एक्स्प्लोर

'पानी' चित्रपटाच्या मतभेदानंतर सुशांतने यशराज चित्रपटाचा करार मोडला

यश राज फिल्म्समध्ये शानू शर्माचे मोठे स्थान आहे. शानूने रणवीर सिंग, अर्जुन कपूर यासारख्या मोठ्या स्टार्स ला चित्रपटसृष्टीत ब्रेक दिला. 'पवित्र रिश्ता' आणि 'झलक दिखला जा' नंतर सुशांत छोट्या पडद्यावर खूप लोकप्रिय झाला. 'झलक दिखला जा' रियालिटी शो दरम्यान शानू शर्मा यांनी सुशांतला यशराज साठी कास्ट केले.

मुंबई : आदित्य चोपडा आणि चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यात क्रीएटिव डिफरन्समुळे 'पानी' चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही, ज्याबद्दल यशराज फिल्म्सवर सुशांत नाराज होता. यशराजची कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबत हा खुलासा केला आहे.

शानू शर्मा यांनी पोलिसांना माहिती दिली की, 'यशराजसोबतचा तिसरा चित्रपट 'पानी' साठी सुशांत खूप उत्सुक होता. यशराज यांनाही हा चित्रपट बीग बजेट चित्रपट बनवायचा होता. यशराजने या चित्रपटाच्या पूर्वनिर्मितीसाठी 4-5 कोटी रुपये खर्च ही केले. परंतु आदित्य चोपडा आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यात हा चित्रपट करण्यासाठी एकमत झाले नाही. या दोघांमध्ये चित्रपट विषय क्रीएटिव डिफरन्समुळे हा चित्रपट बनू शकला नाही. हा चित्रपट पूर्ण न झाल्यामुळे सुशांत नाराज होता आणि त्याने यशराज फिल्म्स सोडण्याचा निर्णय घेतला'.

कराराचा तिसरा चित्रपट न केल्यानंतर ही सुशांतला यशराजने जाण्याची परवानगी का दिली, असा सवाल पोलिसांनी शानू शर्माला केला असता शर्मा यांनी सांगितले की, 'सुशांतने आम्हाला यशराज सोडण्याची विनंती केली. आम्हाला (यश राज) देखील हा विषय जास्त ड्रॅग करायचा नव्हता. हा करार प्रत्येकाच्या संमतीने संपत होता, म्हणून यशराजांनी सुशांतवर तिसरा चित्रपट करण्याचा आग्रह धरला नाही आणि तो करारातून बाहेर पडला'.

परंतु पोलिस शानू शर्मा यांच्या या वक्तव्याचे अधिक बारकाईने परीक्षण करणार आहे, ज्यासाठी पोलिस शानू शर्माला चौकशीसाठी परत बोलवू शकतात. याबरोबरच या डीलमध्ये सामील असलेल्या इतर लोकांचीही स्टेटमेन्ट रेकॉर्ड केले जाणार आहे.

जेव्हा शानू शर्मा यांना विचारले गेले की सुशांतने रियाला यशराज चित्रपटही सोडण्यास सांगितले होते. सुशांत यशराजवर इतका नाराज का होता की तो यशराजबरोबर स्वत: च नव्हे तर इतरांनाही काम नाही करण्याचे सल्ले देत होता. यावर शानूने सांगितले की 'सुशांत यशराजशी नाराज नव्हता. सुशांत स्वत:च्या मर्जीनं यशराजच्या कानट्रॅक्ट मधून बाहेर पडला. यशराज आणि सुशांतमध्ये कोणते ही मतभेद, भांडण किंवा आर्थिक संबंधही राहिले नव्हते'.

यशराजसाठी सुशांतसिंह राजपूतला तिनेच कास्ट केल्याचं शानू शर्मा यांनी पोलिसांना सांगितले. शानू शर्मा यांनी पोलिसांना माहिती दिली 'पवित्र रिश्ता' आणि 'झलक दिखला जा' नंतर सुशांत छोट्या पडद्यावर खूप लोकप्रिय झाला. 'झलक दिखला जा' रियालिटी शो दरम्यान मी त्याला यशराज साठी कास्ट केले'.

शानू शुर्मा यांनी पोलिसांना सांगितले की, 'यशराज सुशांतला औरंगाजेब चित्रपटासाठी कास्ट करणार होते. या चित्रपटात सुशांतला अर्जुन कपूरच्या भावाच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. पण यशराजने त्या चित्रपटासाठी सुशांतला पाठविलेले मेल त्याने पाहिला नाही. जेव्हा सुशांत यशराजकडे परत आला, तेव्हा तो 'काय पो चो' चित्रपट करत होता, म्हणूनच यशराज यांनी नंतर सुशांतला 'शुद्ध देसी रोमॅन्स' या चित्रपटासाठी साइन केल. सुशांतने यशराजसाठी केलेला दुसरा चित्रपट 'ब्योमकेश बक्षी' होता. तिसरा म्हणजे 150 कोटींचा बजेट चित्रपट होता ‘पानी’जो बनू शकला नाही आणि यशराजसोबत सुशांतने आपला करार संपवला.’

त्याचवेळी, पोलिसांनी जेव्हा शानूला विचारले की, यशराजबरोबर झालेल्या करारामुळे सुशांतला मोठा चित्रपट सोडावा लागला होता का? यावर शानूने सांगितले की, आपल्याकडे याबद्दल काही माहिती नाही किंवा त्याने हे कधीही ऐकले नाही.

यश राज फिल्म्समध्ये शानू शर्माचे मोठे स्थान आहे. शानूने रणवीर सिंग, अर्जुन कपूर यासारख्या मोठ्या स्टार्स ला चित्रपटसृष्टीत ब्रेक दिला. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणार्‍या पथकाचे प्रमुख डीसीपी अभिषेक त्रिमुखे म्हणाले, 'आम्ही आतापर्यंत 27 जणांची चौकशी केली आहे, मुंबई पोलिस प्रत्येक बाजूने या प्रकरणाचा तपास करत आहेत'.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित बरीच मोठी नावे असून त्यांची चौकशी केली जात आहेत.

संबंधित बातम्या :

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत महानायकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, पण नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प, रोहित पवारांचा टोला  
मुंबईत महानायकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, पण नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प, रोहित पवारांचा टोला  
Panchayat 5 OTT Release: बोहल्यावर चढणार ‘सचिव जी’, उपप्रधान होण्यासाठी रंगणार मोठा संघर्ष; ‘पंचायत 5’ कधी येणार?
बोहल्यावर चढणार ‘सचिव जी’, उपप्रधान होण्यासाठी रंगणार मोठा संघर्ष; ‘पंचायत 5’ कधी येणार?
Vicky Kaushal on Aamir Khan: आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
Gaurav More Hindi Webseries: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम गौरव मोरे झळकला राजकुमार हिरानींच्या वेबसिरीजमध्ये! चाहत्यांच्या भुवया उंचावल्या; विशाखा सुभेदारची कमेंट चर्चेत
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम गौरव मोरे झळकला राजकुमार हिरानींच्या वेबसिरीजमध्ये! चाहत्यांच्या भुवया उंचावल्या; विशाखा सुभेदारची कमेंट चर्चेत

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Nifty 50 : निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Embed widget