एक्स्प्लोर

Raju Shetti : व्यवस्थेतील त्रुटींचा फटका पात्र व्यक्तिंना, मी अर्ज केला नसतानाही खात्यावर पैसे जमा : राजू शेट्टी

व्यवस्थेतील त्रुटीमुळे पात्र व्यक्तिंना फटका बसत असल्याचे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केले. या त्रुटींमुळं जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचे शेट्टी म्हणाले.

Raju Shetti : सरकारी योजनेतील व्यवस्थेत त्रुटी असल्यानं जनतेच्या पैशांचा अपव्यय होत आहे. व्यवस्थेतील त्रुटीमुळे पात्र व्यक्तिंना फटका बसत असल्याचे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केले. मी माजी लोकप्रतिनिधी असल्याने PM किसान योजनेसाठी पात्र होत नाही. मी अर्ज केला नसतानाही माझ्या खात्यावर PM किसान योजनेतून 12 हजार रुपये जमा झाले होते. ते मी तहसीलदारांना माहिती देऊन परत केले. तरीही अजून माझ्या खात्यावर 2 हजार रुपये जमा झाल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. त्यामुळे या त्रुटींचा फटका पात्र व्यक्तिला बसत असल्याचे शेट्टी म्हणाले.

बार्शी तालुक्यातील जवळगांव या ठिकाणी बळीराजा हुंकार यात्रेची जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी राजू शेट्टी बोलत होते. अतिरिक्त ऊसामुळे , काटामारी , उसतोडणी मधील खंडणी, पाण्याची अपुरी व्यवस्था , अवेळी मिळणारी वीज , वेळेवर न मिळणारी एफआरपी यामुळं परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली असल्याचे शेट्टी म्हणाले. यावेळी शेट्टी यांनी सरकारवर देखील जोरगार निशाणा लगावला.

शेतकऱ्यांकडून रुपयाला घेतलेल्या मालाची किंमत अदानीचया गोदामात गेल्यावर पाचपट वाढते. अंबानीच्या मॉलमध्ये गेल्यावर दहापट वाढते. उद्योगपतींना निवडणुकीत केलेल्या मदतीच्या बदली शेतकऱ्यांचा बळी का घेता? असा सवाल देखील शेट्टी यांनी उपस्थित केला. राज्यकर्त्यांनो शेतकरी म्हणजे तुमच्या गोठ्यातील बैल आहे का? राजकीय महत्वकांक्षेपोटी शेतकऱ्यांच्या खांद्यावर वाट्टेल तितका बोजा का टाकता असे सवाल देखील राजू शेट्टी यांनी उपस्थित केले.

शेतकतऱ्यांना न्याय, हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सध्या राज्यभर हुंकार यांत्रा सुरु आहे. 17 एप्रिलपासून या यात्रेची सुरुवात झाली आहे. या यात्रेदरम्यान राजू शेट्टींनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या लावून धरल्या आहेत. यामध्ये शेती पिकाला हमीभाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने त्वरीत कायदा करावा, शेतीला दिवसा दहा तास वीज द्या, एफआरपीच्या पाडलेल्या तुकड्यांचा निर्णय त्वरीत मागे घेऊन एकरकमी एफआरपी द्या, शेतीसाठी चालू असलेलं भारनियमन त्वरीत मागे ग्याव, रासायनिक खतांची दरवाढ त्वरीत कमी करावी आणि भूमी अधिग्रहण कायद्यांची केलेली मोडतोड तातडीन मागे घ्यावी या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची हुंकार यात्रा सुरु आहे. या यात्रेदरम्यान या विविध मागण्या केल्या जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पूर्ण बहुमतात असलेल्या सरकारची अर्धवट कर्जमाफी, शेतकऱ्यांची उघड फसवणूक, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची टीका
पूर्ण बहुमतात असलेल्या सरकारची अर्धवट कर्जमाफी, शेतकऱ्यांची उघड फसवणूक, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची टीका
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे, नियमित कर्ज भरणाऱ्यांना किमान दीड लाख रुपये द्यावेत : बच्चू कडू
सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे, नियमित कर्ज भरणाऱ्यांना किमान दीड लाख रुपये द्यावेत : बच्चू कडू
देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget