एक्स्प्लोर

Mohan Bhagwat On Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांना धडा शिकवणं आमचा धर्म, पहलगाम हल्ल्यावर सरसंघचालक मोहन भागवत काय म्हणाले?

Mohan Bhagwat: शांतपणे नुकसान सहन करणं हे ही आपल्या संस्कृतीत नाही. आपल्या सर्वांच्या हृदयात वेदना आहेत. आपण सारे संतापलो आहोत. वाईटाचा नाश करण्यासाठी आपल्याला आपली ताकद दाखवावी लागेल.' असे मोहन भागवत म्हणाले.

Pahalgam Terror Attack Mohan Bhagwat: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश पाकिस्तानवर संताप व्यक्त करत आहे. भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर मोठ्या कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अहिंसा हा आमचा स्वधर्म आहे. मात्र, दहशतवाद्यांना धडा शिकवणं हा देखील आमचा धर्म आहे,अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी पहलगाम हल्ल्यावर निषेध व्यक्त केलाय. आम्ही आमच्या शेजारील देशाचं नुकसान नाही करत पण ते चुकीच्या दिशेनं जात असतील तर प्रजेचं रक्षण करणं हे राजाचं कर्तव्य आहे. राजा आपलं कर्तव्य बजावणार असं रा. स्व संघाचे मोहन भागवत म्हणालेत. (Pahalgam Attack)

काय म्हणाले मोहन भागवत?

रावणाचा वध त्याच्या कल्याणासाठी झाला. देवाने त्याचा संहार केला. ही हिंसा नाही अहिंसा आहे. अहिंसा आपला धर्म आहे. पण अत्याचार करणाऱ्याला धर्म शिकवणं  अहिंसाच आहे. आम्हाला आमच्या शेजारील देशाचं नुकसान करायचं नाही. यानंतरही कोणी चुकीच्या रस्त्याने जाताना दिसलं तर राजाचं कर्तव्य प्रजेचं रक्षण करणं आहे. राजा त्याचं काम करेल.' असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

'धर्म आणि अधर्मातील लढाई' मोहन भागवत म्हणाले...

आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले, हा हल्ला धर्म आणि अधर्म यांच्यामधील लढाई आहे, याची आठवण करून देतो. लोकांना धर्माबद्दल विचारण्यात आले आणि नंतर त्यांना मारण्यात आले. हिंदू असे कधीच करणार नाहीत. हे आपले स्वरूप  नाही. द्वेष आणि शत्रूत्व जसे आपल्या संस्कृतीत नाही. तसेच शांतपणे नुकसान सहन करणं हे ही आपल्या संस्कृतीत नाही. आपल्या सर्वांच्या हृदयात वेदना आहेत. आपण सारे संतापलो आहोत. वाईटाचा नाश करण्यासाठी आपल्याला आपली ताकद दाखवावी लागेल.'

ते पुढे म्हणाले, रावणाने आपला विचार बदलण्यास नकार दिल्याने त्याला मारण्यात आले. कोणताही पर्याय उरला नव्हता. रामाने मारले पण त्यालाही सुधारण्याची संधीही देण्यात आली, जेंव्हा त्याने सुधारणा केली नाही तेव्हा त्याला मारण्यात आले. मोहन भागवत यांनी पहलगाम हल्ल्यावर आम्हाला कठोर उत्तराची अपेक्षा असल्याचं म्हटलंय. खऱ्या अर्थाने अहिंसक व्यक्तीनेही बलवान असलं पाहिजे. जर ताकद नसेल तर पर्याय नाही पण जेंव्हा ताकद असेल तेंव्हा गरज पडेल तेव्हा ती दिसली पाहिजे.

 

हेही वाचा:

Prakash Mahajan On Sharad Pawar: महिला म्हणाल्या, टिकल्या काढल्यामुळे आम्ही वाचलो; शरद पवारांना अजून काय पुरावा पाहिजे?, प्रकाश महाजनांचा सवाल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Jayant Patil:  नदी समुद्राला मिळाली की अस्तित्व संपतं, तुम्ही ज्या समृद्रात जाताय, त्यातून...; जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं
Jayant Patil:  नदी समुद्राला मिळाली की अस्तित्व संपतं, तुम्ही ज्या समृद्रात जाताय, त्यातून...; जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update: मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
Embed widget