एक्स्प्लोर

जळगावमध्ये डंपर-क्रूझरच्या अपघातात 11 जणांचा मृत्यू, यावल-फैजपूर मार्गावरील घटना

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात हिंगोणे गावाजवळ झालेल्या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण यामध्ये जखमी झाले आहेत.

जळगाव : जळगावमध्ये डंपर आणि क्रुझरमध्ये झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर सात जण जखमी आहे. यावल तालुक्यातील यावल-फैजपूर रस्त्यावरील हिंगोणे गावाजवळ ही घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील मेहुन आणि निंबोल गावातील महाजन, पाटील आणि चौधरी कुटुंबीय विवाह समारंभासाठी चोपडा येथे क्रूझर गाडीने निघाले होते. चोपडा येथील विवाह समारंभाहून रात्रीच्या वेळेस परत येत असताना यावल तालुक्यातील हिंगोणे गावाजवळ दिपनगरहबन राखेने भरलेल्या डंपरने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोल गावच्या बाळू नारायण चौधरी यांच्या मुलीच्या विवाहनंतर तिच्या सासरी चोपडा येथे कार्यक्रमांकाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमानंतर परतत असताना हा अपघात झाला. या अपघातात नवरीचे वडील बाळू चौधरी त्यांच्या पत्नी मंगला चौधरी यांचाही मृत्यू झाला आहे.

मृतांची नावं

मंगलाबाई ज्ञानेश्वर चौधरी (वय 65), प्रभाकर उर्फ बाळू नारायण चौधरी (वय 60), प्रभाबाई प्रभाकर चौधरी (वय 40), आश्लेषा उमेश चौधरी (वय 28), रिया जितेंद्र चौधरी (वय 21), सोनाली जितेंद्र चौधरी (वय 34), प्रियांका नितीन चौधरी (वय 29) हे सर्व मुक्ताईनगर येथे राहणारे आहेत. तर सोनाली सचिन महाजन (वय 34), सुमनबाई श्रीराम पाटील (वय 55) आणि संगीता मुकेश पाटील (वय 40) हे रावेर येथे राहणारे आहेत.

जखमींची नावं

सर्वेश नितीन चौधरी (वय 9) , शिवम प्रभाकर चौधरी, मीना प्रफुल चौधरी (वय 30), सुनिता राजाराम पाटील, धनराज गंभीर कोळी (क्रूझर चालक) हे चिंचोल येथे राहतात. आदिती मुकेश पाटील ही निंबोल येथे राहते. तसेच डंपर चालक मुकुंदा गणेश भंगाळे हे यावल येथे राहतात.

जळगावचा रस्ते अपघातात राज्यात पाचवा क्रमांक

जळगाव जिल्ह्याचा रस्ते अपघातात राज्यात पाचवा क्रमांक लागतो. वर्षभरात जळगाव जिल्ह्यात 454 अपघात झाले आहेत. राज्यभरात रस्ते अपघातात वर्षभरात 12,565 जणांचा मृत्यू झालाय. राज्यात जानेवारी ते डिसेंबर 2019 या एक वर्षाच्या कालावधीत 32 हजार 876 रस्ते अपघात झाले. त्यात 12 हजार 565 जणांचा मृत्यू झाला. 2019 मध्ये सर्वाधिक 2 हजार 856 अपघात मुंबईत झाले. त्यात 405 जण ठार झाले. सर्वात जास्त 873 जण औरंगाबाद जिल्ह्यात तर त्याखालोखाल 855 जण पुणे जिल्ह्यात ठार झाले आहेत. नाशिक जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असून तेथे 783 जणांचा मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 65 अपघातात 531 जण ठार झाले आहेत. जळगाव जिल्हा राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. 835 अपघातात 454 जण ठार झाले.  2018 मध्ये राज्यात 35 हजार 717 अपघात झाले होते. त्यात 13 हजार 261 जणांचा मृत्यू तर 31 हजार 265 जण जखमी झाले होते. तरुणांचीच सर्वाधिक संख्या अपघातात 40 वर्षांच्या आत मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. चिंतेची बाब म्हणजे महामार्गावरच सर्वाधिक अपघात झाले आहेत.

संबंधित बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बनावट ग्रामसेवक नियुक्तीपत्र प्रकरण! नाशिक जिल्ह्यात खळबळ, तरुणाची आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर
बनावट ग्रामसेवक नियुक्तीपत्र प्रकरण! नाशिक जिल्ह्यात खळबळ, तरुणाची आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर
धक्कादायक! नागपुरात दिवसाढवळ्या हत्येचा थरार, पती पत्नीने मिळून केली प्रियरकाची हत्या
धक्कादायक! नागपुरात दिवसाढवळ्या हत्येचा थरार, पती पत्नीने मिळून केली प्रियरकाची हत्या
Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांना संधी, आदित्य ठाकरेंच्या मनात सल कायम? म्हणाले, वाद नको होता म्हणून संमती दिली
राज्यसभेसाठी शरद पवारांना संधी, आदित्य ठाकरेंच्या मनात सल कायम? म्हणाले, वाद नको होता म्हणून संमती दिली
महाराष्ट्र तापला! मार्चच्या पहिल्या आठवड्यातच तापमानाच्या पाऱ्यानं गाठला उच्चांक, अकोल्यात 40 अंशाची नोंद 
महाराष्ट्र तापला! मार्चच्या पहिल्या आठवड्यातच तापमानाच्या पाऱ्यानं गाठला उच्चांक, अकोल्यात 40 अंशाची नोंद 

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget