एक्स्प्लोर

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीच 1300 शाळा बंद केल्या : विनोद तावडे

‘माझा कट्टा’वर बोलताना शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी शिक्षण विभागातील समस्या, त्यावरील उपाय, शिक्षक भरती, शिक्षणाचे खासगीकरण यावर आपली रोखठोक मतं मांडली.

मुंबई : गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठीच राज्यातल्या 1300 शाळा बंद केल्याचे सांगत, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी आघाडी सरकारच्या कामाकाजावरुन विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ‘माझा कट्टा’वर बोलताना त्यांनी शिक्षण विभागातील समस्या, त्यावरील उपाय, शिक्षक भरती, शिक्षणाचे खासगीकरण यावर आपली रोखठोक मतं मांडली. राज्यभरातील 1300 शाळा बंद करण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना विनोद तावडे म्हणाले की, “ज्या शाळा बंद करण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्या शाळांच्या विटांची इमारत बंद केली. कारण, बहुजन समाजातील विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवण्याचा अधिकार आहे. जो ग्रामीण भागात राहतो, आदिवासी भागात राहतो, त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी हा निर्णय घेतला.” सहा महिन्यात 24 हजार शिक्षकांची भरती येत्या सहा महिन्यात राज्यात शिक्षकांच्या 24 हजार जागा भरल्या जाणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. शिक्षणमंत्र्यांच्या या घोषणेमुळे राज्यातील डीएड आणि बीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षात शिक्षकभरती झालेली नाही. त्यामुळे डीएड, बीएडच्या अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली होती. पवारबाह्य मुख्यमंत्र्यांची अडचण विशेष म्हणजे, यावरुन त्यांनी पवार कुटुंबावरही टीकेची झोड उठवली. “पटसंख्या 20 असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय हा आघाडी सरकारने घेतला. पण पवारबाह्य मुख्यमंत्री त्या पदावर विराजमान झाला की, नियमावर बोट ठेवून बोलू लागतात.” अशा शब्दात विनोद तावडेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला. सिंहगड संस्थेतील शिक्षकांचे सरकारविरोधातील आंदोलन चुकीचे सिंहगड संस्थेतील शिक्षकांच्या वेतनाच्या मुद्द्यावरुनही त्यांनी यावेळी स्पष्टीकरण दिलं. सिंहगड संस्थेतील शिक्षकांच्या आंदोलनानंतर, आम्ही संचालकांसोबत बैठक घेतली. त्यातील अनुदानाचा जो विषय होता, त्यावर आम्ही सरकारच्या वतीने कागदपत्रांसह सर्व अनुदान वाटप केलं, असं विनोद तावडेंनी सांगितलं. पण शासन पैसे दिले असताना त्यांनी शिक्षकांना पगार दिला नसल्याचं दाखवून आंदोलनं केली. वास्तविक, ते पैसे कुठे गेले याचा सर्वांनी शोध घ्यायला पाहिजे होता, असं मतही त्यांनी मांडलं. निवडणूक प्रक्रियेत शिक्षकांचा वापर अयोग्य : विनोद तावडे निवडणूक प्रक्रियेत शिक्षकांचा वापर अयोग्य असल्याचं मत त्यांनी यावेळी मांडलं. या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांसोबत निवडणूक आयोगांना विनंती केलेली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. शिवाय, विविध शासकीय योजनांच्या प्रसारात विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेणं चुकीचं असल्याची रोखठोक भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली. शिक्षणातलं खासगीकरण बंद झालं पाहिजे विशेष म्हणजे, खासगी क्लासेसच्या संचालकांचा चांगलाच समाचार घेतला. “खासगी क्लासेसच्या संचालकांनी शिक्षणाचं बाजारीकरण केलं आहे. या क्लासेसमधून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात नाही, तर मार्क कसे मिळवायचे हे शिकवलं जातं. त्यासाठी भरमसाठ पैसे उकळले जातात. शिक्षणातलं खाजगीकरण बंद झालं पाहिजे. त्यासाठी जो जालिम उपाय असेल, तो केलाच पाहिजे.” असं त्यांनी यावेळी सांगितलं. शिक्षण खात्यातील समस्या सामूहिक जबाबदारी “शिक्षण खात्यातल्या समस्या म्हणजे सामूहिक जबाबदारी आहे. त्या सोडवण्यासाठी मंत्री या नात्याने मलाच पुढाकार घेतला पाहिजे,” असंही मतही त्यांनी यावेळी मांडलं. तसेच, कौशल्य सेतू योजनेतून वन टू वन करिअर काऊन्सिलिंगमुळे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पत्रिकेवर नापास शिक्का बसत नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. संबंधित बातम्या सहा महिन्यात 24 हजार शिक्षकांची भरती करणार : विनोद तावडे
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut :  अशोक खरात सरकारचाच माणूस, त्याचापाठी 40 आमदार; खासदार संजय राऊतांचे सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...
अशोक खरात सरकारचाच माणूस, त्याचापाठी 40 आमदार; खासदार संजय राऊतांचे सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...
Sunil Tatkare on NCP Merger: सुनील शेळकेंनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा 'जिवंत' केला, सुनील तटकरे म्हणाले, ' ते ज्येष्ठ आमदार, प्रभावी नेते...'
सुनील शेळकेंनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा 'जिवंत' केला, सुनील तटकरे म्हणाले, ' ते ज्येष्ठ आमदार, प्रभावी नेते...'
Pune Crime: नोकरी गेल्याने मानसिक धक्का, मुंबईच्या आदित्य सातपुतेंचं पुण्यातील एफसी रोडवर टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?
नोकरी गेल्याने मानसिक धक्का, मुंबईच्या आदित्य सातपुतेंचं पुण्यातील एफसी रोडवर टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?
BMC commissioner : मुंबई महानगरपालिकेचा नवा आयुक्त कोण होणार? 'या' पाच नावांची जोरदार चर्चा, कोण मारणार बाजी?
मुंबई महानगरपालिकेचा नवा आयुक्त कोण होणार? 'या' पाच नावांची जोरदार चर्चा, कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report
Nashik leopard : नागरी वस्तीत बिबट्या शिरला, नागरिकांमध्ये दहशत Special Report
Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: 'नरकात तुमचं स्वागत आहे, थडग्यातून पाठवून देऊ' अतिरिक्त अमेरिकन तुकड्या आखाती देशात पोहोचताच इराणी मीडियाचा गर्भित इशारा
'नरकात तुमचं स्वागत आहे, थडग्यातून पाठवून देऊ' अतिरिक्त अमेरिकन तुकड्या आखाती देशात पोहोचताच इराणी मीडियाचा गर्भित इशारा
Aniket Varma: अवघा तीन वर्षांचा असताना आई गेली, वडिलांच्या दुसऱ्या लग्नानं कुटुंब उद्ध्वस्त, काकाच्या त्यागानं स्वप्न साकारलं; अनिकेत वर्मा आहे तरी कोण?
अवघा तीन वर्षांचा असताना आई गेली, वडिलांच्या दुसऱ्या लग्नानं कुटुंब उद्ध्वस्त, काकाच्या त्यागानं स्वप्न साकारलं; अनिकेत वर्मा आहे तरी कोण?
Pankaja Munde : स्वत:ची ऐपत ओळखून राहायला शिका, चुकीच्या मार्गाने पैसे कमवाल तर तुरुंगात जाल, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
स्वत:ची ऐपत ओळखून राहायला शिका, चुकीच्या मार्गाने पैसे कमवाल तर तुरुंगात जाल, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्पविरोधात अमेरिकेत लाखोंचा जमाव रस्त्यावर उतरला! सर्वच्या सर्व 50 राज्यांत एकाचवेळी 3300 ठिकाणी लाखो नागरिक रस्त्यावर
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्पविरोधात अमेरिकेत लाखोंचा जमाव रस्त्यावर उतरला! सर्वच्या सर्व 50 राज्यांत एकाचवेळी 3300 ठिकाणी लाखो नागरिक रस्त्यावर
Thane Electricity Supply : ठाणे शहरातील बहुतांश ठिकाणी बत्ती गूल; गर्मीनं नागरिकांचे हाल, उकाड्याने हैराण; विद्युत पुरवठा खंडित होण्यामागचं कारण काय?
ठाणे शहरातील बहुतांश ठिकाणी बत्ती गूल; गर्मीनं नागरिकांचे हाल, उकाड्याने हैराण; विद्युत पुरवठा खंडित होण्यामागचं कारण काय?
Chhatrapati Sambhajinagar Crime: तरुणाला निर्जनस्थळी नेलं, गुप्तांगावर वार करुन रस्त्यावर फेकून दिलं, छ. संभाजीनगर हादरलं!
तरुणाला निर्जनस्थळी नेलं, गुप्तांगावर वार करुन रस्त्यावर फेकून दिलं, छ. संभाजीनगर हादरलं!
Akola News: गॅस सिलिंडरसाठीच्या रांगेतच माजी सरपंचाचा मृत्यू; रोहिणी खडसेंचा संताप; म्हणाल्या 'वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने...'
गॅस सिलिंडरसाठीच्या रांगेतच माजी सरपंचाचा मृत्यू; रोहिणी खडसेंचा संताप; म्हणाल्या 'वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने...'
Ashok Kharat: तेजस्वी सातपुतेंनी प्रश्न विचारताच अशोक खरातची बोलती बंद, मान खाली घालून तसाच उभा राहिला
तेजस्वी सातपुतेंनी प्रश्न विचारताच अशोक खरातची बोलती बंद, मान खाली घालून तसाच उभा राहिला
Embed widget