एक्स्प्लोर

"लोकल बंद झाली अन् माझ्या संसाराचा कणाच मोडला; उभ्या आयुष्यात पुन्हा लोकल बंद होऊ नये!"

संपूर्ण भारतामध्ये मार्च महिन्यापासून कोरोनाचं संक्रमण वाढत चाललेलं होतं. यामध्ये लोकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. यामध्ये प्रामुख्याने मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या लोकल सेवा बंद करण्यात आली.

मुंबई : लोकल ट्रेन ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. मुंबईसह उपनगरांमधील आणि मुंबई शेजारी असणाऱ्या जिल्ह्यांमधील नागरिक आपलं पोट भरण्यासाठी दररोज मुंबईत दाखल होत असतात, आणि रात्री पुन्हा आपल्या घरी निघून जातात. त्यांची ने-आण करण्यासाठी मुंबईची लोकल ट्रेन हा सर्वात मोठा दुवा आहे. मात्र कोरोनाचे संक्रमण वाढल्यामुळे केंद्र सरकारने लोकल सेवा बंद केली आणि मुंबईवर आपलं पोट भरणाऱ्या लाखो महिलांवर उपासमारीची वेळ आली होती. कालपासून पुन्हा लोकल सेवा सुरु झाल्यामुळे या लाखो महिलांच्या डोळ्यांमध्ये पुन्हा जिद्द आणि आशेचा किरण दिसू लागला आहे.

संपूर्ण भारतामध्ये मार्च महिन्यापासून कोरोनाचं संक्रमण वाढत चाललेलं होतं. यामध्ये लोकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. यामध्ये प्रामुख्याने मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या लोकल सेवा बंद केल्यामुळे मुंबईकरांचे हाल होणार हे निश्चित होतं. कोरोनाच्या काळातील चार महिने लॉकडाऊनमध्ये मुंबईकर महिलांनी कसेबसे दिवस काढले. लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता मिळाल्यानंतर आपल्या संसाराला हातभार लागावा म्हणून दररोज लाखो महिला मुंबई , उपनगर आणि मुंबई शेजारी असणाऱ्या जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या कामांसाठी मुंबईत दररोज दाखल होत होत्या. मात्र लोकल सेवा सुरु नसल्यामुळे दररोज सहा ते सात तासांचा बसचा प्रवास सहन करत या महिला जिद्दीने आपला दररोजचा प्रवास करत होत्या. अनेक महिलांचे संसार हे त्यांच्या कामावरच अवलंबून होते. त्यामुळे आपला संसार टिकविण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी या महिला रात्रंदिवस काबाडकष्ट करत मुंबईत दाखल होत असतात. लोकल सेवा बंद असल्यामुळे महिलांकडून वारंवार राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे लोकलसेवा सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र कोरोना संकट पाहता ही मागणी लवकर मान्य होईल अशी परिस्थिती नव्हती.

पाहा व्हिडीओ : लॉकडाऊननंतर महिलांचा लोकल प्रवास; प्रवासी महिलांना काय वाटतं?

ठाकरे सरकारने राज्यामध्ये टप्प्याटप्प्याने अनलॉक करत अनेक गोष्टींना परवानगी दिल्या. मात्र मंदिर आणि लोकल सेवा यांना परवानगी देण्यात आली नव्हती. नवरात्र उत्सवाच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने आणि रेल्वे प्रशासनाने महिलांना लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. आजपासून सकाळी अकरानंतर सर्व महिलांसाठी लोकल सेवा सुरु झाली. गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून महिलांसाठी बंद असलेली लोकलसेवा आता सुरु झालेली आहे. त्यामुळे बस मधून सहा-सात तास प्रवास करत हाल-अपेष्टा सहन करणाऱ्या महिलांनी आनंद व्यक्त केलेला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली लोकल सेवा सुरु झाल्यासंदर्भात बदलापूरहून प्रवास करणाऱ्या रोहिणी सावंत म्हणाल्या की, 'मी गेली चार वर्ष बदलापूरहून सीएसटीला एका खाजगी कंपनीत कामासाठी येत आहे. घरामध्ये मी एकटीच कमावणारी आहे. त्यामुळे मला काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लोकल सेवा बंद झाली होती. यामध्ये आम्हाला कामावर येण्यासाठी दुसरा कुठलाच पर्याय उपलब्ध नव्हता. गेली दीड महिने मी बसने प्रवास करत आहे. मात्र या प्रवासामध्ये कामाचे आठ तास आणि प्रवासाचे सहा तास जात असल्यामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास मला मोठ्या प्रमाणात जाणवत होता. लवकरात लवकर लोकलसेवा सुरु व्हावी अशी मागणी करण्यात येत होती. आजपासून लोकल सेवा सुरु झाल्यामुळे मी ही सकाळी या लोकलने सीएसटीला आले. आजचा दिवस हा माझ्यासाठी खास असेच म्हणावे लागेल. कारण पुन्हा एकदा मी माझ्या कामावर रुजू होते. आणि पुन्हा वेळेत संध्याकाळी मी लोकलने घरी जाऊ शकते.'

तसेच लोकल सेवा सुरु झाल्याबाबत आनंद व्यक्त करत दररोज कल्याण ते सी. एस.टी. असा प्रवास करणाऱ्या आसावरी पाटील म्हणाल्या की, 'लोकल बंद झाली आणि माझ्या संसाराचा कणाच मोडला, पुन्हा उभ्या आयुष्यात लोकल बंद होऊ नये अशी प्रार्थना मी देवासमोर केलेली आहे. कारण मी काम केलं तरच माझं घर चालतं. परिस्थितीने मी खूप हतबल झालेली आहे . मुलांच्या शिक्षणासाठी आणि माझा संसार व्यवस्थित चालावा यासाठी मी घरातून बाहेर पडते. दररोज कल्याण ते सीएसटी प्रवास करते. सीएसटीला मी एका खाजगी कंपनीमध्ये रिसेप्शनिस्ट आहे. गेली अनेक वर्ष मी लोकल ट्रेन ने प्रवास करत आहे. मात्र सलग चार ते पाच महिने लोकल सेवा बंद पडेल असं कधीच स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. कोरोना आला आणि अनेक समस्या निर्माण झाल्या. या कालावधी मध्ये माझ्या पतीची नोकरीही गेली. सध्या ते कामाच्या शोधात आहेत. गेली चार महिने आम्ही घरीच असल्यामुळे आम्हाला अनेक आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलेलं आहे . पुन्हा अशी परिस्थिती आमच्यावर येऊ नये यासाठी मी दररोज देवाकडे हात जोडत आहे.'

महत्त्वाच्या बातम्या : 

सात महिन्यांनी महिलांचा रेल्वे प्रवास, लोकलमधून प्रवासाची परवानगी मिळाल्याचा आनंद

महत्त्वाच्या बातम्या

चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
Vishakha Raut : उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
Mumbai Ganeshotsav 2026 Local Train And Metro: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश
गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget