एक्स्प्लोर

मुंबईहून दिल्लीला 12 तासात पोहोचता येईल, अशी क्षमता असणाऱ्या आरामदायी बसेसची निर्मिती करा - गडकरी 

Nitin Gadkari : मुंबई ते दिल्ली हा प्रवास फक्त 12 तासांत पूर्ण करु शकणाऱ्या आरामदायी इलेक्ट्रिक बसगाड्या निर्मितीची योजना आखावी, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.

Nitin Gadkari : मुंबई ते दिल्ली हा प्रवास फक्त 12 तासांत पूर्ण करु शकणाऱ्या आरामदायी इलेक्ट्रिक बसगाड्या निर्मितीची योजना आखावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन उत्पादक कंपन्यांना केले आहे.  नितीन गडकरी यांच्या हस्ते, आज मुंबईत स्विच ईआयव्ही 22 (Switch EiV 22) या नावाच्या अशोक लेलँड कंपनीच्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, 'दीर्घकालीन दृष्टिकोन लक्षात घेता,  देशाच्या  वाहतूक व्यवस्थेत परिवर्तन करण्याची गरज आहे. शहरी वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यावर भर देत, आम्ही कार्बन उत्सर्जन कमीत कमी असेल तसेच जास्त  प्रवासी क्षमता असलेल्या एकात्मिक इलेक्ट्रिक वाहनांची वाहतूक व्यवस्था आणण्यासाठी प्रयत्नरत आहोत.' ग्राहकांकडून हरित (पर्यावरणस्नेही) वाहतूक साधनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आहे, हे बघता, केंद्र सरकारची दूरदृष्टी आणि धोरणे इलेक्ट्रिक वाहनांचा अंगीकार करण्याला प्रोत्साहन  देणारी आहेत” असेही यावेळी त्यांनी सांगितलं.  

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज बेस्टच्या ताफ्यातील इलेक्ट्रीक बसचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र आणि इतर अधिकारीदेखील असतात. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की,  आज डबल डेकर बस बेस्टच्या ताफ्यात येत असल्याने मी आनंदित आहे. प्रदुषण मुक्त देशासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. एकूण प्रदूषणांपैकी 35 टक्के प्रदूषण हे पेट्रोल आणि डिझेलमुळे होत आहे. इलेक्ट्रीक वाहनांमुळे प्रदूषणात घट होईल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी, दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाविषयीची आपली संकल्पना सांगतांना नितीन गडकरी म्हणाले, नरिमन पॉइंट ते  दिल्ली जोडण्याची माझी योजना आहे आणि त्याचे 70 टक्के काम याआधीच पूर्ण झालेले आहे. यावेळी, वाहन उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देत, गडकरी यांनी त्यांना आवाहन केले की, मुंबईहून दिल्लीला केवळ 12 तासांत पोहोचता येईल, अशी क्षमता असणाऱ्या आरामदायी बसेसची निर्मिती करा. 

वाहनांसाठी विजेचा इंधन म्हणून वापर होणे, हे डिझेलसारख्या इतर इंधनांच्या तुलनेत अतिशय स्वस्त आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. कच्च्या तेलाची आयात हे सरकारसमोरील मोठे आव्हान आहे. तसेच, सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर देखील वीजेचा खर्च कमी करण्यात मोठा हातभार लावतो आहे, असे त्यांनी सांगितले.  

आणखी वाचा :
Mumbai AC Double Decker Bus: 'बेस्ट'चं आधुनिक पर्व सुरू; देशातील पहिल्या एसी डबलडेकर बसचे उद्घाटन
Electric Double Decker Bus : कशी आहे भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
Maharashtra Budget 2026 Live Updates : शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget