एक्स्प्लोर

वीज तोडणी म्हणजे अन्न सुरक्षा कायद्याचा भंग, अनिल घनवटांचा निशाणा, आजपासून वीज तोडणीविरोधात राज्यव्यापी आंदोलन

राज्यात विविध ठिकाणी कृषीपंपाचा वीजपुरवटा खंडीत करण्याची मोहीम महावितरणकडून सुरू आहे. याविरोधात राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. तसेच राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी देखील संताप व्यक्त केला आहे.

Farmers association : राज्यातील शेतकरी आधीच वेगवेगळ्या संकटाचा सामना करत आहे. अशातच आता राज्यात विविध ठिकाणी कृषीपंपाचा वीजपुरवटा खंडीत करण्याची मोहीम महावितरणकडून सुरू आहे. याविरोधात राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. तसेच राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी देखील संताप व्यक्त केला आहे. कृषीपंपाच्या वीज तोडणी विरोधात आज शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षातपर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या कार्यलयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन दररोज सकाळी 11 ते 4 यावेळेत करण्यात येणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली आहे.

सध्या राज्यात रब्बी हंगामातील पिके पाण्याला आली आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडे फळबागा देखील आहेत. अशातच वीज कंपनीकडून शेतकऱ्यांचे कनेक्शन कट करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. पाणी असताना शेतकऱ्यांना पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतातील उभी पिकं संकटात सापडली आहे. ती पिके जळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणुका येताच शेतकर्‍यांना मोफत वीज देण्याची घोषणा करणार्‍या सरकारनेच शेतकर्‍यांची विद्युत कनेक्शन कापण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे संतापाची लाट पसरली आहे.

वीज वितरण कंपनीकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग - घनवट

या आंदोलनाबाबत एबीपी माझाने स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, वीज वितरण कंपनीने थकबाकी वसूली करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई बेकायदेशीर आहे. शेती उत्पादन घटवून अन्न सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा कायद्याचा भंग करणारी ही कारवाई असल्याचे घनवट म्हणाले. राज्य सरकार वीज पुरवठ्यासाठी जेवढे अनुदान देत आहे तेवढीसुद्धा शेतकऱ्यांना वीज दिली जात नाही. त्यामुळे शेतकरी वीज कंपनीचे देणेच लागत नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 15 दिवस आधी नोटीस दिल्याशिवाय वीज कनेक्शन कट करता येत नाही. तरीसुद्धा नोटीस न देता वीज कनेक्शन कट करत आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला आहे. वीज कायद्याप्रमाणे शेतीसाठी 230 ते 240 होल्टप्रमाणे वीज पुरवठा सलग करणे बंधनकारक आहे. पण सध्या 150 ते 180 होल्टेजने वीजपुरवठा होत आहे. त्याचबरोबर 2012 पासून शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने खोटी बीले दिली असल्याचा आरोप यावेळी घनवट यांनी केला आहे. त्याचबरोबर 3 ची मोटर असेल 5 च्या मोटरीचे बीव, 5 ची मोटार असेल तर साडेसातच्या मोटारीते बील दिले असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे शेतकरी वीज कंपनीचे काहीही देणे लागत नाही. त्यामुले ही कारवाई थांबवावी यासाठी आजपासून महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यातील वीज वितरण कंपनीसमोर बेमुदत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे. जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर या आंदोलनाची पुढची पायरी आम्ही ठरवू असेही घनवट यावेळी म्हणाले. या आंदोलनामध्ये राज्यातील विविध शेतकरी संघटना, सामाजिक संघटना आणि शेतकऱ्यांना सहभागी होण्याची आवाहन केल्याची माहिती घनवट यांनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या बातम्या:

 

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत, त्यासाठीच शक्तिपीठ महामार्गातून हजारो कोटी गोळा करायचेत, राजू शेट्टींचा हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत, त्यासाठीच शक्तिपीठ महामार्गातून हजारो कोटी गोळा करायचेत, राजू शेट्टींचा हल्लाबोल
Bhagirath Choudhary: केंद्रीय मंत्र्यांनी स्वत:च्याच मंत्रालयाकडून उचलली तब्बल 99 लाखांची सबसिडी, 'त्या' एका फलकामुळे झाली पोलखोल; नेमकं प्रकरण काय?
केंद्रीय मंत्र्यांनी स्वत:च्याच मंत्रालयाकडून उचलली तब्बल 99 लाखांची सबसिडी, 'त्या' एका फलकामुळे झाली पोलखोल; नेमकं प्रकरण काय?
El Nino Impact : चिंताजनक! 'अल निनो'चा फटका, देशभरात पाणीबाणीच सावट; सरासरीपेक्षा 43 टक्के कमी पाऊस, कृषी मंत्री शिवराज सिंह म्हणाले...
चिंताजनक! 'अल निनो'चा फटका, देशभरात पाणीबाणीच सावट; सरासरीपेक्षा 43 टक्के कमी पाऊस, कृषी मंत्री शिवराज सिंह म्हणाले...
चंद्रपूर किडनी तस्करी प्रकरणी पोलिसांना मोठं यश, आरोपी डॉ. रवींद्र पाल सिंगला 10 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात जोरदार युक्तीवाद 
चंद्रपूर किडनी तस्करी प्रकरणी पोलिसांना मोठं यश, आरोपी डॉ. रवींद्र पाल सिंगला 10 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात जोरदार युक्तीवाद 

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? ABP Majha Special Report
Eknath Shinde Speech : शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते संकटात असताना घरात होते, आता वरात काढून फिरतायत
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report
Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुम्हाला हवा असलेला पंतप्रधान होऊ नये म्हणून ही छाटाछाटी सुरुय, संघाला मान्य आहे का? उद्धव ठाकरेंचा सवाल, म्हणाले, 'फडणवीसांना मराठी येत नसेल, तर...'
तुम्हाला हवा असलेला पंतप्रधान होऊ नये म्हणून ही छाटाछाटी सुरुय, संघाला मान्य आहे का? उद्धव ठाकरेंचा सवाल, म्हणाले, 'फडणवीसांना मराठी येत नसेल, तर...'
Uddhav Thackeray:शाह सेनेच्या गद्दाराला सुपारी दिलीय, फडणवीसांना इथं गुंतवून ठेवा; हा खाऊसाहेब वाकचौरे जाऊ तिथं खाऊ, याच्या नसानसात गद्दारी, सापडला तर सोडू नका; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दाराला सुपारी दिलीय, फडणवीसांना इथं गुंतवून ठेवा; हा खाऊसाहेब वाकचौरे जाऊ तिथं खाऊ, याच्या नसानसात गद्दारी, सापडला तर सोडू नका; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Nasrapur Case Final Result :
"तोंडात 21 सेमी पॅंन्ट कोंबली, 18 जखमा केल्या"; न्यायाधीशांनी नसरापूर केसमधील निकाल वाचनावेळी आरोपीच्या क्रूरतेचा पाढा वाचत मांडले महत्त्वाचे मुद्दे
मोठी बातमी : अमित शाहांकडून एकनाथ शिंदेंना सुपारी, मात्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर, उद्धव ठाकरेंची साईचरणी प्रार्थना
मोठी बातमी : अमित शाहांकडून एकनाथ शिंदेंना सुपारी, मात्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर, उद्धव ठाकरेंची साईचरणी प्रार्थना
Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचारातील नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, ना मे महिन्याची सुट्टी घेतली, ना सुनावणीत खंड, पुणे कोर्टाचा देशाला अभिमान, पोलिसांसह तपास यंत्रणांचं भर कोर्टात कौतुक!
नसरापूर अत्याचारातील नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, ना मे महिन्याची सुट्टी घेतली, ना सुनावणीत खंड, पुणे कोर्टाचा देशाला अभिमान, पोलिसांसह तपास यंत्रणांचं भर कोर्टात कौतुक!
Pune Nasrapur Case Result: भीमराव कांबळे आता फासावर चढा, न्यायाधीशांनी ठणकावलं; नसरापूर प्रकरणी मोठा निर्णय, कोर्टात काय काय घडलं?
भीमराव कांबळे आता फासावर चढा, न्यायाधीशांनी ठणकावलं; नसरापूर प्रकरणी मोठा निर्णय, कोर्टात काय काय घडलं?
विरहाच्या धगीवर “आभाळाचा अभिषेक”...
विरहाच्या धगीवर “आभाळाचा अभिषेक”...
Pandharpur News: रात्रभर पाऊस, पहाटे मोटार सुरू करायला गेले अन् घात झाला; विजेचा शॉक लागून शेतकरी पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू, पंढरपूरमधील हृदयद्रावक घटना
रात्रभर पाऊस, पहाटे मोटार सुरू करायला गेले अन् घात झाला; विजेचा शॉक लागून शेतकरी पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू, पंढरपूरमधील हृदयद्रावक घटना
Embed widget