एक्स्प्लोर

..तर मी निवडणूक लढवणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बाळासाहेब थोरातांना निरोप

काँग्रेसने आपले दोन उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर झाली आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतापले आहेत.

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीत समन्वय नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. काँग्रेसने आपले दोन उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर होत आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर उद्धव ठाकरे संतापले आहेत. काँग्रेसने उमेदवार मागे घेतला नाही तर मी निवडणूक लढवणार नाही, असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब थोरात यांना पाठवला आहे. सहाव्या जागेवरून महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाल्याचं पाहयला मिळत आहे.

सहा जागा लढवण्याबाबत काँग्रेस अजूनही ठाम आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दुसऱ्या उमेदवारांची घोषणा केल्याने महाविकास आघाडीत चिंता वाढलीय. दरम्यान शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी रात्री 10 च्या सुमारास बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे. तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही थोरातांना उमेदवार मागे घेण्यासाठी केला संपर्क असल्याची सूत्रांची माहिती आहे. सहाव्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण झाला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे निरोप पाठवला.

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक 

विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत उत्सुकता विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या 21 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीबाबत उत्सुकता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडून येणे महत्वाचे असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान होणार हे अजून निश्चित व्हायचं आहे. मात्र, प्रत्यक्षात झाली तर लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांचा भाव वधारणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 27 मे च्या आधी निवडून येणे गरजेचे आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या नऊ जागांची निवडणूक महत्वाची आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी अशी शिवसेना आणि राष्ट्रवादीची भूमिका आहे. पण काँग्रेसने दोन उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीकडे असलेलं संख्याबळ पाहता महाविकास आघाडीच्या 6 जागा निवडून येऊ शकतात, असा विश्वास काँग्रेसला वाटतो.

MLC Election | विधानपरिषदेसाठी भाजपकडून चार नावं निश्चित, दिग्गजांचा पत्ता कट

कसं आहे आकड्यांचं गणित या निवडणुकीत विधानसभेतील 288 आमदार मतदान करणार आहेत. विधानसभेतील संख्याबळ बघितलं तर 1 उमेदवार निवडून येण्यासाठी 29 मतांचा कोटा आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने शिवसेना 56, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44 या तीन पक्षांचे मिळून 154 संख्याबळ आहे. तर याशिवाय बच्चू कडूंचा प्रहार 2, स्वाभिमानी 1, शेकाप 1, बहुजन विकास आघाडी 3, सपा 2, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1 आणि अपक्ष 7 असं 17 जणांचं पाठबळ महाविकास आघाडीला आहे. म्हणजेच 154 + 17 असं 171 मतांचं पाठबळ महाविकास आघाडीकडे आहे.

Vidhan Parishad Election | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vasai Crime News: चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
BMC : मोठी बातमी : आक्रमक पवित्र्यानंतर मनसेच्या अटी ठाकरे सेनेकडून मान्य,  संजय राऊत-राज ठाकरेंच्या भेटीनंतर मोठ्या घडामोडी
आक्रमक पवित्र्यानंतर मनसेच्या अटी ठाकरे सेनेकडून मान्य,  संजय राऊत-राज ठाकरेंच्या भेटीनंतर मोठ्या घडामोडी
Maharashtra Budget Session 2026: विमान डाव्या नव्हे उजव्या बाजूला झुकलं; रोहित पवारांकडून व्हिडीओ दाखवून DGCA च्या अहवालाची चिरफाड
Maharashtra Budget Session 2026: विमान डाव्या नव्हे उजव्या बाजूला झुकलं; रोहित पवारांकडून व्हिडीओ दाखवून DGCA च्या अहवालाची चिरफाड
Sachin Kalyanshetti vs Bhaskar Jadhav : तुम्ही बाप का काढला, भाजप आमदार भास्कर जाधवांना भिडला, विधीमंडळ परिसरात आमदारांची बाचाबाची!
तुम्ही बाप का काढला, भाजप आमदार भास्कर जाधवांना भिडला, विधीमंडळ परिसरात आमदारांची बाचाबाची!

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
Ayatollah Ali Khamenei: इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
Vasai Crime News: चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
Iran : अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
Jayant Patil on NCP Merger : राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
Embed widget