एक्स्प्लोर

Devendra Fadnavis Exclusive I शिवसेनेने जनाधाराचा विश्वासघात केला : फडणवीस

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीला शिवसेनाच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मुंबई : शिवसेनेने महायुतीला मिळालेल्या जनाधाराचा विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यातील भाजपचं सरकार पडल्यानंतर पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपा माझाला मुलाखत दिली. राज्यातील आजच्या राजकीय परिस्थितीला शिवसेना जबाबदार असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला. महायुती म्हणून लढल्यानंतर शिवसेना बाहेर पडली. देशात असं कधीही घडलेलं नव्हतं. 2019 ची निवडणूक आम्ही महायुतीत लढलो, त्याला राज्याच्या जनतेने स्पष्ट बहुमत दिले. तरीही शिवसेनेने मिळालेल्या जनाधाराचा विश्वासघात केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. विधानसभा निवडणुकीत आम्ही ज्या जागा लढलो त्यातल्या 105 जागा आम्हाला मिळाल्या. आम्हाला यापेक्षा जास्त जागा अपेक्षित होत्या. 164 पैकी 130 जागा येतील अशी अपेक्षा होती. मात्र, आमच्या 105 जागा आल्या. मात्र, याला आम्ही पराभव म्हणणार. जनादेश आमच्याजवळ होता, मात्र आमच्या मित्रपक्षाने जनादेशाचा विश्वासघात केला त्यामुळे आम्हाला विरोधात बसावं लागलं असं देवेद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिवसेनेने उघड आमच्या विरोधात काम केले : फडणवीस  विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेने आमच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीला उघड मदत केली. आमच्याही काही नेत्यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केली. मात्र, मी स्वतः फोन करुन बंडखोरी मागे घेण्यास लावली. भाजपला वेगळं पाडायचं हे शिवसेनेने आधीच ठरवलं होतं, त्यामुळेच शिवसेनेने आमच्या युती तोडल्याचे फडणवीस म्हणाले. आम्हाला कधीच वाटलं नाही, की शिवसेना काँग्रेससोबत जाईल. शिवसेनेने बाळासाहेबांचे विचार गुंडाळून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केल्याचंही ते म्हणाले. शिवसेनेसाठी कधीही दारं उघडं - 24 तारखेला निकाल लागल्यापासून आम्ही शिवसेनेसोबत जाण्यासाठी संवाद केला. मी स्वतः फोन केला. मात्र त्यांनी फोन घेतले नाहीत. उद्या बोलू असे निरोप त्यांच्या माणसांकडून यायचे. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागली. त्यानंतर आम्हाला एकटं पडलं असल्याचं लक्षात आल्याचं फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही संवाद साधला नाही, हा सेनेचा आरोप चुकीचा असल्याचं त्यांनी माझाशी बोलताना सांगितले. दरम्यान, शिवसेना हा आमचा समविचारी पक्ष आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी आजही दार उघडं असल्याचं सांगत त्यांनी पुन्हा एकदा सेनेला ऑफर दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Mumbai New Mantralay: मुंबईत सरकारचा नवा पत्ता! एअर इंडिया इमारतीच्या 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तर 22 व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल; कसे असेल नवीन मंत्रालय, Video
मुंबईत सरकारचा नवा पत्ता! एअर इंडिया इमारतीच्या 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तर 22 व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल; कसे असेल नवीन मंत्रालय, Video
Mumbai Crime News: मुंबईतील टायगर ग्रुपच्या अध्यक्षाला पोलिसांचा दणका, अंधेरीमधील खासगी प्लॉट कब्जा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील टायगर ग्रुपच्या अध्यक्षाला पोलिसांचा दणका, अंधेरीमधील खासगी प्लॉट कब्जा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Mumbai High Court On Tukaram Mundhe FDA: हे योग्य नाही...मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह; नेमकं काय काय म्हटलं?
हे योग्य नाही...मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह; नेमकं काय काय म्हटलं?

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surekha Nyare Death Case Kolhapur Crime News: आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
Mumbai New Mantralay: मुंबईत सरकारचा नवा पत्ता! एअर इंडिया इमारतीच्या 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तर 22 व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल; कसे असेल नवीन मंत्रालय, Video
मुंबईत सरकारचा नवा पत्ता! एअर इंडिया इमारतीच्या 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तर 22 व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल; कसे असेल नवीन मंत्रालय, Video
Sangli Crime News: दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
Ramayana Part 1 Trailer Review: प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
Embed widget