एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack: दहशतवादी पाकिस्तानमधून आल्याचं तुम्हाला इतकं लगेच कसं समजलं?; सिंधूचे पाणी अडवायला 20 वर्षे लागतील- शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती

Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati On Pahalgam Terror Attack: सिंधू करार रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरही शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी भाष्य केलं आहे.

Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati On Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) देशातील लोकांमध्ये संताप आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा जीव गेला. याचदरम्यान, जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती (Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati) यांनीही मोठं वक्तव्य करून या हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच सिंधू करार रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरही शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी भाष्य केलं आहे.

पाकिस्तानला आपण धडा शिकवू...पण पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानातून आले होते की नाही, तुम्हाला कसे समजले? हे तुम्हाला इतक्या लवकर कसे कळले?, घटनेपूर्वी हे का कळले नाही? जर दहशतवादी पाकिस्तानातून आले असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केली आहे. आपल्या घरात एखादी घटना घडल्यास आपण सगळ्यात आधी कोणाला धरणार? सर्वात आधी तर चौकीदाराला पकडणार ना? त्याला विचारणार तू कुठे होतास? तू असताना ही घटना घडली कशी? तुला कशासाठी ठेवलंय? पण इथे तसं होताना दिसत नाही. इथे स्वत:ला चौकीदार म्हणवून घेतात. पण चौकीदारी नीट केली असती, असा हल्लाबोलही शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केला. 

तुमच्याकडे पाणी रोखण्यासाठी काही व्यवस्था आहे का?

सिंधू पाणी करार स्थगित करण्याबाबत स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले, तुम्ही म्हणत आहात की आम्ही सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. पण तुमच्याकडे पाणी रोखण्यासाठी काही व्यवस्था आहे का? आम्ही तज्ञांना विचारले की जर आपल्या देशात पाणी थांबवले तर आपल्याकडे कोणती व्यवस्था आहे? तज्ञांनी सांगितले की आपल्याकडे कोणतीही व्यवस्था नाही. जरी आपण आजपासून हे काम सुरू केले तरी किमान 20 वर्षे लागतील, त्यानंतर आपण सिंधू नदीचे पाणी रोखू शकू, असं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले. 

प्रत्येक हिंदूनं स्वत:च्या सुरक्षेसाठी सावध व्हावं-

स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे की, प्रत्येक हिंदूनं स्वत:च्या सुरक्षेसाठी सावध व्हावं असा संदेश पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानं दिला आहे. गरज भासल्यास हिंदूंनी शस्त्र, शास्त्राचा अभ्यास करावा. वेळ पडल्यास स्वत:च्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी त्यांनी शस्त्र बाळगावीत, असंही शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटलं आहे. 

राज्यासह देशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Pahalgam Terror Attack: भारताने अचानक झेलम नदीत पाणी सोडले; पाकिस्तानात भयंकर पूर, नागरिकांची धावपळ, आणीबाणी जाहीर, PHOTO

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र

व्हिडीओ

Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
Embed widget