एक्स्प्लोर

गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाबाबत खडसेंनी केलेला आरोप खोटा : देवेंद्र फडणवीस

भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काल गोपीनाथ गडावरून केलेल्या आरोपांवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर दिलं आहे. खडसे हे काय बोलले त्याच्यावर मी भाष्य करणार नाही, मात्र खडसे जे बोलले ते बोलायला नको होते असे फडणवीस म्हणाले. ते एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काल गोपीनाथ गडावरून केलेल्या आरोपांवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर दिलं आहे. खडसे हे काय बोलले त्याच्यावर मी भाष्य करणार नाही, मात्र खडसे जे बोलले ते बोलायला नको होते असे फडणवीस म्हणाले. ते एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. फडणवीस यांनी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केल्याचे आरोप खडसे यांनी गोपीनाथगडावरुन केले होते. नाथाभाऊ अनेकदा असं बोलतात ते त्यांच्या मनात नसतं पण ते बोलून जातात. मात्र यामुळं त्यांचं नुकसान होतं, असंही फडणवीस म्हणाले. खदखद योग्य ठिकाणी मांडायला हवी. खडसे यांच्या मुलीला तिकीट दिलंच की. त्यांना तिकिट न देण्याचा केंद्राचा निर्णय होता. राज्यातून नव्हता, असेही ते म्हणाले. त्यांनी अशाप्रकारे त्यांनी बोलायला नको होतं. मंचही योग्य नव्हता. तो जयंतीचा कार्यक्रम होता, असंही फडणवीस म्हणाले. खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाबाबत केलेल्या आरोपावर बोलताना ते म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक झालं नाही असा आरोप करण्यात आला. मात्र या आरोपात काही तथ्य नाही कारण गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचं डिझाईन तयार होण्यात काहीसा वेळ गेला. ते झाल्यानंतर त्या स्मारकाला सिडकोतून निधी देण्यात आला आणि त्याचे वर्क ऑर्डरही आली. खडसे यांनी उद्धवजींकडे पैसे मागण्याची गरज नाही, त्यांनी स्थगिती दिली असेल तर वेगळी गोष्ट आहे असाही टोला फडणवीस यांनी लगावला. भाजपा सरकारने गोपीनाथ मुंडे यांच्या चांगल्या स्मारकासाठी 46 कोटींचा निधी मंजूर केला. त्याच्या कामाची सुरुवात होते आहे. एवढंच नाही तर चार महिन्यांपूर्वीच LOA मान्य झाला होता. आचारसंहिता लागू झाली त्यामुळे काम थांबलं. लोकसभा निवडणुकीच्या आधीच स्मारकाचं टेंडर निघालं आहे असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. हे ही वाचा - शिवसेनेने महायुतीला मिळालेल्या जनाधाराचा विश्वासघात केला; फडणवीसांचा आरोप यावेळी फडणवीस यांनी भाजपा हा ओबीसींचाच पक्ष आहे आणि कायम ओबीसींचा पक्ष राहिल असं देखील म्हटलं आहे. सर्वाधिक ओबीसी मंत्री भाजपाच्या सरकारमध्ये होते. ओबीसी मंत्रालय स्थापन झालं तेदेखील भाजपाच्याच सरकारमध्ये असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच आमच्या काळात ओबीसी मंत्री झाले तेव्हा ते ओबीसी होते म्हणून झाले नाहीत, तर त्यांच्या क्षमतेमुळे ते मंत्री झाले. एवढंच नाही तर भाजपमध्ये मी माझा एकही गट तयार केला नाही. भाजपचे सगळे आमदार आमचेच आहेत असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले. हे देखील वाचाDevendra Fadnavis Exclusive | आमच्यासोबत येण्याआधी अजित पवार शरद पवारांशी बोलले होते : देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे, एकनाथ खडसे हे नाराज आहेत याबाबत त्यांना विचारलं असता, फडणवीस म्हणाले की, पंकजा मुंडे यांच्याशी आम्ही संवाद साधू. पंकजा मुंडे यांना जेव्हा जेव्हा टार्गेट केलं गेलं तेव्हा त्यांच्या बाजूने मी कायमच त्यांच्या बाजूने उभा राहिलो. माझ्या मनात पंकजा मुंडे यांच्याबाबत आदराचीच भावना आहे. आजही आहे, उद्याही राहील, असे ते म्हणाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, भाजपचा पराभव झालेला नाही. आम्ही उलट कमी जागा लढवून जास्त जागा जिंकलो. हे खरं आहे की आम्हाला जास्त जागा येतील अशी अपेक्षा होतील. आम्हाला 130 जागा येतील असं वाटलेलं. महायुतीला म्हणून लोकांनी बहुमत दिलं आहे, दोघांच्या जागा बहुमतापेक्षा कितीतरी जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे आमचा पराभव झालेला नाही, असेही ते म्हणाले. मी पुन्हा येईन हा शब्द आम्ही म्हणूनच आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 2 July 2026: जुलैचा दुसरा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! गुरूवारचा शुभ संयोग, दत्तगुरूंच्या कृपेने संकट टळेल, आजचे राशीभविष्य...
जुलैचा दुसरा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! गुरूवारचा शुभ संयोग, दत्तगुरूंच्या कृपेने संकट टळेल, आजचे राशीभविष्य...
Ind vs Eng 1st T20 Live Score : 6 धावांवर 2 विकेट्स... मग अभिषेक-श्रेयसचा राडा; दुबने इंग्लंडला धुतलं, थेट 189 धावांचा डोंगर
6 धावांवर 2 विकेट्स... मग अभिषेक-श्रेयसचा राडा; दुबने इंग्लंडला धुतलं, थेट 189 धावांचा डोंगर
धक्कादायक! पुतणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहण, तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू 
धक्कादायक! पुतणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहण, तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू 
चेंबूर झाड दुर्घटना : निष्काळजीपणाचा ठपका, मुंबई महापालिकेच्या आणखी एका अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
चेंबूर झाड दुर्घटना : निष्काळजीपणाचा ठपका, मुंबई महापालिकेच्या आणखी एका अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
Embed widget