एक्स्प्लोर
कारगील युद्धाला 17 वर्षे पूर्ण, ऐतिहासिक लढाईतील 10 गोष्टी

1/10

रिकाम्या चौक्यांव्यतिरिक्त भारतीय सैन्याला हल्ला करायला अवघड जावे म्हणून पाकिस्तानकडून मोक्याच्या जागाही ताब्यात घेण्यात आल्या.
2/10

या लढाईत पाकिस्तानने भारतीय सैनिकांना चांगलेच झुंजावयाला लावले. अखेर 4 जुलै रोजी टायगर हिलवर भारताने ताबा मिळवला. टायगर लढाईच्या लढाईत भारताचे 5 सैनिक शहिद झाले.
3/10

कारगीलच्या द्रास येथे झालेलं हे युद्ध इतिहासातील सर्वात जास्त उंचीवर लढवलं गेलेलं युद्ध आहे. दोन्हीही राष्ट्र अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतरचं हे पहिलंच युद्ध होतं.
4/10

भारत बेसावध असताना पाकिस्तानने या युद्धासाठी आमंत्रण दिलं होतं. फेब्रुवारी 1999 मध्ये पाकिस्तानी लष्कराने कडक हिवाळ्यातच भारतीय चौक्यांचा ताबा घेणे आरंभले. पाकिस्तानने ही कारवाई अतिशय सूत्रबद्धरीत्या पार पाडली.
5/10

भारतीय गुप्तहेर खात्याला या घटनेची कसलीही माहिती मिळाली नाही, त्यामुळे भारतीय गुप्तहेर खात्याच्या कार्यक्षमतेवर सर्वत्र भारतातून व जगातूनही जोरदार टीका झाली.
6/10

कारगील युद्धानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक राजकीय सामाजिक बदल पाहायला मिळाले. पाकिस्तानमध्ये युद्धानंतर लष्कर आणि सरकार यांच्यातील दरी वाढत गेली. शिवाय युद्धानंतर लगेच पाकिस्तानमध्ये लष्करी राजवट लागू करण्यात आली. (माहिती/फोटो सौजन्यःविकिपीडिया)
7/10

पाकिस्तानच्या घुसखोरीमुळे 1999 मध्ये ऐतिहासिक कारगील भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरु झालं. अनेक महिन्यांच्या प्रयत्नानंतर भारताचं 'ऑपरेशन विजय' यशस्वी झालं. या युद्धाला आज 17 वर्षे पूर्ण होत आहेत.
8/10

कारगील युद्धात टायगर हिलवरील लढाई सर्वात महत्वाची लढाई मानली जाते. टायगर हिलच्या लढाईत दोन्ही बाजूने जबरदस्त प्रयत्नल झाले.
9/10

स्पेशल सर्विसेसच्या सर्वोत्कृष्ट तुकड्या, तसेच नॉर्दर्न लाइट इन्फट्रीच्या 4 ते 7 बटालियन तुकड्या या कामात गुंतल्या होत्या.
10/10

भारताने या युद्धाची परिस्थीती ज्या संयमाने हाताळली त्याबद्दल भारताचं जगभर कौतुक झालं.
Published at : 04 Jul 2016 03:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
