एक्स्प्लोर

... म्हणून भरपावसातही मध्य रेल्वे अखंडपणे सुरु होती!

मध्य रेल्वेने पावसाच्या अंदाजानंतरच व्यवस्थित नियोजन केलं, परिणामी मुंबईकरांना दरवर्षीप्रमाणे मनस्ताप सहन करावा लागला नाही.

मुंबई : मान्सूनच्या पहिल्याच पावसात मुंबईत पाणी तुंबलं. पाणी साचल्यामुळे रस्त्यावरही वाहतूक कोंडी झाली. मात्र लोकल रेल्वेची वाहतूक उशिराने का होईना सुरुच होती. मुसळधार पावसातही मध्य रेल्वेची वाहतूक फक्त योग्य नियोजनामुळे सुरु राहिली. म्हणूनच मुंबईकरांना लोकलमध्ये पावसात अडकून राहण्याची वेळ आली नाही. हवामान विभागाने इशारा दिल्याप्रमाणे मुंबईत मुसळधार पाऊस झाला. काही भागात तर शंभर मिमीपेक्षाही जास्त पाऊस होता. सायन, कुर्ला, सँडहर्स्ट रोड या स्टेशनमध्ये रेल्वे रुळावर पाणी साचलं होतं. मात्र तरीही मध्य रेल्वे ठप्प झाली नाही. उशिराने का होईना वाहतूक सुरुच होती. मध्य रेल्वेने काय पूर्वतयारी केली? जुन्या गाड्या, ज्या पावसात मोटरमध्ये पाणी जाऊन बंद पडतात, त्या आधीच वेगळ्या करून दिवसभर वापरल्या नाहीत. त्यासाठी आधीच मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली गेली आणि कोणत्या गाड्या चालू ठेवायच्या ते ठरवण्यात आलं. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे पावसात लोकल बंद पडल्या नाहीत. यावर्षी मध्य रेल्वेच्या ताफ्यात नव्या बम्बार्डियर लोकल दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये नवीन तंत्रज्ञान आहे. सोबत पाणी रुळावर आलं तरीही या लोकल सावधरित्या चालवता येतात. पावसात या लोकल बंद पडत नाहीत. त्यामुळे याच गाड्यांचा पावसात जास्त वापर केला गेला. हवामान विभाग आणि बीएमसीसोबत समन्वय मध्य रेल्वे आणि हवामान विभाग यांनी अचूक समन्वय साधला. हवामान खात्याने रियल टाईम अपडेट, म्हणजेच प्रत्येक तासाचे वेगवेगळ्या ठिकाणी पडणाऱ्या पावसाचे अंदाज रेल्वेला सांगितले. यामुळे त्या-त्या ठिकाणी त्या-त्या वेळी गाड्यांचे आणि कामाचे नियोजन केले गेले. याचा मोठा फायदा झाला. त्याचबरोबर मुंबई महापालिकेनेही नालेसफाई आणि पंप लावण्यात मदत केली. मध्य रेल्वे आणि बीएमसीने मिळून नालेसफाई केली. तसेच दोन्ही विभागांनी मिळून 26 जागी 60 पंप लावले. यामुळे पाण्याचा निचरा लवकर झाला. जलद निर्णय प्रक्रिया ज्या ठिकाणी पाणी हमखास भरते, त्या स्टेशनवर मोठे अधिकारी एक टीम सोबत घेऊन हजर राहिले. यामुळे निर्णय प्रक्रिया जलद झाली. मध्य रेल्वेने यावर्षी मोठ्या प्रमाणात नालेसफाई केली. त्यासाठी बीएमसीकडून सल्लेही घेण्यात आले. त्यामुळे वर्षानुवर्षे साचलेले नाले साफ झाले. हार्बर रेल्वे सुरु ठेवण्यातही यश मध्य रेल्वेच्या सोबत हार्बर रेल्वेही सुरु ठेवण्यात मध्य रेल्वेला यश आलं. त्यासाठी अनेक प्रवाशांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मध्य रेल्वेचे आभार मानले. भरपावसात विनाअडथळा हार्बर रेल्वे सुरु होती. गाड्या उशिराने असल्यामुळे थोडा फार त्रास झाला, मात्र हार्बरची लोकल कुठेही रखडली नाही. प्रचंड पावसात रेल्वे वाहतूक सुरु ठेवली याचं श्रेय मध्य रेल्वेला द्यावेच लागेल. मात्र ही फक्त सुरुवात आहे. अजून संपूर्ण पावसाळा बाकी आहे. त्यामुळे साखळी सामन्यात मिळवलेलं हे यश मध्य रेल्वेला यापुढेही कायम ठेवावं लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut and Devendra Fadnavis: 'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Mumbai BMC Standing Committee :बहुमतासाठी आजारी नगरसेवकाला थेट रुग्णालयातून स्थायी समितीच्या बैठकीला आणलं; मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांची नामुष्की की बहुमताची धडपड?
बहुमतासाठी आजारी नगरसेवकाला थेट रुग्णालयातून स्थायी समितीच्या बैठकीला आणलं; मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांची नामुष्की की बहुमताची धडपड?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणााले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणााले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
Embed widget