Ration Card Rules : तुमच्याकडे चारचाकी गाडी आहे का? मग तुमचे रेशन कार्ड रद्द होणार
तुमच्याकडे चारचाकी गाडी किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर तुमचं रेशनकार्ड आता कायमचं बंद होणार आहे. कारण 1 एप्रिलपासून रेशनकार्डच्या नियमांत मोठा बदल होणार आहे.

तुमच्याकडे चारचाकी गाडी किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर तुमचं रेशनकार्ड आता कायमचं बंद होणार आहे. कारण 1 एप्रिलपासून रेशनकार्डच्या नियमांत मोठा बदल होणार आहे. ते बदल कोणते आपण जाणून घेऊयात. तुम्ही जर रेशनकार्ड वापरत असाल तर सावधान, कारण आता तुमचं रेशन कार्ड बंद देखील होऊ शकतं. कारण देशात वन नेशन वन रेशनकार्ड ही संकल्पना लागू केली जाणार आहे.
नवीन नियमांनुसार, रेशन कार्डची पात्रता आणि निकष अजूनच कडक करण्यात आले आहेत. याद्वारे फक्त निकषात बसणाऱ्या रेशन कार्डधारकांनाच मोफत धान्य मिळणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने रेशन कार्डबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. गरजू व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ज्या व्यक्ती निकषात बसत नाही, ज्यांचे उत्पन्न जास्त आहे अशा व्यक्तींचे रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे. यामध्ये जवळपास 70 लाख रेशनकार्ड बंद केले जाऊ शकतात.
रेशन कार्डच्या नवीन नियमानुसार शहरी भागासाठी उत्पन्नाची मर्यादा ३ लाख निश्चित करण्यात आली आहे. तर ग्रामीण भागासाठी २ लाखांची मर्यादा आहे. त्यामुळे यापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला रेशन कार्डचा लाभ घेता येणार नाही. ज्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे. 100 चौरस मीटरपेक्षा जास्त प्लॉट, प्लॅट किंवा स्वतःचे घर असेल तर तुम्ही अपात्र आहात. घरातील कोणतीही व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असेल तर त्यांचे रेशन कार्ड बंद होणार आहे, घरात एसी किंवा जनरेटर असेल तर तुमचेही रेशन कार्ड रद्द केले जाऊ शकते.
यासोबतच जर तुम्ही चुकीची माहिती देऊन रेशन कार्ड वापरत असाल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होई शकते.त्यासाठी केवायसी देखील बंधनकारक करण्यात आलीये. आणि केवायसी नाही केली तरीही रेशन कार्ड बंद करण्यात येणार आहे. याची केवायासी तुम्ही रेशन दुकानदाराकडे करू शकता..
महत्त्वाच्या बातम्या






















