एक्स्प्लोर

Shiv Jayanti 2022 : शिवजयंतीच्या तारखेचा वाद कसा मिटला? सर्व प्रकरण समजून घ्या... 

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 : छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म नक्की कोणत्या तारखेला झाला, त्या दिवशी कोणती तिथी होती, जयंती तारखेने साजरी करायची की तिथीने? हे पुन्हा समजून घ्यावे लागेल. 

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 : गेली अनेक दशके महाराष्ट्रात शिवजयंती नक्की कोणत्या तारखेला साजरी करायची यावर वाद-प्रतिवाद आहेत. तिथीनुसार आज मनसे नेते राज ठाकरे यांनी शिवजयंती साजरी केली. ते पाहून आजवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केले नाही ते उद्धव ठाकरेंनी केले. मुख्यमंत्र्यांनीही आज शिवजयंती साजरी केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म नक्की कोणत्या तारखेला झाला, त्या दिवशी कोणती तिथी होती, जयंती तारखेने साजरी करायची की तिथीने? हे पुन्हा समजून घ्यावे लागेल. 
 
शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्र सरकार फाल्गुन वद्य तृतिया, शके 1551 शुक्ल संवत्सर या तिथीनुसार की 19 फेब्रुवारी हा जन्म दिवशी साजरी करायची हा वाद नेमका समजून घेऊयात...

पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख वैशाख शुद्ध द्वितिया शके 1549 मानली जात असे. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे हा दिवस होता 6 एप्रिल 1627. लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबाबत विशेष प्रयत्न करुन काही मते मांडली होती. 14 एप्रिल 1900 च्या दिवशी केसरीमध्ये छापलेल्या लेखात त्यांनी याचा सविस्तर ऊहापोह केला होता. बखरकारांनी वेगवेगळ्या नोंदी केल्यामुळे शिवाजी महाराजांची जन्मतारीख नक्की कोणती असावी यावर एकमत नव्हते. पण हा वाद मिटला होता. 
 
हे तीन मुद्दे महत्वाचे...

1) कवी भूषण यांनी 'शिवभूषण' या काव्यात शिवाजी महाराजांच्या जन्मतारीख दिलेली नाही.
2) सभासद बखर ही शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुमारे पंधरा वर्षांनी लिहिली गेली. त्यामध्येही तारखेचा उल्लेख नाही. 
3) मल्हार रामराव चिटणीस यांनी लिहिलेल्या बखरीमध्ये वैशाख शुद्ध द्वितीया शके 1549 गुरुवार असा उल्लेख आहे. त्यानुसार इंग्रजी तारीख पडताळली तर ती 6 एप्रिल 1627 येते. 

जोधपूरमध्ये सापडलेली शिवाजी महाराजांची जन्मपत्रिका शिवाजी महाराजांचा जन्म 1630 साली झाला हे सिद्ध करणारा एक महत्त्वाचा पुरावा आहे. सुरुवातीच्या काळात शिवाजी महाराजांचा जन्म शके 1549 मधल्या वैशाख महिन्यात झाला असावा असे मानले जात होते. 1916 साली सापडलेल्या एका दस्तऐवजानंतर मात्र ही परिस्थिती बदलली. हा दस्तऐवज म्हणजे प्रसिद्ध जेधे शकावली. या शकावलीमध्ये दिलेल्या नोंदीनुसार लोकमान्य टिळकांनी 19 फेब्रुवारी 1630 असल्याचे घोषित केले.
 
शिवजयंती नक्की कधी साजरी करायची आणि महाराजांची जन्मतारीख कोणती होती हा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक समिती 1966 साली स्थापन केली. परंतु समितीत एकमत झाले नाही. समितीने जन्मतारखेबाबतचा निर्णय शासनाकडेच सोपवला. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर आप्पासाहेब पवार यांच्या अध्यक्षतेखाली सहा ते सात जणांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने वेगवेगळ्या ऐतिहासिक दस्तांचा अभ्यास करून छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख ही 19 फेब्रुवारी 1630 आहे हे अंतिम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्म वर्ष 1627 नसून 1630 आहे हेही या समितीने सांगितलं. परंतु समितीने आपला अहवाल देत असताना लोक भावना हा भाग लक्षात घ्यावा अशा पद्धतीची भूमिका मांडली.
 
2000 साली विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना शिवजंयतीच्या तारखेचा विषय पुन्हा आला.  विलासरावांनी शिवजयंती 19 फेब्रुवारी साजरी केली जाईल असे आदेश जारी केले. 2000 पासून राज्याचा प्रत्येक मुख्यमंत्री हा 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करतो. आज त्याला मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे छेद गेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget