एक्स्प्लोर

Health Tips : निरोगी गर्भधारणेसाठी आयुर्वेदात सांगितलेला 'हा' आहार नऊ महिने पाळा; बाळही सुदृढ राहील

Health Tips : आयुर्वेदात नेहमीच चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहार घ्या असे सांगितले आहे.

Health Tips : कोणत्याही महिलेसाठी गर्भधारणेचा (Pregnancy) टप्पा जितका खास असतो तितकाच तो नाजूकही असतो. या काळात खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. गरोदरपणात कधी आणि कोणते खाणे योग्य आहे याची सविस्तर माहिती आयुर्वेदाने दिली आहे. आयुर्वेदात दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास निरोगी गर्भधारणा होऊ शकते. गर्भधारणेदरम्यान, बाळाचा आईच्या उदरात विकास होत असताना, स्त्रीच्या शरीरात अनेक बदल घडतात. बाळ आणि आई निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदात काही आहाराच्या पद्धती सांगितल्या आहेत. 

आयुर्वेदात नेहमीच चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहार घ्या असे सांगितले आहे. तसेच, गर्भधारणेदरम्यान, महिलांनी पोटातील बाळाचे पोषण करण्यासाठी पोषक तत्वांनी समृद्ध अन्न खाणे आवश्यक आहे. गरोदरपणात आयुर्वेदात सांगितलेला आहार महिन्यांनी पाळला गेला तर गर्भधारणा तर निरोगी राहतेच, शिवाय बाळाला सर्व आवश्यक पोषक घटकही मिळतात. 

गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत आहार कसा असावा?

आयुर्वेदात वात, कफ आणि पित्त लक्षात घेऊन आहाराच्या सूचना दिल्या आहेत. गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत वात संतुलित करणे महत्त्वाचे आहे. गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत महिलांनी हलके तेलकट पदार्थ जसे की सूप, भाजलेल्या भाज्या खाव्यात. याशिवाय दही आणि तूप यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. ओट्स लाडू, आवळा आणि ब्राह्मी, शंखपुष्पी यांसारख्या औषधी वनस्पती आहारात घ्याव्यात. यामुळे शरीराला ताकद मिळते.

दुसऱ्या तिमाहीत खाण्यासाठी योग्य अन्न कोणते आहे?

गरोदरपणाच्या दुस-या तिमाहीत पित्त दोष म्हणजेच अग्नि तत्व संतुलित करणे आवश्यक आहे. पित्ताला शांत करण्यासाठी, या काळात शरीराला थंडावा देणारे पोषक तत्वांनी युक्त असे पदार्थ खावेत. जसे की, नारळ पाणी, दूध, टरबूज, काकडी इ. यामुळे मूड स्विंगसारख्या समस्या होत नाहीत. गर्भधारणेदरम्यान, जास्त तळलेले अन्न खाऊ नका.  

गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीत आहार कसा असावा?

गरोदरपणाचा तिसरा तिमाही, म्हणजे सातव्या ते नवव्या महिन्यापर्यंतचा कालावधी चढ-उतारांनी भरलेला असतो. या काळात महिलांमध्ये शारीरिक, मानसिक बदलही झपाट्याने होतात. आयुर्वेदानुसार या टप्प्यात, गर्भवती महिलांनी त्यांच्या कफ उर्जेचे संतुलन राखणे आवश्यक आहे. जेणेकरून निरोगी प्रसूती होईल. तिसर्‍या तिमाहीत, महिलांनी आपल्या आहारात धान्य, भाज्या, शेंगा, मसाले आणि काही औषधी वनस्पती यांसारखे गरम आणि कोरडे पदार्थ समाविष्ट केले पाहिजेत. यामुळे आई आणि बाळ दोघांनाही निरोगी राहण्यासाठी आवश्यक पोषक तत्व मिळतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania On Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला:दमानियाAkola : अकोल्याच्या बाळापूरात क्षारयुक्त पाणी प्यावं लागत असल्यानं शेकडो ग्रामस्थांना किडनीचे आजारJob Majha | केंद्रीय रस्ते संशोधन संस्था येथे नोकरीच्या संधी | 01 April 2025 | ABP MajhaManoj Jarange on Beed : कळंब महिला हत्या प्रकरणावर मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Manoj Jarange : फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
Embed widget