एक्स्प्लोर

Satara Crime News: पतीशी भांडण अन् माहेरी वास्तव्य, घराशेजारील व्यक्तीशी ओळख नंतर प्रेमसंबधातून महिलेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला, जबडाच फाडला त्यानंतर...

Satara Crime News: हल्ला केल्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला आहे, त्याला शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना केली आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

कराड : प्रेमसंबधातून एका महिलेवर तरूणाने कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आगाशिवनगर (मलकापूर) ता. कराड येथील दांगट वस्ती येथे प्रेमसंबधातून एकाने 30 वर्षीय महिलेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेवर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. महिलेवर झालेल्या गंभीर हल्ल्यात जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे तिची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी महिलेच्या वडिलांनी कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. रविंद्र सुभाष पवार (वय 35) रा. दांगट वस्ती, आगाशिवनगर (मलकापूर) असे हल्ला केलेल्याचे नाव आहे. हल्ला केल्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला आहे, त्याला शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना केली आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला झालेली संबधित महिला ही विवाहित असून नवऱ्याला सोडून ती दांगट वस्ती येथे आई-वडिलांकडे वास्तव्यास आहे. महिलेला तीन मुले आहेत. जवळच राहणाऱ्या हल्लेखोर रविंद्र याच्याशी तिची पूर्वीची ओळख असून तिचे हळूहळू ओळखीतून त्याच्याशी प्रेमसंबधही निर्माण झाले. गुरुवारी दुपारी रविंद्र तिच्या घरी गेला होता. त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं. त्यावेळी वाद झाले आणि त्यानंतर रविंद्रने तिच्यावर थेट कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या कानापासून जबड्यापर्यंत वार गेल्याने तिचा जबडा पूर्णपणे फाटला आणि ती गंभीर जखमी झाली आहे.

हल्ला झालेल्या महिलेवरती कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हल्ल्यामध्ये महिला गंभीर जखमी झालेली पाहिल्यानंतर हल्लेखोर रविंद्र घटनास्थळावरून पसार झाला होता. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली आहेत. याप्रकरणी गंभीर जखमी झालेल्या महिलेच्या वडिलांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. घटनास्थळी पोलीस उप अधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरिक्षक राजू ताशिलदार यांनी भेट देवून पाहणी करून घटनास्थळचा पंचनामा केला. याप्रकरणी कराड शहर पोलीस तपास करत आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण काय?

आगाशिवनगर (मलकापूर) ता. कराड येथील महिलेचं लग्न झालं असून नवऱ्यासोबत भांडण आणि वाद झाल्यामुळे ती महिला आपल्या माहेरी राहत होती. त्या महिलेला 3 मुले आहेत. या महिलेचा आरोपी रवींद्र याच्याशी पूर्वीची ओळख आहे. या परिचयातूनच त्यांची ओळख वाढली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. गुरुवारी दुपारी रवींद्र त्या महिलेच्या घरी गेला होता त्यांच्यात काही कारणास्तव वाद झाला. त्यानंतर रवींद्रने महिलेवर धारदार कोयत्याने वार केला. कोयत्याने केलेल्या हल्ल्यात तिच्या कानापासून जबड्यापर्यंत वार केला गेला आणि त्यामुळे ती महिला गंभीर जखमी झाली आहे.

हल्ला केल्यानंतर रवींद्र पवार घटनास्थळावरून पसार झाला. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. तर पीडित महिलेच्या वडिलांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी भेट देऊन घटनास्थळी पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामाही केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कराड शहर पोलीस करत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Manikrao Kokate : शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
Dada Khindkar : दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report |Yujvendra Chahal : चहलसोबतची 'ती' मुलगी कोण? चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर सर्वत्र चर्चाABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04PM 13 March 2025Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha | 13 March 2025Buldhana Farmer Death | पाण्याच्या संघर्षाला कंटाळून शेतकरी कैलास नागरे यांनी संपवलं जीवन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Manikrao Kokate : शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
Dada Khindkar : दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
Nashik Crime : दीड वर्षांच्या चिमुकलीचा वडिलांनी केला दफनविधी; आईला घातपाताचा संशय; नाशिक पोलिसात तक्रार, पोलिसांनी मृतदेह वरती काढला अन्..
दीड वर्षांच्या चिमुकलीचा वडिलांनी केला दफनविधी; आईला घातपाताचा संशय; नाशिक पोलिसात तक्रार, पोलिसांनी मृतदेह वरती काढला अन्..
Weather Update : होळीपूर्वीच गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानमधील अनेक भाग उष्णतेच्या तडाख्यात; 40 अंशांचा टप्पा ओलांडला
होळीपूर्वीच गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानमधील अनेक भाग उष्णतेच्या तडाख्यात; 40 अंशांचा टप्पा ओलांडला
छत्रपती शिवरायांचा जन्मच मुघल आक्रमण संपवण्यासाठी झाला होता, अमोल मिटकरींचा इतिहास कच्चा, भातखळकरांचा हल्लाबोल
छत्रपती शिवरायांचा जन्मच मुघल आक्रमण संपवण्यासाठी झाला होता, अमोल मिटकरींचा इतिहास कच्चा, भातखळकरांचा हल्लाबोल
Embed widget