एक्स्प्लोर

भावाला मंत्रिपद न मिळाल्यानं मानसिक संतुलन बिघडलंय; राऊतांच्या विधानावर राणेंची सडकून टीका

भाजप नेते नारायण राणे यांनी आज शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली.

मुंबई : संजय राऊत या माणसाला सत्तेचा माज चढला आहे. त्याच्या भावाला मंत्रिपद मिळालं नाही तेव्हापासून राऊत अशी वक्तव्य करतोय, त्याचं मानसिक संतुलन बिघडलंय, अशी गंभीर टीका भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केली. छत्रपती आमचं दैवत आहे, आमच्या देवतांच्या खानदान, वंशजांबद्दल काही वेडंवाकडं बोलला तर जीभ जागेवर राहणार नाही याद राखा, हा इशारा आम्ही आज देतोय, असंही राणे म्हणाले. नारायण राणे आज भाजप कार्यलयात आले असता ते  'माझा'शी बोलत होते. वादग्रस्त पुस्तक आणि अंडरवर्लड डॉन दाऊद इब्राहिम याच्या विषयी खासदार संजय राऊत यांनी काही वादग्रस्त विधानं केली होती. या विधानांवरुन भाजप नेते नारायण राणे यांनी राऊतांवर सडकून टीका केली आहे. "छत्रपती आमचं दैवत आहे, आमच्या देवतांच्या खानदान, वंशजांबद्दल काही वेडंवाकडं बोलला तर जीभ जागेवर राहणार नाही याद राखा, हा इशारा आम्ही आज देतोय", असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. भावाला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून राऊतांची वक्तव्ये : राणे ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळात संजय राऊत यांच्या भावाच्या समावेशावरुन देखील राणे यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला. "संजय राऊत या माणसाला सत्तेचा माज चढलाय, त्याच्या भावाला मंत्रिपद मिळालं नाही, तेव्हापासून राऊत अशी वक्तव्य करतोय, त्याचं मानसिक संतुलन बिघडलंय", अशी टीका राणे यांनी केली. इंदिरा गांधी यांच्याबद्दलचं वक्तव्य लोक विसरणार नाही : राणे संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरही राणे यांनी टीका केली. दिवंगत इंदिरा गांधी यांच्याबद्दल राऊतांनी माघार घेतलं असलं तरी लोक ते विसरणार आहेत का? अशा प्रश्न राणेंनी उपस्थित केला. संजय राऊत यांच्या मनात नेमकं काय आहे हे स्पष्ट करावं. जर पुन्हा असं धाडस केलं तर खपवून घेणार नाही, असा इशाराही राणे यांनी दिला. उद्धव ठाकरे यावर का बोलत नाही? : राणे संजय राऊत जे बोलेल त्याची नैतिक जबाबदारी उद्धव ठाकरे यांची आहे. संजय राऊत जे बोलतात ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलायला सांगतात का? यावर उद्धव ठाकरे का प्रतिक्रिया देत नाहीत? असे प्रश्नही राणे यांनी उपस्थित केलेत. यापुढे जे घडेल त्याला सरकार जबाबदार राहणार आहे. संजय राऊत म्हणाले, की मी दाऊदशी बोलायचो आणि नंतर म्हणाले की दाऊदला दमही दिला. संजय राऊत यांच्या व्यक्तव्याबद्दल गृह विभागाने त्यांची चौकशी केली पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केली. हे आठवडी बाजार सरकार आहे : राणे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारवही जोरदार टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात सत्तांतर झालं आणि सरकार अस्तित्वात आलं असं म्हणतात, पण अजून मलातरी ते जाणवत नाही. कर्जमाफीच्या जीआरमध्ये तारीख नाही, खर्चाची माहिती नाही, लाभार्थ्यांची माहिती नाही. कर्जमाफी निर्णय नाही फकीर घोषणा असल्याचे राणे म्हणाले. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणला नाही. त्याअगोदरच पुतळ्याची उंची वाढवण्याची घोषणा होत आहे. आठवडी बाजारानुसार आठवड्याला मंत्री येतात आणि रात्री निघून जातात, असं म्हणत हे आठवडी बाजार सरकार असल्याचे टीका राणेंनी केली. या सरकारने एकही लोकहिताचा निर्णय अद्याप घेतला नाही. मुख्यमंत्री नेमकं कोण? असा प्रश्न उपस्थित करत राणे यांनी आज महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. संबंधित बातमी : Sanjay Raut | काँग्रेस नेत्यांच्या आक्षेपानंतर संजय राऊतांकडून इंदिरा गांधींबद्दल वक्तव्य मागे | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Pratap Sarnaik Warning : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget