एक्स्प्लोर

कोरोना संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी आम्ही सरकारसोबत, राहुल गांधींचा मुख्यमंत्र्यांना फोन

महाराष्ट्रात काँग्रेसचा सरकारला पाठिंबा आणि पण आम्ही मुख्य धोरणकर्ते नाही, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी काल केलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा रंगली होती. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करुन सरकारसोबत असल्याचं आश्वासन दिलं.

मुंबई : कोरोना संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी काँग्रेस पूर्णपणे सोबत असल्याची ग्वाही काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. राहुल गांधी आणि मुख्यमंत्री यांच्यात काल (27 मे) फोनवरुन चर्चा झाल्याचं कळतं. यावेळी सरकारसोबत असल्याचं आश्वासन राहुल गांधी यांनी मुख्यंत्र्यांना दिलं.

"महाराष्ट्रात काँग्रेसचा सरकारला पाठिंबा आणि पण आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाही," असं वक्तव्य राहुल गांधी यांनी काल केलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा रंगली होती. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन संवाद साधून सगळं काही आलबेल असल्याचं अधोरिखित करण्याचा प्रयत्न केला.

24 तासांच्या आत तातडीने संवाद होणं आणि काँग्रेस-शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकमेकांच्या थेट संवादात असणं हे दाखवून महाराष्ट्र सरकारमध्ये संभ्रमाचं वातावरण नाही. तीनही पक्ष एकमेकांच्या संपर्कात आहेत, हे दाखवून देण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यातील हा संवाद महत्त्वाचा आहे.

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेत सुरुवातीला राहुल गांधी फारसे उत्सुक नसल्याचं दिसत होतं. शिवसेनेकडूनही सोनिया गांधी यांच्याशीच संवाद साधला जात होता. मात्र आता राहुल यांनी आता थेट संपर्क करुन संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे.

राहुल गांधी काय म्हणाले होते? "कोरोनाचा महाराष्ट्रात सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. आमचा महाराष्ट्र सरकारला पाठिंबा आहे, पण महाराष्ट्रात आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. पंजाब, छत्तीसगड, राजस्थान, पुद्दुचेरीमध्ये आम्हाला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. सरकार चालवणं आणि सरकारला पाठिंबा यातील हा फरक आहे. महाराष्ट्रात तिथल्या रचनेमुळे परिस्थिती बिकट बनली आहे. महाराष्ट्र हे उद्योगाच्या दृष्टीने देशासाठी महत्त्वाचं राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्राला केंद्र सरकारचं पूर्ण सहाय्य मिळणं गरजेचं आहे. मी समजू शकतो की महाराष्ट्र सध्या मोठं युद्ध लढतोय. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील लोकांना केंद्राचं पूर्ण सहकार्य मिळावं," असं राहुल गांधी म्हणाले होते.

Maharashtra Politics| महाविकास आघाडीचं सरकारबद्दला काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद
Maharashtra Breaking LIVE: हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद
Maharashtra Rain News Updates: पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
Maharashtra Rain Update : आभाळ फाटलं, मुंबई तुंबली! राज्यात पावसाचा हाहाकार, कुठे झाडं पडली, तर कुठे रस्ते पाण्याखाली! मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
आभाळ फाटलं, मुंबई तुंबली! राज्यात पावसाचा हाहाकार, कुठे झाडं पडली, तर कुठे रस्ते पाण्याखाली! मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain News Updates: पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
Embed widget