एक्स्प्लोर

शासनाच्या योजना कागदावरच; देशाच्या आर्थिक राजधानीतही कुपोषण कायम

भिवंडी तालुक्यातील दाभाड आणि चावे येथील विटभट्टीवर काम करणाऱ्या पालकांच्या अतितीव्र कुपोषित बालिकेस श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या दक्षतेमुळे स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिवंडीसारख्या भागत कुपोषणाच्या रुग्णामध्ये वाढ होत असल्याने शासनाच्या योजना कागदावरच आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भिवंडी तालुक्यातील दाभाड आणि चावे येथील विटभट्टीवर काम करणाऱ्या पालकांच्या अतितीव्र कुपोषित बालिकेस श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या दक्षतेमुळे स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भूमिका विलास शेनवार वय तीन वर्षे असे कुपोषित बालिकेचे नाव असून तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी ठाणे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच चावे गावातील अंगणवाडीत 7 कुपोषित बालक आढळून आली असून त्यांची संख्या सतत वाढत आहे. दरम्यान वीटभट्टीवर मजुरी करणाऱ्यांच्या मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत असल्याचे निदर्शनात आलं आहे. एकीकडे सरकार कुपोषित बालकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतं. परंतु खरं पाहिलं तर सरकारच्या कोणत्याही योजनांचा लाभ या बालकांपर्यंत पोहचतच नसल्याचं पालकांनी सांगितलं आहे.

भिवंडी, शहापूर, मुरबाडसारख्या ग्रामीण भागात शेकडो वीटभट्या आहेत. या वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. दिवस रात्र काबाडकष्ट करूनही यांच्या कुटुंबाच्या पदरी 150 ते 200 रुपये पडतात. त्यामुळे यांना दोन वेळच जेवणही नशिबात नसतं. कित्येकदा तर आई-वडील उपाशी राहून मुलांना जेवण देत असतात. तर कधी कधी चिमुकल्यांच्या ताटात फक्त भात असतो. बऱ्याचदा त्यांना उपाशी पोटीच झोपावं लागत. तसेच ही मुलं शिक्षणापासून वंचित राहतात. सरकारच्या कोणत्याही योजनांचा लाभ यांना मिळत नाही. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या दोन गावांच्या सर्व्हेत 10 ते 12 कुपोषित बालके असल्याची बाब समोर आली. तर या भागात शेकडो वीटभट्ंट्यावर अनेक कुपोषित बालकं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असून सर्व योजना कागदावरच राबवत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चावे येथील अंगणवाडीत कुपोषित बालक आढळून आल्याने अंगणवाडी सेविकेला याबाबत विचारणा केली. त्यावेळी बोलताना तिने सांगितले की, शासनाकडून कुपोषित बालकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. परंतु मुलांसाठी मिळणारा पोषक आहार वेळेवर मिळत नाही. त्यामुळे स्वतः खर्च करून मुलांसाठी आहार आणावा लागतो. परंतु अंगणवाडीच्या सेविकेला चार-चार महिने पगार दिला जात नाही. मग हा खर्च आम्ही कधीपर्यंत करणार? शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. वेळेवर उपयुक्त आहार मिळत नसल्याने मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढत असून मुलांच्या उंची आणि वजनात घट पाहायला मिळत आहे. ही अवस्था एकाच आंगणवाडीची नाही तर भिवंडीत असणाऱ्या एकूण 426 अंगणवाड्यांची अशीच अवस्था आहे.

ठाण्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी या परिसरातील बालके अधिक प्रमाणात कुपोषित असून येथील परिस्थिती चिंताजनक आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून कुपोषणमुक्तीसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. मात्र आदिवासी समाजातील लोकांचे स्थलांतर तसेच परिस्थितीमुळे गरोदर महिलांना न मिळणारा सकस आहार, यामुळे जन्माला येणारे बाळ कुपोषित जन्मते. तर अनेक वेळा त्याचा मृत्यूही होतो. कुपोषण आणि बालमृत्यूच्या नावाने कोट्यवधी निधी येतो. मात्र तिथपर्यंत तो पोहोचत नाही तसेच त्याची जनजागृती होत नाही. या परिसरात कुपोषणाचे प्रमाण वाढत असून जर प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असेल तर येत्या 25 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर तीन दिवसीय भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा श्रमजीवी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

भिवंडी महापालिकेच्या कचरा डंपरची आठ जणांना धडक; दोघांचा मृत्यू, 6 गंभीर जखमी

मुंबई, ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूरवासियांसाठी खुषखबर

भिवंडी सशस्त्र दरोडा प्रकरणी दोघे ताब्यात; 1 कोटी 26 लाखांचे दागिने हस्तगत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
Maharashtra Budget 2026 Live Updates : शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget