एक्स्प्लोर

आमच्यासारखं तुम्हालाही लोक घरी पाठवतील : अजित पवार

बाहेरुन आलेले सगळे निघून जातील, आणि भाजपमध्ये फक्त जुने जनसंघवाले आणि रा. स्व. संघाला मानणारेच शिल्लक राहतील, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

नागपूर : भाजपमध्ये आलेले लोकही नाराज होऊन पक्ष सोडून चालले आहेत. काही तरी निर्णय घ्या, नाहीतर भाजपमध्ये केवळ जुने संघवालेच शिल्लक राहतील, अशी टोलेबाजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. त्याचप्रमाणे तीन वर्षांपूर्वी जसे लोकांनी आम्हाला घरी पाठवले होते, तसे ते आता तुम्हाला घरी पाठवतील, असा उपरोधिक सल्ला अजित पवार यांनी दिला. सरकारवर जोरदार टीका करताना कर्जमाफीबरोबरच शेतमालाच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. सरकार घोषणा भरपूर करते, परंतु काम काही करत नाही. कर्जमाफीचा निर्णय घेऊन लोकांचा सातबारा कोरा केल्याच्या जाहिराती सरकारने केल्या. पण चार महिने होऊन गेले, तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. सुरुवातीपासून सरकारची कर्जमाफी देण्याची मानसिकताच नव्हती. जेव्हा जेव्हा आम्ही ही मागणी केली तेव्हा, योग्य वेळ आली की कर्जमाफी देऊ, असं उत्तर दिलं गेलं, असं अजित पवार म्हणाले. विरोधकांनी संघर्ष यात्रा काढल्यावर  सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आणि इच्छा नसताना कर्जमाफीची घोषणा सरकारला करावी लागली. मात्र आजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. सरकार चालवायला धमक लागते, योग्य निर्णय घेण्याची क्षमता लागते, अशी खरपूस टीका अजित पवार यांनी केली. भाजपच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे भाजपचेच आमदार-खासदार नाराज आहेत. नाना पटोले यांनी राजीनामा दिला तर आशिष देशमुख यांनीही नाराजीचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. हे असेच सुरु राहिलं तर बाहेरुन आलेले सगळे निघून जातील, आणि भाजपमध्ये फक्त जुने जनसंघवाले आणि रा. स्व. संघाला मानणारेच शिल्लक राहतील, असा टोला अजित पवार यांनी लगावला. राज्यातील कापूस, धान ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. आता केवळ कर्जमाफी करुन चालणार नाही, तर शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव द्यावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतमालाला भाव देऊ असे वचन विदर्भात येऊन दिलं होतं, पण ते पूर्ण केलं नाही. लोकांची सहनशीलता संपत आली आहे. काहीतरी निर्णय घ्या. नाही तर तीन वर्षांपूर्वी जसे लोकांनी आम्हाला घरी पाठवले होते, तसे ते आता तुम्हाला घरी पाठवतील, असा उपरोधिक सल्ला अजित पवार यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: मुंबईत पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; नोकरदारांचा खोळंबा
Maharashtra Breaking LIVE: मुंबईत पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; नोकरदारांचा खोळंबा
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: लग्नानंतर राजस्थानमध्ये सेटल होण्याचा होता प्लॅन, सिया करणार होती सर्व पैशांची सोय; चेतनच्या मित्रांचा खळबळजनक खुलासा
लग्नानंतर राजस्थानमध्ये सेटल होण्याचा होता प्लॅन, सिया करणार होती सर्व पैशांची सोय; चेतनच्या मित्रांचा खळबळजनक खुलासा
Ketan Agrawal Lohagadh Case Pune: केतन अग्रवाल प्रकरणात संशयाची सुई फिरली; सिया-चेतनसह आणखी कोणाचा सहभाग, ती व्यक्ती कोण?
केतन अग्रवाल प्रकरणात संशयाची सुई फिरली; सिया-चेतनसह आणखी कोणाचा सहभाग, ती व्यक्ती कोण?
Pune Rain Update: पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम; लोणावळ्यात मुसळधार पाऊस, जिल्ह्यात पुढील 5 दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज, तर...
पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम; लोणावळ्यात मुसळधार पाऊस, जिल्ह्यात पुढील 5 दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज, तर...

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rain Updates: मुंबईत मागील 24 तासांत अतिवृष्टी, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं, तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने; रस्तेही पाण्याने तुडुंब
मुंबईत मागील 24 तासांत अतिवृष्टी, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं, तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने; रस्तेही पाण्याने तुडुंब
Vaibhav Sooryavanshi Post Viral : आयर्लंडविरुद्ध प्लेईंग इलेव्हनमधून वगळलं, आता इंग्लंडविरुद्धही बेंचवर बसवलं; वैभव सूर्यवंशीची पोस्ट चर्चेत, एका शब्दात म्हणाला...
आयर्लंडविरुद्ध प्लेईंग इलेव्हनमधून वगळलं, आता इंग्लंडविरुद्धही बेंचवर बसवलं; वैभव सूर्यवंशीची पोस्ट चर्चेत, एका शब्दात म्हणाला...
Ketan Agrawal Case Pune: केतनला लोहगडावरुन ढकललं, पण त्याचा फोन सियाच्या हातात राहिला; कुटुंब गडावर पोहोचण्यापूर्वी काय केलं?, पोलीस तपासात माहिती समोर
केतनला लोहगडावरुन ढकललं, पण त्याचा फोन सियाच्या हातात राहिला; कुटुंब गडावर पोहोचण्यापूर्वी काय केलं?, पोलीस तपासात माहिती समोर
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: लग्नानंतर राजस्थानमध्ये सेटल होण्याचा होता प्लॅन, सिया करणार होती सर्व पैशांची सोय; चेतनच्या मित्रांचा खळबळजनक खुलासा
लग्नानंतर राजस्थानमध्ये सेटल होण्याचा होता प्लॅन, सिया करणार होती सर्व पैशांची सोय; चेतनच्या मित्रांचा खळबळजनक खुलासा
Pune Rain Update: पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम; लोणावळ्यात मुसळधार पाऊस, जिल्ह्यात पुढील 5 दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज, तर...
पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम; लोणावळ्यात मुसळधार पाऊस, जिल्ह्यात पुढील 5 दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज, तर...
Ketan Agrawal Lohagadh Case Pune: केतन अग्रवाल प्रकरणात संशयाची सुई फिरली; सिया-चेतनसह आणखी कोणाचा सहभाग, ती व्यक्ती कोण?
केतन अग्रवाल प्रकरणात संशयाची सुई फिरली; सिया-चेतनसह आणखी कोणाचा सहभाग, ती व्यक्ती कोण?
Maharashtra Rain Update: मुंबईसह 'या' चार जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तास महत्त्वाचे, हवामान विभागाकडून'रेड अलर्ट' जारी
मुंबईसह 'या' चार जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तास महत्त्वाचे, हवामान विभागाकडून'रेड अलर्ट' जारी
South Actress Kayadu Lohar: 'दगड उचलला आणि रस्त्यात सर्वांसमोर त्याच्या डोक्यात घातला...'; बड्या अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?
'दगड उचलला आणि रस्त्यात सर्वांसमोर त्याच्या डोक्यात घातला...'; बड्या अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?
Embed widget