एक्स्प्लोर

औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली; 100 ते 150 फूट पाण्याचे फवारे

Aurangabad : जलवाहिनी फुटल्यावर तब्बल 100 ते 150 फुटांपर्यंत उंच असे पाण्याचे फवारे उडतांना पाहायला मिळाले.

औरंगाबाद : शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी पुन्हा एकदा फुटली आहे. औरंगाबाद पैठण रस्त्यावरील चितेगाव टोल नाक्याजवळ ही जलवाहिनी फुटली आहे. औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यान याचवेळी पोकलेनचा धक्का लागल्याने ही जलवाहिनी फुटली असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे जलवाहिनी फुटल्यावर तब्बल 100 ते 150 फुटांपर्यंत उंच असे पाण्याचे फवारे उडताना पाहायला मिळाले. त्यामुळे लाखो लिटर पाणी अक्षरशः रस्त्यावर वाया गेले आहे. तर दुसरीकडे याचा फटका औरंगाबाद शहराला बसण्याची शक्यता असून, पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचा अंदाज आहे. 

मागील काही दिवसापासून औरंगाबाद पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी जेसीबी आणि पोकलेन वापरले जात आहे. दरम्यान, आज (4 सप्टेंबर) रोजी रस्त्याचे काम सुरू असताना, एका पोकलेनचा धक्का औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला लागला. त्यामुळे ही जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यावर मोठ्या प्रमाणातून त्यातून पाणी उडताना पाहायला मिळालं. या पाण्याचा वेग एवढा होता की, अक्षरशः 100 ते 150 फूट उंच पाण्याचे फवारे उडत होते. त्यामुळे तासाभरात लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेलं. हवेत उडणारे पाण्याचे फवारे बंद करण्यासाठी पोकलेनची बकेट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण पाण्याचा वेग अधिक असल्याने पोकलेन देखील काहीच करू शकले नाही. शेवटी याची माहिती महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाला देण्यात आली. त्यानंतर फारोळा जलशुद्धी केंद्रातून पाणी बंद करण्यात आले . वरून पाणी बंद झाल्यानंतर फुटलेल्या जलवाहिनीतील पाण्याचा वेग देखील कमी झाला. 

महानगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी

औरंगाबाद पैठण रस्त्यावरील चितेगाव टोलनाक्यावर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच, महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. जेसीबीच्या मदतीने जलवाहिनी मोकळी करण्याचे  काम सुरु आहे. तसेच जलवाहिनी दुरुस्तीचे काम देखील हाती घेण्यात येणार आहे. मात्र, या दुरुस्तीसाठी किती वेळ लागेल याबाबत कोणतीही अधिकृत माहिती प्रशासनाकडून मिळू शकली नाही. 

शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत?

मागील काही दिवसात औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणारी पाणीपुरवठा योजना सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने खंडित होत आहे. कधी पाईपलाईन फुटते, कधी सबस्टेशनमध्ये अचानक स्पार्किंग होते, तर कधी पंपगृहात शॉर्टसर्किट होतो. विशेष म्हणजे औरंगाबाद शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या 1200 आणि 700 मिमीच्या जलवाहिन्या जुन्या झाल्याने सतत फुटत आहे. या सर्व कारणांमुळे औरंगाबाद शहरवासीयांना सतत पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. भर पावसाळ्यात नागरिकांना सहा ते आठ दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

जालना घटनेच्या निषेधार्थ आज औरंगाबाद जिल्ह्यात बंदची हाक; MIM सह अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget