एक्स्प्लोर

MS Dhoni | धोनीच्या टीम इंडियात कमबॅकबाबत सौरव गांगुली म्हणतो...

महेंद्र सिंह धोनी भारतीय क्रिकेटचा चॅम्पियन आहे. त्यामुळे आपल्या क्रिकेट करिअरबाबत काय करायचं याचा निर्णय धोनीने घ्यायचा आहे, असं गांगुलीने म्हटलं आहे.

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. महेंद्र सिंह धोनी भारतीय संघात कधी पुनरागमन करणार याची वाट त्याचे चाहते पाहत आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष सौरभ गांगुलीने धोनीच्या क्रिकेटमधील भविष्याबाबत बोलाताना म्हटलं की, धोनीने त्याच्या आगामी क्रिकेट भवितव्याबाबत आणि प्लानिंगबाबत कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत चर्चा नक्कीच केली असेल. त्यामुळे याविषयी बोलण्याची ही योग्य वेळ नाही, असं गांगुलीने म्हटलं.

धोनीची स्तुती करताना गांगुलीने म्हटलं की, धोनी टीम इंडियाचा स्टार खेळाडू आहे. धोनी सारखा खेळाडू पुन्हा मिळणे कठीण आहे. त्यामुळे आपल्या करिअरबाबत काय करायचं हा निर्णय धोनीला घ्यायचा आहे. मी धोनीशी बातचित नाही केली, मात्र तो भारतीय क्रिकेटचा चॅम्पियन आहे. धोनी सारखा खेळाडू आपल्याला लवकर मिळणार नाही. मात्र आता खेळायचं की नाही, याचा निर्णय धोनीला घ्यायचा आहे.

धोनीला त्याच्या पुढील वाटचालीबद्दल अनेकदा विचारण्यात आलं मात्र प्रत्येकवेळी त्याने उत्तर देणं टाळलं आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात टीम इंडियात पुनरागमनाबद्दल विचारलं असता, जानेवारी 2020 नंतर हा प्रश्न विचारा, असं धोनीने म्हटलं होतं. त्यामुळे धोनी नव्या वर्षात संघात परतेल, असे अंदाजही वर्तवले जात आहेत.

वर्ल्ड कपची सेमीफायनल अखेरचा खेळलेला सामना

आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषकाचा सेमीफायनलचा सामना धोनीने खेळलेला शेवटचा सामना आहे. या सामन्यात टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. त्यामुळे टीम इंडिया विश्वचषकातून बाहेर झाली होती. विश्वचषकात धोनीच्या फलंदाजीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. विश्वचषकानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी धोनीने आर्मी ट्रेनिंगला जाण्याचं कारण देत, वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्यास नकार दिला होता. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकांमध्ये धोनी संघाचा भाग नव्हता. त्यामुळे धोनीच्या क्रिकेट करिअरबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र बीसीसीआय आणि धोनी याबाबत काय निर्णय घेणार आणि धोनी पुन्हा मैदानात कधी दिसणार याकडे क्रिकेट चाहत्यांचा लक्ष आहे.

धोनीने भारताला आपल्या नेतृत्त्वात 2007 मध्ये पहिला टी-20 विश्वचषक जिंकून दिला आहे. त्यानंतर 2011 मध्ये तब्बल 28 वर्षानंतर धोनीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय विश्वचषकावर दुसऱ्यांदा नाव कोरलं होतं. त्याआधी 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्त्वात भारताने विश्वचषक जिंकण्याची कमाल केली होती.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

AUS W vs ENG W: ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं विक्रम रचला, सातव्यांदा टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं, इंग्लंडचं स्वप्न भंगलं
ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं विक्रम रचला, सातव्यांदा टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं, इंग्लंडचं स्वप्न भंगलं
Vaibhav Sooryavanshi:वैभव सूर्यवंशीला तिसऱ्या टी 20 मध्ये संधी मिळणार का? माजी क्रिकेटपटूचा टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला महत्त्वाचा सल्ला     
वैभव सूर्यवंशीला तिसऱ्या टी 20 मध्ये संधी मिळणार का? माजी क्रिकेटपटूचा टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला महत्त्वाचा सल्ला
IND vs ENG : मॅच तिथंच संपली होती, भारताच्या पराभवाचं कारण काय? आकाश चोप्राचं रोखठोक विश्लेषण, दोन खेळाडूंचं  नाव घेतलं...
मॅच तिथंच संपली होती, भारताच्या पराभवाचं कारण काय? आकाश चोप्राचं रोखठोक विश्लेषण, दोन खेळाडूंचं  नाव घेतलं...
Prithvi Shaw-Akriti Agarwal Row : मार्चमध्ये अंगठी घातली, जुलैमध्ये सगळंच संपवलं; पृथ्वी शॉने होणाऱ्या बायकोला फसवलं? आकृती अग्रवालच्या इन्स्टा पोस्टमुळे खळबळ, नेमकं काय म्हणाली?
मार्चमध्ये अंगठी घातली, जुलैमध्ये सगळंच संपवलं; पृथ्वी शॉने होणाऱ्या बायकोला फसवलं? आकृती अग्रवालच्या इन्स्टा पोस्टमुळे खळबळ, नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Goa Highway Rain: राज्यात पावसाचा हाहा:कार! मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, मिसिंग लिंकवर दरड कोसळली, खोपोली-पेण महामार्ग पाण्याखाली
राज्यात पावसाचा हाहा:कार! दरड कोसळून मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, खोपोली-पेण महामार्ग पाण्याखाली
Mumbai Pune Expressway missing Link: मोठी बातमी: मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
मोठी बातमी: मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
Maharashtra Rain LIVE: राज्यात मुसळधार पावसाचं धुमशान, मुंबईला झोडपलं, रायगड, रत्नागिरी, चिपळुणवर पुराचं सावट, मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग ठप्प
Maharashtra Rain LIVE: राज्यात मुसळधार पावसाचं धुमशान, मुंबईला झोडपलं, रायगड, रत्नागिरीवर पुराचं सावट, मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग ठप्प
Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Embed widget