एक्स्प्लोर

CBI ची मोठी कारवाई! ऑपरेशन चक्र-V अंतर्गत डिजिटल अरेस्ट टोळीचा पर्दाफाश, सात कोटींची फसवणूक करणाऱ्या चौघांना बेड्या

Digital Arrest : CBI ने ऑपरेशन चक्र-V अंतर्गत मोठी कारवाई करत डिजिटल अरेस्ट फसवणुकीत गुंतलेल्या टोळीतील चार जणांना अटक केली आहे.

Digital Arrest : CBI ने ऑपरेशन चक्र-V अंतर्गत मोठी कारवाई करत डिजिटल अरेस्ट (Digital Arrest) फसवणुकीत गुंतलेल्या टोळीतील चार जणांना अटक केली आहे. 12 वेगवेगळ्या ठिकाणी शोध मोहिमेनंतर ही अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी मुंबई आणि मुरादाबाद येथील असल्याची माहिती समोर येत आहे.  

ऑपरेशन चक्र-V अंतर्गत डिजिटल अटक सारख्या गुन्ह्यांचे जाळे पूर्णपणे उद्ध्वस्त व्हावे, यासाठी सखोल तपास करत आहे. अलिकडच्या काही महिन्यांत डिजिटल अटक संबंधित अनेक तक्रारी सीबीआयकडे प्राप्त झाल्या आहेत. या संदर्भात, राजस्थान सरकारच्या विनंतीवरून सीबीआयने झुंझुनू सायबर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेला गुन्हा आपल्या ताब्यात घेतला. 

7.67 कोटी रुपयांची फसवणूक

या प्रकरणात एका व्यक्तीला पोलीस आणि इतर सरकारी एजन्सीच्या नावाने तीन महिने डिजिटल अरेस्टमध्ये ठेवण्यात आले होते. या कालावधीत 42 वेळा त्यांची एकूण 7.67 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. सीबीआयने तांत्रिक विश्लेषण आणि डेटा प्रोफाइलिंगचा वापर करून या प्रकरणाचा सखोल तपास केला. 

आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी 

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशातील मुरादाबाद आणि संभल, महाराष्ट्रातील मुंबई, राजस्थानमधील जयपूर आणि पश्चिम बंगालमधील कृष्णनगर येथे शोधमोहीम राबवण्यात आली. यावेळी बँकेचे तपशील, डेबिट कार्ड, चेक बुक, डिपॉझिट स्लिप आणि डिजिटल उपकरणांसह अनेक महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले असून चार जणांना जेरबंद केले आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सीबीआय करत आहे. 

डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय? 

डिजिटल अरेस्ट हा एक सायबर फ्रॉडचा नवा प्रकार आहे. यात सायबर भामटे आपल्याला पोलीस, सीबीआय, ईडी, कस्टम किंवा इन्कम टॅक्स वा अमलीपदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी असल्याची बतावणी करीत पीडीत व्यक्तीला कॉल करतात. नंतर त्यांच्यावर किंवा त्यांच्या कुटुंबियांवर अनैतिक कामात सामील असल्याचा आरोप करतात. त्यानंतर फ्रॉड करणारे व्हिडीओ कॉल करण्याची मागणी करतात. साधा कॉल अथवा व्हिडीओ कॉल करून अटक करण्याची भीती दाखवतात. नंतर पीडीत व्यक्तीला खोटी कागदपत्रे दाखवून किंवा खोटे ओळखपत्र दाखवून घाबरवले जाते. त्यांना अटकेची कारवाई टाळण्यासाठी दंड भरण्यासाठी दबाव टाकला जातो.

आणखी वाचा 

नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यात बॅक डेट बोगस नियुक्त्या, पगाराचे पैसे आपापसात वाटून घेतले, झेडपीच्या माजी उपाध्यक्षांचा गौप्यस्फोट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
जमिनीचा वाद बेतला जीवावर! कर्नाटकातील विजापूरमध्ये सहा जणांना संपवलं, परिसरात खळबळ
जमिनीचा वाद बेतला जीवावर! कर्नाटकातील विजापूरमध्ये सहा जणांना संपवलं, परिसरात खळबळ
Pimpri-Pune Liquor Poisoning: योगेशने जास्त फायद्यासाठी दारुत मिथेनॉल मिसळून विकली, तिथेच विष बनलं, आतापर्यंत 13 जणांना गिळलं, पुण्याच्या दारुकांडाची हादरवणारी कहाणी
योगेशने जास्त फायद्यासाठी दारुत मिथेनॉल मिसळून विकली, तिथेच विष बनलं, आतापर्यंत 13 जणांना गिळलं, पुण्याच्या दारुकांडाची हादरवणारी कहाणी

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 : IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Embed widget