Mohammad Amir On Ind vs NZ Final T20 World Cup 2026: वेस्ट इंडिज, इंग्लंड, मग फायनलमध्येही भारताचा पराभव होणार; भविष्यवाणी करणारा मोहम्मद आमिर टीम इंडियाच्या विजयानंतर म्हणतो...
Mohammad Amir On Ind vs NZ Final T20 World Cup 2026: भारत आणि न्यूझीलंडच्या फायनलमध्ये न्यूझीलंड जिंकणार अशी भविष्यवाणी केली होती. मात्र फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा दारुण पराभव केला.

Mohammad Amir On Ind vs NZ Final T20 World Cup 2026: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या (T20 World Cup 2026) अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड (Ind vs NZ Final) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने तब्बल 96 धावांनी विजय मिळवला. भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. आयसीसी टी-20 विश्वचषक लागोपाठ दुसऱ्यांदा आणि आजवर तिसऱ्यांदा जिंकणारा टीम इंडिया हा पहिला संघ ठरला. भारताच्या या विजयानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू मोहम्मद आमिरने (Mohammad Amir ) प्रतिक्रिया दिली आहे.
सुपर-8 च्या भारत आणि वेस्ट इंडिजच्या सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मोहम्मद आमिरने (Mohammad Amir) टीम इंडियाचा पराभव होणार, असा दावा केला होता. त्यानंतर सेमीफायनलमध्येही टीम इंडियाला इंग्लंड पराभूत करेल, अशी भविष्यवाणी मोहम्मद आमिरने केली होती. मात्र टीम इंडियाने सुपर-8 चा सामनाही जिंकला आणि इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलही जिंकली. त्यामुळे सोशल मीडियावर मोहम्मद आमिरला चांगलेच ट्रोल करण्यात आले. परंतु यानंतही मोहम्मह आमिर थांबला नाही. भारत आणि न्यूझीलंडच्या फायनलमध्ये न्यूझीलंड जिंकणार अशी भविष्यवाणी केली होती. मात्र फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा दारुण पराभव केला. यानंतर मोहम्मह आमिरला या सामन्याबाबत विचारले असता, तो संतापल्याचे पाहायला मिळाले. (Mohammad Amir On Ind vs NZ Final T20 World Cup 2026)
मोहम्मद आमिर काय म्हणाला? (Mohammad Amir On Team India)
भारत जिंकला, भविष्यवाणी चुकली...आता काय म्हणणं, असा सवाल मोहम्मद आमिरला विचारण्यात आला. यावर जिंकले तर जिंकले...ते विश्वचषक घरी त्यांच्या घरी घेऊन जातील. माझ्या घरी आणणार नाहीत, असं प्रत्युत्तर मोहम्मद आमिरने दिले. मी न्यूझीलंडला 2004 पासून फॉलो करतोय. मी कधीही न्यूझीलंडला असं खेळताना पाहिलेलं नव्हतं. न्यूझीलंडचा संघ पूर्णपणे दबावात खेळत होता. याचं टीम इंडियाचा क्रेडिट द्यायला हवं. टीम इंडिया सेमीफायनल आणि फायनल खूप चांगली खेळली, असं मोहम्मद आमिर म्हणाला.
टीम इंडियाचं जोरदार सेलिब्रेशन (Team India Celebration T20 WC 2026)
न्यूझीलंडला पराभूत करुन पुन्हा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केले. भारतीय संघातील खेळाडूंचे कुटुंबीय देखील या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताच्या संजू सॅमसन, अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि इशान किशन (Ishan Kishan) या तीन फलंदाजांनी न्यूझीलंडच्या आक्रमणाच्या अक्षरश: चिंधड्या उडवल्या. भारताने सलामीच्या फलंदाजांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर भारतानं 20 षटकांत पाच बाद 255 धावांची मजल मारली होती.भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा अख्खा डाव 159 धावांत कोलमडला. भारताकडून जसप्रीत बुमरानं चार, तर अक्षर पटेलनं तीन विकेट्स काढून न्यूझीलंडला रोखण्यात मोलाची भूमिका बजावली.
The culmination of a breathtaking journey deeply felt by all 💙
— BCCI (@BCCI) March 9, 2026
🎥 𝙍𝙖𝙬 & 𝘽𝙚𝙖𝙪𝙩𝙞𝙛𝙪𝙡 𝙧𝙚𝙖𝙘𝙩𝙞𝙤𝙣𝙨 from #TeamIndia's historic night of triumph 🏆
Watch 🔽| #T20WorldCup | #MenInBlue | #Final | #INDvNZhttps://t.co/Zxl4u7mxwH
संबंधित बातमी:




















