एक्स्प्लोर

राष्ट्रपती राजवटीचा पहिला फटका शेतकऱ्यांना; पीक विम्यासाठी विमा कंपन्यांची नकारघंटा

सर्व पक्ष सत्तास्थापना करण्यासाठी अपयशी ठरल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. याचा पहिला फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पीक विमा कंपन्यांनी विमा उतरवण्यास नकार दिल्याने शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे.

मुंबई : राष्ट्रपती राजवटीचा पहिला फटका शेतकऱ्यांना बसला आहे. राज्यात सरकार अस्तित्वात नसल्यामुळे राज्यातील 9 जिल्ह्यातल्या पीक विम्यासंदर्भात कोणताच तोडगा निघालेला नाही. शिवसेनेच्या आंदोलनानंतर पीक विमा कंपन्यांनी राज्य सरकारशी करार करायला नकार दिला आहे. त्यामुळं शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे. विधानसभेच्या निकालानंतर 19 दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर कोणत्याही पक्षाला सत्तास्थापन करता आलेली नाही. परिणामी राज्यात कालपासून (12 नोव्हेंबर)राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. आता राज्याची सर्व सूत्रं राज्यपालांच्या हाती आली आहेत. त्यामुळं पीक विमा कंपन्यांची सुरक्षा कोण घेणार? वाढता तोटा कोण भरुन देणार? असे प्रश्न विमा कंपन्यांकडून उपस्थित करण्यात येत आहेत. राज्यातील लातूर, सोलापूर, हिंगोली, वाशीम, भंडारा, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली या जिल्ह्यात रब्बी हंगामाचा पीकविमा घेण्यासाठी वारंवार निविदा काढण्यात येत आहेत. मात्र, पीक विमा कंपन्यांनी राज्य सरकारशी करार करायला नकार दिला आहे. परतीच्या पावसामुळे राज्यातील सर्व विभागांतील शेतकरी कोलमडला आहे. कोकणातील भात शेती गेली. आंब्याचा हंगाम दोन महिने पुढे गेला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. यात पुणे जिल्ह्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या भागातील मका पिकावर लष्करी अळी, भुईमुगावर मावा आणि फुलकिडीचा, सोयाबीनवर उंट अळी, खोडमशी, गर्डल बीटल आणि पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. मराठवाड्यात सोयाबीन, कापूस, मका आदी पिके वाया गेली. या परिसरातील कापूस आणि सोयाबीन या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तर, विदर्भातील नागपूरमध्ये भात, कापूस, तूर आणि सोयाबीन ही पिके बाधित झाली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. राजकारणी जोमात शेतकरी कोमात - विधानसभेचा निकाल लागल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनेक नेते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. पवार यांनी मराठवाडा आणि राज्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पुत्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील एकामागोमाग एक राज्याचा दौरा करुन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी पीक विमा कंपन्यांच्या ऑफिसचे पत्ते आम्हाला असल्याचा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला होता. यानंतर जाग आलेल्या मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची बैठक बोलावून पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली. शेतकऱ्यांना तातडीने 10 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. ही मदत तुटपुंजी असून ती शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहचणार हाही एक प्रश्नच आहे. दरम्यान, शिवसेनेने दिलेल्या आंदोलनानंतर विमा कंपन्यांनी विमा उतरवण्यास नकार दिला आहे. एकीकडे आधी आस्मानी आणि आता सुलतानी, अशा दुहेरी संकटात राज्याचा बळीराजा सापडला आहे. तर, दुसरीकडे राज्यातील राजकारणी सत्तास्थापनेत मग्न आहेत. संबंधित बातम्या : मंत्रालयासमोर दूध फेकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन ; राजू शेट्टी पोलिसांच्या ताब्यात शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत मिळायला हवी : उद्धव ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 News : टॉप शंभर बातम्यांचा आढावा : 01 February 2025 : ABP MajhaZero Hour | Namdev Shastri On Dhananjay Munde | नामदेवशास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण,विरोधकांचे सवालZero Hour Full |Namdev Shastri यांच्याकडून पाठराखण, Anjali Damania भगवानगडावर जाणार; पुढे काय घडणार?Zero Hour | Nagpur | महापालिकेचे महामुद्दे | रिंग रोडवरील साडे पाचशे झाडं कोणी कापली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget