एक्स्प्लोर

Raju Shetti : व्यवस्थेतील त्रुटींचा फटका पात्र व्यक्तिंना, मी अर्ज केला नसतानाही खात्यावर पैसे जमा : राजू शेट्टी

व्यवस्थेतील त्रुटीमुळे पात्र व्यक्तिंना फटका बसत असल्याचे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केले. या त्रुटींमुळं जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचे शेट्टी म्हणाले.

Raju Shetti : सरकारी योजनेतील व्यवस्थेत त्रुटी असल्यानं जनतेच्या पैशांचा अपव्यय होत आहे. व्यवस्थेतील त्रुटीमुळे पात्र व्यक्तिंना फटका बसत असल्याचे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केले. मी माजी लोकप्रतिनिधी असल्याने PM किसान योजनेसाठी पात्र होत नाही. मी अर्ज केला नसतानाही माझ्या खात्यावर PM किसान योजनेतून 12 हजार रुपये जमा झाले होते. ते मी तहसीलदारांना माहिती देऊन परत केले. तरीही अजून माझ्या खात्यावर 2 हजार रुपये जमा झाल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. त्यामुळे या त्रुटींचा फटका पात्र व्यक्तिला बसत असल्याचे शेट्टी म्हणाले.

बार्शी तालुक्यातील जवळगांव या ठिकाणी बळीराजा हुंकार यात्रेची जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी राजू शेट्टी बोलत होते. अतिरिक्त ऊसामुळे , काटामारी , उसतोडणी मधील खंडणी, पाण्याची अपुरी व्यवस्था , अवेळी मिळणारी वीज , वेळेवर न मिळणारी एफआरपी यामुळं परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली असल्याचे शेट्टी म्हणाले. यावेळी शेट्टी यांनी सरकारवर देखील जोरगार निशाणा लगावला.

शेतकऱ्यांकडून रुपयाला घेतलेल्या मालाची किंमत अदानीचया गोदामात गेल्यावर पाचपट वाढते. अंबानीच्या मॉलमध्ये गेल्यावर दहापट वाढते. उद्योगपतींना निवडणुकीत केलेल्या मदतीच्या बदली शेतकऱ्यांचा बळी का घेता? असा सवाल देखील शेट्टी यांनी उपस्थित केला. राज्यकर्त्यांनो शेतकरी म्हणजे तुमच्या गोठ्यातील बैल आहे का? राजकीय महत्वकांक्षेपोटी शेतकऱ्यांच्या खांद्यावर वाट्टेल तितका बोजा का टाकता असे सवाल देखील राजू शेट्टी यांनी उपस्थित केले.

शेतकतऱ्यांना न्याय, हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सध्या राज्यभर हुंकार यांत्रा सुरु आहे. 17 एप्रिलपासून या यात्रेची सुरुवात झाली आहे. या यात्रेदरम्यान राजू शेट्टींनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या लावून धरल्या आहेत. यामध्ये शेती पिकाला हमीभाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने त्वरीत कायदा करावा, शेतीला दिवसा दहा तास वीज द्या, एफआरपीच्या पाडलेल्या तुकड्यांचा निर्णय त्वरीत मागे घेऊन एकरकमी एफआरपी द्या, शेतीसाठी चालू असलेलं भारनियमन त्वरीत मागे ग्याव, रासायनिक खतांची दरवाढ त्वरीत कमी करावी आणि भूमी अधिग्रहण कायद्यांची केलेली मोडतोड तातडीन मागे घ्यावी या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची हुंकार यात्रा सुरु आहे. या यात्रेदरम्यान या विविध मागण्या केल्या जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

ना बैल, ना ट्रॅक्टर! शेतकऱ्याने थेट मुलगा आणि भावाच्या खांद्यावरच दिली तिफन, तर पत्नी व भावजयीने धरला कुळव
ना बैल, ना ट्रॅक्टर! शेतकऱ्याने थेट मुलगा आणि भावाच्या खांद्यावरच दिली तिफन, तर पत्नी व भावजयीने धरला कुळव
Chandrashekhar Bawankule: शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! शेतीकामांसाठी गौण खनिजावरील 'रॉयल्टी' पूर्णपणे माफ, अर्ज कसा कराल, A टू Z माहिती
शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! शेतीकामांसाठी गौण खनिजावरील 'रॉयल्टी' पूर्णपणे माफ, अर्ज कसा कराल, A टू Z माहिती
बँकेत चकरा मारुनही पिक कर्ज मिळालं नाही, पेरणीसाठी पैसे नसल्यानं शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, बीडच्या केज तालुक्यात धक्कादायक घटना
बँकेत चकरा मारुनही पिक कर्ज मिळालं नाही, पेरणीसाठी पैसे नसल्यानं शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, बीडच्या केज तालुक्यात धक्कादायक घटना
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Eknath Shinde Health: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
मोठी बातमी: एकनाथ शिंदे अचानक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Embed widget