जवळपास दोन दिवस झालेत. नवे मंत्री म्हटलं की नव्यानं मिळणारा बंगला येतो. आणि त्या बंगल्यांच्याच वाटपावरून मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. 

मुंबईत मंत्र्यांसाठी एकूण ४२ बंगले आहेत. हे ४२ बंगले तीन परिसरांमध्ये वसलेले आहेत. पहिला अर्थातच मलबार हिल, दुसरा पेडर रोड आणि तिसरा नरीमन पॉईंट म्हणजे मंत्रालयाच्या समोर.
 
मलबार हिल आणि पेडर रोडवरील बंगले अधिक प्रशस्त आहेत. वर्षा, देवगिरी, नंदनवन, रॉयलस्टोन, रामटेक, ज्ञानेश्वरी, शिवगिरी, पर्णकुटी ही त्याची काही उदाहरणं. तर मंत्रालयासमोरचे बंगले तुलनेनं लहान आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अर्थातच वर्षा बंगला मिळाला आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नंदनवन बंगल्यातच राहणार आहेत. गेल्या सरकारमध्ये अजित पवारांकडे देवगिरी बंगला होता, यापुढेही त्यांनी देवगिरी बंगल्यात राहणं पसंत केलंय. 

आज चर्चेमध्ये असणारा बंगला म्हणजे रामटेक. हा बंगला खरं तर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना देण्यात आला होता. पण पंकजा मुंडेंनी या बंगल्यात राहण्याची आपली इच्छा बावनकुळेंकडे व्यक्त केल्याचं कळतं. बावनकुळेंनीही त्याला लगेच होकार दिला अशी चर्चा आहे. पंकजा यांचं या रामटेक बंगल्याशी भावनिक नातं आहे. कारण त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे मंत्री असताना रामटेक बंगल्यावर राहायचे. 

रामटेक हा सर्व सरकारी बंगल्यांमधला सर्वात सुंदर बंगला मानला जातो. या बंगल्याच्या लॉनवरून थेट समुद्र पाहण्याचा आनंद घेता येतो. रामटेकपासून हाकेच्या अंतरावर फडणवीसांचा सागर बंगला आहे. अर्थात, फडणवीस आता काही दिवसच सागरवर असतील, मुख्यमंत्री या नात्यानं त्यांना आता वर्षावर शिफ्ट व्हावं लागेल. 

दरम्यान, सरकारी बंगल्यांवरून यंदा जाहीर रस्सीखेच झाली नसली तरी त्याची चर्चा कायमच होत असते. त्यावरच आहे आजचा आमचा दुसरा प्रश्न. त्यावरील प्रतिक्रिया आपण काही वेळानं पाहणारच आहोत, पण त्याआधी प्रश्न पाहूयात, आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. 

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report
Indian Oil Tank Return : इराणला तुरी, गाठली मुंबापुरी, कच्चं तेल घेऊन जहाज मुंबईत Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
India LPG Crisis: इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
Embed widget