एक्स्प्लोर

मीच मुख्यमंत्री, दानवेच प्रदेशाध्यक्ष, फडणवीसांचं स्पष्टीकरण

दिल्लीतून बोलावणं येत नाही, तोपर्यंत मीच मुख्यमंत्रिपदी राहणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुंबई : भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदावरुन रावसाहेब दानवे यांची उचलबांगडी होण्याच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. त्याचप्रमाणे, आपण केंद्रात जाण्याची तूर्तास कोणतीही शक्यता नाही, असंही फडणवीस म्हणाले. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट स्पष्ट केली. गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आलं आहे. रावसाहेब दानवे यांना महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्या नेतृत्वात आम्ही भविष्यातही निवडणुका लढवू, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी दानवेंची हकालपट्टी होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. मीच मुख्यमंत्रिपदी राहणार दिल्लीतून बोलावणं येत नाही, तोपर्यंत मीच मुख्यमंत्रिपदी राहणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मी केंद्रात जाण्याची तूर्तास कोणतीही शक्यता नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पालकमंत्र्यांना ध्वजावंदनापासून रोखणारे देशद्रोही शेतकऱ्यांची आंदोलनं आणि सुकाणू समितीवरही मुख्यमंत्र्यांनी सडकून टीका केली. पालकमंत्र्यांना ध्वज फडकवू न देणारेही देशद्रोहीच असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. सत्ता गेली तरी चालेल, पण आम्हाला ज्या व्यक्ती देशाचा झेंडा फडकवण्यापासून रोखेल. त्याला आम्ही सोडणार नाही, असा इशाराही फडणवीसांनी दिला. संपूर्ण कर्जमाफी मागून अराजकता संपूर्ण कर्जमाफी मागणं हे अराजकता निर्माण करण्यासारखं असल्याचंही फडणवीस म्हणाले. खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, भ्रष्टाचार होऊ नये यासाठी ऑनलाईन फॉर्म असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राजकीयदृष्ट्या भाजप देशातला सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपने विचाराशी बांधिलकी असलेली कार्यकर्त्यांची एक फळी तयार केली असल्याचंही ते म्हणाले. भारत महासत्ता होऊ शकतो, ही आशा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्माण केल्याचंही फडणवीस म्हणाले. राज्यभरात काढलेल्या मराठा मोर्चांचं मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं. 'एकूण 58 मोर्चे झाले. काही जणांनी त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न केला, पण या मोर्चांनी ते होऊ दिलं नाही.' असं फडणवीस म्हणाले. रवी भुसारींच्या निर्णयाने दुःख, पण... रवी भुसारींचा अचानक फोन आला. 60 वर्षांचा झाल्यामुळे पक्षाचं काम थांबवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. राजकीय क्षेत्रात काम करत असताना रवीजी अशा पदावर होते की त्यांच्याबद्दल फार आदर होता. असं असताना हा निर्णय घेणं, फार जिकिरीचं काम आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आपल्याला दुःख झालं असलं, तरी एक प्रचारक म्हणून एका प्रचारकाबाबत आदर आहे, असंही फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Tiranga Morcha: 'जेन झी'ने दिल्ली जिंकली, आता मुंबईत ठाकरे बंधूंचा एल्गार, राज-उद्धव ठाकरेंच्या तिरंगा मोर्चात तरुणाईची ताकद दिसणार
'जेन झी'ने दिल्ली जिंकली, आता मुंबईत ठाकरे बंधूंचा एल्गार, राज-उद्धव ठाकरेंच्या तिरंगा मोर्चात तरुणाईची ताकद दिसणार
मुंबईत अमली पदार्थ तस्करावर कठोर कारवाई, कुख्यात ड्रग्ज तस्कर उस्मान अब्दुल कादर शेखला अटक 
मुंबईत अमली पदार्थ तस्करावर कठोर कारवाई, कुख्यात ड्रग्ज तस्कर उस्मान अब्दुल कादर शेखला अटक 
धक्कादायक! अंधेरीतील शॉपिंग मॉलला भीषण आग, मॉलमधील अनेक दुकाने व गाळे जळून खाक, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल
धक्कादायक! अंधेरीतील शॉपिंग मॉलला भीषण आग, मॉलमधील अनेक दुकाने व गाळे जळून खाक, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
Embed widget