एक्स्प्लोर
India-China face-off | भारत-चीन सैन्यात झटापट; तीन भारतीय जवान शहीद
भारत आणि चीन सीमेवर तणाव वाढला आहे. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये हिंसक झडप झाली. या झडप भारताचे तीन सैनिक शहीद झाले असून त्यात एक अधिकारी आणि दोन जवानांचा समावेश आहे. या झटापटीत चीनचे काही जवान ठार झाल्याचंही म्हटलं जात आहे. भारत आणि चीनमध्ये मागील अनेक वर्षांपासून लडाखवरुन वाद सुरु आहे आणि तो आता आणखी चिघळला आहे. गलवान खोऱ्याजवळ सोमवारी (15 जून) रात्री दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये हिंसक झडप झाली, ज्यात एका अधिकाऱ्यासह दोन जवानांना वीरमरण आलं.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















