एक्स्प्लोर

पानमळ्याचा शेतकरी आजही लॉकडाऊन मध्येच!

लॉकडाऊन शिथील केल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पानमळे असलेला शेतकरी आद्यापही लॉकडाऊनमध्येच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पानपट्ट्या आणि साहळे रद्द असल्याने या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलीय.

सातारा : लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात शेतकऱ्यांनाही हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. काही अंशी शिथिलता दिल्यानंतर सध्या सर्वच शेतकरी सुखावला असला तरी आजही खाण्याच्या पानांचे पानमळे असलेला शेतकरी आद्यापही लॉकडाऊनमध्येच आहे.

पिढीजात पानमळ्याची शेती करणाऱ्या सामान्य कुटुंबातल्या रुपाली आणि गणेश दळवी या शेतकरी दाम्पत्यावर आता कोरोनानं मोठा घाला घातला आणि संपुर्ण कुटुंबावर जनू संकटाची कु-हाडच कोसळली. लॉकडाऊनमुळे शेतातलं एक पानही बाजारात विकता आले नाही. त्यामुळं या कुटंबाचं तब्बल पाच लाखाचं नुकसान झाल. पै-पै साठवून पानमळ्याची शेती करणाऱ्या या शेतकऱ्याला आता आपले आश्रू लपवता येत नाहीत.

पशुसंवर्धनाला फटका लॉकडाऊनचा की काँग्रेसकडील खात्याचा?

कधी काळी सातारा जिल्ह्यातील आर्वी हे गाव फक्त आणि फक्त खाऊच्या पानाचं उत्पन्न घेणार गाव म्हणून ओळखल जायचं. संपुर्ण जग थांबल आणि या आर्वीकरांच्या पायाखालची वाळूच सरकली. कारण लॉकडाऊन झाल्यापासून आजपर्यंत बाजारात खाऊची पानं विकली जात नाहीत. लॉकडाऊन शिथील केला असला तरी आजही पानपट्यांना प्रशासनाची बंदी आहे. अनेक सोहळ्यांना जाणारा माल बंद झाला, विमान सेवा बंद असल्यामुळे देशाबाहेर जाणारी पानही जाऊ शकत नाहीत. त्यामुळ या भागातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.

जनावरांना वेली उपटून घालण्याची वेळ शेतातला माल विकला जात नाही म्हणून या भागातील शेतकरी दादासाहेब चव्हाण यांनी तर आपल्या शेतातल्या पानांच्या वेली उपटून त्या गाई म्हशींना चारा म्हणून टाकायला सुरुवात केलीय. कोरोनानं या पानमळ्याच्या शेतकऱ्याचा एका बाजूला घात केला तर दुसरीकडे काही दिवसापुर्वी झालेल्या चक्रीवादळानही मोठ नुकसान केलंय. दोनच खोडा झालेल्या या पानमळ्यातील शेताला चक्री वादळान झोपवलं. सुमारे 15 ते 20 फुटापर्यंत वाढलेला पानाचा वेल आज जमिनीदोस्त झाला आहे.

कोल्हापुरात मुसळधार पाऊस, पंचगंगेचं पाणी वाढल्याने सतर्क राहण्याचं आवाहन

सरकारकडून मदतीची अपेक्षा

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाऊन शिथील करुन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला खरा मात्र हा पानमळ्याचा शेतकरी असा एक वर्ग आहे की त्यांना शिथीलता मिळूनही ते आजही लॉकडाऊनमध्येच अडकलेत. सातारा जिल्ह्यात सुमारे 300 एकर पेक्षा जास्त शेतक-यांच नुकसान झालय. एकरी 20 लाख रुपये विचार केला तर नुसत्या सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं किती आणि राज्यातील पानमळेधारक शेतकऱ्यांचा विचार केला तर हा आकडा म्हणजे न विचार केलेलाच बरा. त्यामुळे शेतकऱ्यांची आस्था असणाऱ्या मुख्यमंत्रांनी आता पानमळेधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकड लक्ष दिले पाहिजे.

Sarus Crane | प्रेमाचं प्रतिक असलेल्या 'सारस' पक्षांच्या गणनेला सुरुवात

एबीपी माझाच्या स्थापनेपासून कार्यरत, 22 वर्षाच्या पत्रकारीतेचा अनुभव, व्यंगचित्रकार म्हणून सुरवात!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी

व्हिडीओ

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
Embed widget