एक्स्प्लोर

Vinod Khanna Birth Anniversary : आधी चित्रपटांत येण्यासाठी केला अट्टहास, प्रसिद्ध झाल्यावर संन्यास घेण्याचा निर्णय घेणारे विनोद खन्ना!

Vinod Khanna Birth Anniversary : मनोरंजन विश्वात खलनायक म्हणून एंट्री करणाऱ्या विनोद खन्ना यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारात मनोरंजन विश्वावर अधिराज्य गाजवलं.

Vinod Khanna Birth Anniversary : मनोरंजन विश्वात 70च्या दशकांत अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांची जादू पसरलेली होती. तर, दुसरीकडे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) देखील बॉलिवूड गाजवू लागले होते. याच दरम्यान आणखी एका अभिनेत्याने मनोरंजन विश्वात एन्ट्री घेतली आणि अवघ्या प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे वळवून घेतलं. या अभिनेत्याचं नाव होतं विनोद खन्ना (Vinod Khanna). मनोरंजन विश्वात खलनायक म्हणून एंट्री करणाऱ्या विनोद खन्ना यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारात मनोरंजन विश्वावर अधिराज्य गाजवलं.

अभिनेते विनोद खन्ना यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1946 रोजी पेशावर (आताचे पाकिस्तान) येथील एका पंजाबी कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील व्यापारी होते. भारत-पाक फाळणीनंतर त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. विनोद खन्ना हे सिनेसृष्टीतील असे कलाकार होते, ज्यांनी चित्रपटात नायकासोबतच खलनायकाच्या भूमिका साकारून भरपूर प्रसिद्धी मिळवली. विनोद खन्ना चित्रपटात आपल्या व्यक्तिरेखेवर वेगवेगळे ​​प्रयोग करायचे. यामुळेच त्यांनी खलनायक बनूनही प्रेक्षकांची मने जिंकली.

अशी झाली मनोरंजन विश्वात एन्ट्री!

विनोद खन्ना शाळेत असताना खूप लाजाळू स्वभावाचे होते. एकदा त्यांच्या शिक्षकाने त्यांना एका नाटकांत जबरदस्ती भाग घ्यायला लावला होता. शाळेतील याच नाटकाने त्यांचं मतपरिवर्तन झालं. इथूनच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अभिनय करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय घेतल्यानंतर त्यांना वडिलांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. विनोद खन्ना यांच्या वडिलांना त्यांनी अभिनेता व्हावं असं मुळीच वाटत नव्हतं. आपल्या मुलाने व्यवसाय सांभाळावा, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, शेवटी विनोद खन्ना यांच्या आईने समजूत घालत समेट घडवून आणला.

1968 मध्ये सुनील दत्त यांनी त्यांना त्यांच्या 'मन का मीत' चित्रपटात खलनायक साकारण्याची संधी दिली. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. यानंतर त्यांनी आपली यशस्वी कारकीर्द अशीच सुरु ठेवली.

मनोरंजन विश्वातून संन्यास घेत गाठला आश्रम

विनोद खन्ना यांनी 1982 दरम्यान चित्रपट कारकिर्दीत यशाच्या शिखरावर असतानाच थेट संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. आलिशान घर, पैसा सोडून त्यांनी आश्रमात जाण्याचा निर्णय घेतला. संपत्ती आणि प्रसिद्धी असली, तरी आपल्या आयुष्यात काहीतरी कमतरता आहे, असे सतत त्यांना वाटायचे. यामुळेच त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला आणि ते अमेरिकेतील अध्यात्मिक गुरु ओशोंच्या आश्रमात गेले. येथे ते पाच वर्षे राहिले. ओशोंच्या आश्रमात ते संन्यासी झाले. विनोद खन्ना अमेरिकेत जाऊन ओशोंच्या आश्रमातील माळीच्या कामापासून ते टॉयलेट साफ करण्यापर्यंतची सर्व कामे करायचे. मात्र, पुन्हा भारतात आल्यानंतर ते मनोरंजन विश्वात सक्रिय झाले.

हेही वाचा :

विनोद खन्नांच्या 'त्या' निर्णयाने बॉलिवूड हादरलं होतं!

Heropanti 2: Heropanti 2 साठी Nawazzudin Siddqui करणार Vinod Khanna ची नक्कल

हर्षदा भिरवंडेकर
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Dia Mirza Questions PM Modi : 'तुम्हाला काहीतरी बोलायला 47 दिवस...' पंतप्रधान मोदींच्या स्टेटमेंटवर दिया मिर्झाचा तिखट शब्दांत सवाल; म्हणाली..
'तुम्हाला काहीतरी बोलायला 47 दिवस...' पंतप्रधान मोदींच्या स्टेटमेंटवर दिया मिर्झाचा तिखट शब्दांत सवाल; म्हणाली..
Jana Nayakan Box Office: मुख्यमंत्र्यांच्या 'जना नायकन'ने दुसऱ्या दिवशी कमावले 'इतके' कोटी; चित्रपटावर पडला पैशांचा पाऊस, लवकरच 100 कोटी गाठणार
मुख्यमंत्र्यांच्या 'जना नायकन'ने दुसऱ्या दिवशी कमावले 'इतके' कोटी; चित्रपटावर पडला पैशांचा पाऊस, लवकरच 100 कोटी गाठणार
Sanjay Narvekar on CJP Protest: 'वास्तव'मधील देढ फुटियाचा जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांना पाठिंबा; म्हणाले, 'जंतर मंतरवर अचानक गुंडागर्दी का सुरू झाली? यामागे राजकारण'
'वास्तव'मधील देढ फुटियाचा जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांना पाठिंबा; म्हणाले, 'जंतर मंतरवर अचानक गुंडागर्दी का सुरू झाली? यामागे राजकारण'
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला : धर्मेंद्र प्रधान
NEET Exam Protest: एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
Bihar Student Protest: 'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
NEET Maharashtra Protest: वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
Abhijeet Dipke on PM Modi: दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
Embed widget