एक्स्प्लोर

पानमळ्याचा शेतकरी आजही लॉकडाऊन मध्येच!

लॉकडाऊन शिथील केल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पानमळे असलेला शेतकरी आद्यापही लॉकडाऊनमध्येच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पानपट्ट्या आणि साहळे रद्द असल्याने या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलीय.

सातारा : लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात शेतकऱ्यांनाही हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. काही अंशी शिथिलता दिल्यानंतर सध्या सर्वच शेतकरी सुखावला असला तरी आजही खाण्याच्या पानांचे पानमळे असलेला शेतकरी आद्यापही लॉकडाऊनमध्येच आहे.

पिढीजात पानमळ्याची शेती करणाऱ्या सामान्य कुटुंबातल्या रुपाली आणि गणेश दळवी या शेतकरी दाम्पत्यावर आता कोरोनानं मोठा घाला घातला आणि संपुर्ण कुटुंबावर जनू संकटाची कु-हाडच कोसळली. लॉकडाऊनमुळे शेतातलं एक पानही बाजारात विकता आले नाही. त्यामुळं या कुटंबाचं तब्बल पाच लाखाचं नुकसान झाल. पै-पै साठवून पानमळ्याची शेती करणाऱ्या या शेतकऱ्याला आता आपले आश्रू लपवता येत नाहीत.

पशुसंवर्धनाला फटका लॉकडाऊनचा की काँग्रेसकडील खात्याचा?

कधी काळी सातारा जिल्ह्यातील आर्वी हे गाव फक्त आणि फक्त खाऊच्या पानाचं उत्पन्न घेणार गाव म्हणून ओळखल जायचं. संपुर्ण जग थांबल आणि या आर्वीकरांच्या पायाखालची वाळूच सरकली. कारण लॉकडाऊन झाल्यापासून आजपर्यंत बाजारात खाऊची पानं विकली जात नाहीत. लॉकडाऊन शिथील केला असला तरी आजही पानपट्यांना प्रशासनाची बंदी आहे. अनेक सोहळ्यांना जाणारा माल बंद झाला, विमान सेवा बंद असल्यामुळे देशाबाहेर जाणारी पानही जाऊ शकत नाहीत. त्यामुळ या भागातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.

जनावरांना वेली उपटून घालण्याची वेळ शेतातला माल विकला जात नाही म्हणून या भागातील शेतकरी दादासाहेब चव्हाण यांनी तर आपल्या शेतातल्या पानांच्या वेली उपटून त्या गाई म्हशींना चारा म्हणून टाकायला सुरुवात केलीय. कोरोनानं या पानमळ्याच्या शेतकऱ्याचा एका बाजूला घात केला तर दुसरीकडे काही दिवसापुर्वी झालेल्या चक्रीवादळानही मोठ नुकसान केलंय. दोनच खोडा झालेल्या या पानमळ्यातील शेताला चक्री वादळान झोपवलं. सुमारे 15 ते 20 फुटापर्यंत वाढलेला पानाचा वेल आज जमिनीदोस्त झाला आहे.

कोल्हापुरात मुसळधार पाऊस, पंचगंगेचं पाणी वाढल्याने सतर्क राहण्याचं आवाहन

सरकारकडून मदतीची अपेक्षा

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाऊन शिथील करुन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला खरा मात्र हा पानमळ्याचा शेतकरी असा एक वर्ग आहे की त्यांना शिथीलता मिळूनही ते आजही लॉकडाऊनमध्येच अडकलेत. सातारा जिल्ह्यात सुमारे 300 एकर पेक्षा जास्त शेतक-यांच नुकसान झालय. एकरी 20 लाख रुपये विचार केला तर नुसत्या सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं किती आणि राज्यातील पानमळेधारक शेतकऱ्यांचा विचार केला तर हा आकडा म्हणजे न विचार केलेलाच बरा. त्यामुळे शेतकऱ्यांची आस्था असणाऱ्या मुख्यमंत्रांनी आता पानमळेधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकड लक्ष दिले पाहिजे.

Sarus Crane | प्रेमाचं प्रतिक असलेल्या 'सारस' पक्षांच्या गणनेला सुरुवात

एबीपी माझाच्या स्थापनेपासून कार्यरत, 22 वर्षाच्या पत्रकारीतेचा अनुभव, व्यंगचित्रकार म्हणून सुरवात!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget