एक्स्प्लोर

Udhhav Thackeray : 'ज्या हेलिकॉप्टरने गावाकडे जाता, त्याचं हेलिकॉप्टरने शेतकऱ्यांच्या बांधावर या', उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं

Ahmednagar : उद्धव ठाकरे अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात दुष्काळी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कोपरगाव, संगमनेर (Sangamner) आदी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या संवाद साधला.

नाशिक : 'कोणीतरी सांगितलं की मुख्यमंत्री चार-चार दिवस झोपत नाहीत आणि मग आराम करण्यासाठी गावाकडे हेलिकॉप्टरने जातात, मात्र मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे की हेच हेलिकॉप्टर घेऊन जरा शेतकऱ्यांच्या बांधावरही फेरफटका मारून या, इथल्या साध्याभोळ्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्या, असे आवाहनच उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी यावेळी केलं. 

आज उद्धव ठाकरे अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात दुष्काळी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कोपरगाव, संगमनेर (Sangamner) आदी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या संवाद साधला. अनेक भागात पावसाअभावी पिके कोमेजली आहेत, गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या सगळ्यात शेतीच्या नुकसानीची सरकारने दखल घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांना करण्यात आली. या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांच्या सरकारपर्यंत पोहचविणार असल्याचे सांगितले. यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता जोरदार टोला लगावला आहे. गावाकडच्या पंचतारांकित शेतीपेक्षा इथल्या मातीतल्या शेतीत एकदा भेट द्या, असं आवाहनच ठाकरे यांनी केले. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, एकूणच महाराष्ट्र दुष्काळाच्या (Maharashtra Drought) उंबरठ्यावर आहे. आता काही भागात पाऊस पडत असला तरी हा पाऊस किती दिवस बरसणार आहे, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. या पावसाने पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटू शकेल, पण दुबार पेरणी केलेल्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालंय, त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावीच लागणार आहे. अनेक पिकं करपून गेली आहेत. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीची भरपाई देखील अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही, मग आता करपून गेलेल्या पिकांचे पंचनामे कधी होतील? नुकसान भरपाई कधी मिळेल? दरम्यान सरकारने एक रुपयात पिक विमा काढण्याचे शेतकऱ्यांना सांगितले, मात्र पिकांचे पंचनामे कधी करणार आणि शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. 

'तीन तिघाडा काम बिघाडा' सरकार

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, सरकार नुसतं थापा मारत असून तिघाडा सरकार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. 'तीन तिघाडा काम बिघाडा' असा सरकार असून स्वतःचे कार्यक्रम जोरात सुरू आहेत. जाहिराती जोरात करत आहेत. त्या जाहिरातींवर खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांना हक्काचे पैसे सरकारने दिले पाहिजेत. पक्ष फोडायला यांच्याकडे पैसे आहेत, मात्र शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी यांना पैसे नाहीत, हे महाराष्ट्रातील भीषण वास्तव आहे. आराम करायला हेलिकॉप्टरने शेतात जात आहेत, त्यांनी या शेतकऱ्याकडे यावं, इथली परिस्थिती बघावी, काही काळ आपण वाट बघू पण त्यानंतर सरकारला जाब विचारवाच लागेल. त्यानंतरही मी या भागात अनेक दौरे करणार आहे. सध्या काही भागात पाऊस सुरू आहे. हा पाऊस असाच बरसत राहो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटो अशी प्रार्थना साईचरणी करत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 


इतर महत्वाची बातमी : 

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे बांधावर, शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या, ठेचा भाकरीची शिदोरी घेऊन निघाले... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget