एक्स्प्लोर

Airtel 5G : एअरटेलची 5G सेवा ऑगस्टमध्ये सुरु होणार; एरिक्सन, नोकिया, सॅमसंगसोबत झाला करार  

Airtel 5G : भारताची आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल ऑगस्ट 2022 मध्ये 5G सेवा सुरु करणार आहे.

Airtel 5G : भारताची आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल ऑगस्ट 2022 मध्ये 5G सेवा सुरु करणार आहे. त्यासाठी एअरटेल कंपनीने एरिक्सन, नोकिया, सॅमसंगसोबत आज करार केला. त्याअंतर्गत या महिन्यात उपकरणांची तैनाती सुरू केली जाणार आहे. नुकताच 5G चा झालेला लिलावात एअरटेलने बाजी मारली होती.  भारती एअरटेलने 43,084 कोटी रुपयांची स्पेक्ट्रम खरेदी केली होती.  सुनील मित्तल यांच्या नेतृत्वातील कंपनीने नुकतेच 900 मेगाहर्ट्ज, 1800 मेगाहर्ट्ज, 2100 मेगाहर्ट्ज, 3300 मेगाहर्ट्ज आणि 26 गीगाहर्ट्ज बँडमध्ये 19,867.8 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रम मिळवले आहे. 

एअरटेलची यशस्वी टेस्टिंग -  
5G तंत्रज्ञानाच्या दिशेने भारत वेगाने वाटचाल करत आहे. भारतात 5G तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी झाली आहे. आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने (Bharti Airtel) हैदराबादमध्ये 5G तंत्रक्षानाची यशस्वी चाचणी केली होती. 5G तंत्रज्ञानाच्या चाचणीदरम्यान हैदराबादमध्ये 1 जीबी फाईल अवघ्या 30 सेकंदात डाऊनलोड झाली. त्याशिवाय, एअरटेलने नोकिया (Nokia) सोबत कोलकाता शहराबाहेर 700 MHz स्पेक्ट्रम बँडमध्ये पहिली 5G चाचणी यशस्वीपणे पार पाडली. भारतातील ग्रामीण भागात करण्यात आलेली ही पहिली 5G चाचणी होती. 

दहा पटीने इंटरनेट स्पीड - 
भारतात 5G तंत्रज्ञानाची सुरुवात झाल्यानंतर दहा पटीने इंटरनेटचा स्पीड जास्त वाढेल. त्यामुळे मोबाईल वापरणाऱ्यांचं आयुष्य बदलून जाईल. सध्या असलेल्या 4G इंटरनेटचा स्पीड इतका चांगलाय. विचार करा 5G तंत्रज्ञानात इंटरनेटचा स्पीड किती असेल. तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 5G चा स्पीड हा 4G च्या तुलनेत दहा पटीने जास्त असेल. 5G तंत्रज्ञानाला सुरुवात झाल्यानंतर अनेक रोजगार उपलब्ध होतील. ऑटोमेशन वाढेल. आतापर्यंत फक्त मोठ्या शहरांपर्यंत मर्यादीत असणाऱ्या गोष्टी गाव-खेड्यातही उपलब्ध होतील. ज्यामध्ये ई-मेडिसीन, शिक्षण या क्षेत्रांचा समावेश असेल. त्याशिवाय 5G तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रालाही मोठा फायदा होईल.  5G तंत्रज्ञानामुळे डिजिटल क्रांतीला नवी दिशा मिळणार आहे. त्याशिवाय इंटरनेट ऑफ थिंग्स, उद्योग आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानातही मोठे बदल होणार आहेत. 5G तंत्रज्ञानामुळे नवे रोजगार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळेच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल. तसेच ई-गवर्नेंसचाही विस्तार होईल.  5G तंत्रज्ञानामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. ई-कॉमर्स, आरोग्य केंद्र, दुकानदार, शाळा, महाविद्यलय, कॉलेज, इतकेच नाही तर शेतकरीही याचा फायदा घेतील.  कोरोना महामारीच्या काळात आपण सगळे जवळपास इंटरनेटवरच अवलंबून होतो, हे पाहाता आपण इंटरनेटवर खूप निर्भर असल्याचं दिसतेय. हे सर्व पाहाता 5G आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. 5G तंत्रज्ञानामुळे  हेल्थकेअर, व्हर्चुअल रियालिटी, क्लाउड गेमिंग यासाठी नवीन रस्ते खुले होतील. तसेच विनाचालक गाडी सुरु होण्याच्या दिशेनेही पावले उचलली जातील.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
IND vs PAK Asia Cup U19 : भारताच्या पोरांनी पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...

व्हिडीओ

Lionel Messi Mumbai Wankhede : फुटबॉल चाहत्यांची आतुरता संपली वानखेडेवर मेस्सीची पहिली झलक!
Rahul Narvekar Nagpur : आज अधिवेशनात विरोधी नेते पदाचा निकाल लागणार? राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले..
Devendra Fadnavis vs Siddharth Kharat : तुम्हाला सभागृहाची शिस्त माहिती नाही,फडणवीस चिडले
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
IND vs PAK Asia Cup U19 : भारताच्या पोरांनी पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Embed widget