एक्स्प्लोर

Vishwajeet Kadam : लोकसभा सोडली, विधानसभेला आवाज काढायचा नाही : विश्वजीत कदम

काँग्रेसच्या सांगलीतील मेळाव्यात विश्वजीत कदम यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर आपली नाराजी बोलून दाखवली. सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला देणं चुकीचंच आहे, मी इथे काँग्रेस नेत्यांना उघडं पाडण्यासाठी सांगलीत बोलावलं नाही. पण हे सगळे होत असताना कोण काय करत होते हा माझा सवाल आहे, असं विश्वजीत कदम म्हणाले. 

सांगली : महाविकास आघाडीमध्ये (MVA) सांगली लोकसभेच्या (Sangli Lok Sabha) जागेचा तिढा सुटला असताना, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम ( Vishwajeet Kadam) यांनी पुन्हा एकदा खदखद बोलून दाखवली. काँग्रेसच्या सांगलीतील मेळाव्यात विश्वजीत कदम यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर आपली नाराजी बोलून दाखवली. सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला देणं चुकीचंच आहे, मी इथे काँग्रेस नेत्यांना उघडं पाडण्यासाठी सांगलीत बोलावलं नाही. पण हे सगळे होत असताना कोण काय करत होते हा माझा सवाल आहे, असं विश्वजीत कदम म्हणाले. 

सांगलीतला आमचा तोंडचा घास हिसकावून घेतला. मित्रपक्षाला सांगा, 100 टक्के काँग्रेसची मते मिळणार आहेत, पण पुढे विधानसभेला आवाज काढायाचा नाही. यापुढे मी होऊ देणार नाही.  सांगलीत मविआच्या उमेदवारला मतदान होईल, पण पुन्हा  मित्रपक्षांना समजावून सांगा, विधानसभेला पुन्हा हा वाद होणार नाही याची काळीज घ्या. याचा वचपा नक्की विधानसभामध्ये काढू, असं विश्वजीत कदम म्हणाले.

काँग्रेसच्या या मेळाव्याला बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे सर्व दिग्गज पदाधिकारी उपस्थित होते.  सांगलीत आम्ही  सर्व काँगेस नेते एकत्र आलो आणि त्याला दृष्ट लागली, पण ती दृष्ट आम्हाला काढता देखील येते, असं विश्वजीत कदम म्हणाले. 

विश्वजीत कदम काय म्हणाले?  (Vishwajeet Kadam speech)

सांगली जिल्ह्याचा इतिहास सर्वांना माहीत आहे. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यच्या विचारला बळ दिलेय. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी काँग्रेसचा विचार लक्षात घेऊन लढ्यात सहभागी झाले.  राजारामबापूंचे देखील जिल्ह्याच्या विकासात योगदान आहे असं म्हणत, राजारामबापू पाटील यांचा विश्वजित कदम यांच्याकडून आवर्जून उल्लेख करण्यात आला.  भाजपने पहिल्यांदा सत्तेवर येताना जनतेला फसवलं आणि तात्पुरता स्वार्थ साधून घेतला. 2014 ते 19 मध्ये अनेक बाबतीत जनतेची फसवणूक झाली.  मागील 5 वर्षात तर अनेक कटकारस्थान सत्ताधारी मंडळीकडून करण्यात आली.  यंत्रणाचा वापर करून लोकशाहीला घातक करण्याचे काम केले जातेय.  केंद्रीय यंत्रणेची गैर वापर करुन गांधी कुटुंबातील लोकांची पायी चालवून चौकशी केली. ज्या पद्धतीने भाजपाचे कारभार सुरू आहे,ते पाहून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना वाईट वाटत असेल. गांधी कुटुंबावर यंत्रणा वापरून चौकशी लावली जातेय, असं विश्वजीत कदम म्हणाले.

काँग्रेस कार्यकर्त्यांवर मोठे आघात

सांगली जिल्ह्यातील दुष्काळ हटवण्यासाठी सर्व पक्षातील नेत्यांनी काम केले. आज अनेक दुष्काळ भागात सुबत्ता येऊ लागली आहे. गेल्या 5 वर्षात काँग्रेस कार्यकर्त्यांवर मोठे आघात झाले.  ज्येष्ठ मंडळी निघून गेले, त्यामुळे तरुण पिढीवर पक्षाची जिल्ह्यातील जबाबदारी आली. अनेक आक्रमणे आमच्यावर झाली पण काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे आम्ही टिकून राहिलो. जिल्ह्यात 200 किलोमीटर आम्ही जनसंवाद पदयात्रा काढली. काँगेसची जागा ही काँग्रेसला मिळाली पाहिजे हा आग्रह होता.  आमच्यात गटबाजी होती, पण यावेळी आम्ही गटबाजीला पूर्णविराम दिला. एकच काँगेस पक्ष हा एकच गट आहे, असं विश्वजीत कदम यांनी सांगितलं.

लोकसभा लढवण्याचा मलाही आग्रह

मलाही सतत लोकसभा लढवण्याचे आवाहन करण्यात आले.  मात्र मी विधानसभा लढवण्यावर  ठाम राहिलो, कारण पतंगराव कदम यांच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचे नव्हते.  एका तरुण सहकाऱ्याला तयार करून मी लोकसभेसाठी एकजण तयार केले. नावदेखील लोकसभेसाठी पाठवले. 

ठाकरेंनी सांगलीची जागा कशी काय जाहीर केली?

जिल्ह्यात एकसंघ काँग्रेस ठेवली, पण 3 महिन्यात खूप काही घडले. सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील असे सांगितले आणि आम्ही लोकांना सांगत गेलो की यंदा काँग्रेसचा खासदार असेल.  पण जागा वाटप चर्चा सुरू झाल्यावर सांगली आणि कोल्हापूरचा संबंध कुठे आला?  शाहू महाराज ज्या पक्षाकडून लढतील त्यावर ते लढतील, असे ठरले होते, सांगलीवर कसा काय हक्क सांगितला?  उद्धव ठाकरे आले आणि चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली, हे असे चालते का? असा सवाल विश्वजीत कदम यांनी विचारला. 

दृष्ट काढता येईल 

सांगलीची  जागा देणे हे चुकीचेच होते. पण हे सगळे होत असताना कोण काय करत होते? सांगलीत आम्ही  सर्व काँगेस नेते एकत्र आलो आणि त्याला दृष्ट लागली, पण ती दृष्ट काढता देखील येईल. गल्ली टू दिली आम्ही विशाल ,जयश्री पाटील यांना सोबत घेऊन गेलो, काँगेसकडेच जागा राहावी यासाठी प्रयत्न केले. एकतर्फी कशी काय उमेदवारी जाहीर केली.राजकारणामध्ये वादळात दिवा लावायची माझी तयारी आहे. हे सगळे प्रयत्न करत असताना शेवटी काय झाले हे कार्यकर्ते विचारत होते. सापशिडीच्या खेळा प्रमाणे दुर्दैवाने आम्हला साप चावला. पण शेवटी विजय हा आमचाच असेल, असं विश्वजीत कदम म्हणाले. 

कटकारस्थान करणाऱ्यांना सोडणार नाही

ज्यांनी हे कटकारस्थान केले त्यांना सोडणार नाही. पतंगराव कदम यांचे गुण माझ्यात आहेत, तसेच माझ्यातील स्वत:चे गुणही आहेत.   विशाल पाटील यांना विनंती केली की भावा अपक्ष लढून नको. राज्यसभा भेटेल. पुढची लोकसभा लढवू, जिंकू. काँगेसचा हात टिकवण्याची जबाबदारी माझ्याकडे होती.  तोंडावरचा घास हिसकावून घेतला, पुन्हा असे होऊ देऊ नका, असं आवाहन विश्वजीत कदम यांनी केलं. 

संजय राऊतांवर हल्लाबोल

कुणाचे विमान कुठे गेले हे मला सांगायची गरज नाही. शेवटी सांगलीची जागा काँग्रेसकडे राहावी यासाठी चंद्रहार पाटील यांना विधापरिषद दिली अशीही ऑफर दिली. सांगलीत मविआच्या उमेदवारला मतदान होईल पण पुन्हा  मित्रपक्षांना समजावून सांगा, विधानसभेला पुन्हा हा वाद होणार नाही याची काळीज घ्या. याचा वचपा नक्की विधानसभामध्ये काढू, असा इशारा विश्वजीत कदम यांनी दिला. 

विधानसभेला आवाज काढायचा नाही

आम्ही सांगलीची जागा मिळावी ,हाताचा पंजा मिळावे यासाठी प्रयत्न केले. सांगलीतला आमचा तोंडावरचा घास हिसकावून घेतला. मित्रपक्षाला सांगा, 100 टक्के काँग्रेसची मते मिळणार आहेत, पण  सांगा,पुढे विधानसभेला आवाज काढायाचे नाही. यापुढे मी होऊ देणार नाही.  सांगली जिल्ह्याचे विमान छत्रपती शिवाजी महाराज,शाहू फुले यांच्या चरणी आहे,लँडिंग देखील तिथेचं होईल. व्यक्तीगत मला विरोधी पक्षाचा आमदार म्हणून खूप त्रास सहन केले आहे, असं विश्वजीत कदम म्हणाले. 

Vishwajeet Kadam speech Sangli video : विश्वजीत कदम यांचं संपूर्ण भाषण 

संबंधित बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले

व्हिडीओ

Maharashtra Winter Session Nagpur : उद्यापासून हिवाळी अधिवेशन, तापलं वातावरण Special Report
Jain Muni Kabutarkhana : कबुतरामुळे बिघडलं धर्मकारण, राजकारण Special Report
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता का नाही? Special Report
Pune NCP : पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी अजितदादांसोबत जाणार का? Special Report
Smruti & Palash Marriage : स्मृती मानधना- पलाश मुच्छलचं लग्न का मोडलं? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Embed widget