एक्स्प्लोर

टीम इंडियाच्या पूर्वतयारीच्या अभावाने केपटाऊनमध्ये दाणादाण?

दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा दुसरा डाव 135 धावांत गुंडाळून, 72 धावांनी दणदणीत विजय साजरा केला.

केपटाऊन : विराट कोहलीच्या टीम इंडियाला केपटाऊन कसोटीत अखेर लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा दुसरा डाव 135 धावांत गुंडाळून, 72 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. विराट कोहलीच्या लग्नाचा सनई चौघडा इटलीत वाजला, मग दिल्ली आणि मुंबईतल्या रिसेप्शनमध्ये बँडबाजा घुमला आणि भारतीय फलंदाजांची बारात निघाली ती केपटाऊनमध्ये... विजयासाठीचं लक्ष्य केवळ 208 धावांचं होतं. त्यात दक्षिण आफ्रिकेची डेल स्टेन ही मुलुखमैदान तोफही निकामी झाली होती. पण टीम इंडियाची दुसऱ्या डावात दाणादाण उडवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला तीनच वेगवान अस्त्र पुरेशी ठरली. त्यांनी विराटसेनेचा दुसरा डाव अवघ्या 135 धावांत गुंडाळून, टीम इंडियावर 72 धावांनी लाजिरवाणा पराभव लादला. बीसीसीआय आणि टीम इंडियाची पूर्वतयारी अंगलट? तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसाने वाया जाऊनही चौथ्या दिवशीच झालेला हा पराभव इतका बोचरा आहे की, दक्षिण आफ्रिकेचीही दोन्ही डावांत दाणादाण उडाली, असं म्हणून टीम इंडियाची अब्रू झाकता येणार नाही. पण भारतीय फलंदाजांनी केपटाऊनवर एकदा नाही, तर दोनदा घातलेल्या लोटांगणापेक्षाही या पराभवाचं कारण बीसीसीआय आणि टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या दृष्टीने केलेल्या शून्य पूर्वतयारीत दडलं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर निघण्याआधी, खरं तर तिथल्या वेगवान आणि बाऊन्सी खेळपट्ट्यांवर धावांची रास कशी उभी करता येईल, या दृष्टीने भारतीय संघाने पूर्वतयारी करणं अपेक्षित होतं. त्यासाठी बीसीसीआयने भारतात किंवा दक्षिण आफ्रिकेत शिबिराची आखणी करायली हवी होती. भारतीय संघाने कसोटी मालिकेआधी दक्षिण आफ्रिकेत सराव सामने खेळणं आवश्यक होतं. पण कर्णधार विराट कोहली लग्न, हनिमून आणि रिसेप्शनमध्ये अडकला आणि बाकीची टीम इंडिया दुबळ्या श्रीलंकेविरुद्धच्या लुटूपुटूच्या वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये व्यस्त राहिली. पण टेलिव्हिजन ब्रॉडकास्टरच्या फायद्यासाठी श्रीलंकेशी खेळून दक्षिण आफ्रिका दौऱ्याची तयारी होणार तरी कशी? असा प्रश्न उरतो. विराट कोहलीची टीम इंडिया सलग नऊ कसोटी मालिका जिंकून दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली होती. पण टीम इंडियाने त्या 9 पैकी सहा कसोटी मालिका मायदेशात, दोन श्रीलंकेत, तर एक वेस्ट इंडिजमध्ये जिंकली होती. भारतात, श्रीलंकेत किंवा विंडीजमध्ये कसोटी मालिका जिंकणं वेगळं आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणं यात फरक आहे, याची बीसीसीआय आणि भारतीय संघव्यवस्थापनाला कल्पना यायला हवी होती. भारतीय संघाला गेल्या 25 वर्षांत दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. भारताने दक्षिण आफ्रिकेत 6 पैकी पाच कसोटी मालिकांमध्ये हार स्वीकारली आहे, तर केवळ एकमेव कसोटी मालिका अनिर्णित राखण्यात भारताला यश आलं आहे. या 6 कसोटी मालिकांच्या कालावधीत भारतीय संघ दक्षिण आफ्रिकी भूमीवर 17 कसोटी सामन्यांध्ये खेळला. त्यापैकी केवळ दोन कसोटी सामने भारताला जिंकता आले आहेत. हा सारा इतिहास समोर असतानाही, कोणतीही पूर्वतयारी न करता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणं म्हणजे आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखं होतं. केपटाऊनमध्ये तेच घडलं. आता टीम इंडिया सेन्चुरियन आणि जोहान्सबर्गची कसोटी वाचवणार का, हाच प्रश्न आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video : रजत पाटीदारने बोट दाखवलं; कार्तिक अन् कोचने अंपायरला घेरलं, RCB vs CSK च्या सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा, नेमकं काय घडलं?
रजत पाटीदारने बोट दाखवलं; कार्तिक अन् कोचने अंपायरला घेरलं, RCB vs CSK च्या सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा, नेमकं काय घडलं?
Mohammed Shami: 'मी काही मशीन नाही...' धडाकेबाज कामगिरीनंतर मोहम्मद शमीचा टीकाकारांवर हल्लाबोल, भविष्यातील प्लॅनही सांगितला
'मी काही मशीन नाही...' धडाकेबाज कामगिरीनंतर मोहम्मद शमीचा टीकाकारांवर हल्लाबोल, भविष्यातील प्लॅनही सांगितला
RCB vs CSK IPL 2026 : आरसीबीचा पॉईंट्स टेबलवर कब्जा! थालाविना चेन्नई अनाथ, सलग 3 पराभवांचा कलंक, ऋतुराजनं सांगितलं काय चुकलं?
आरसीबीचा पॉईंट्स टेबलवर कब्जा! थालाविना चेन्नई अनाथ, सलग 3 पराभवांचा कलंक, ऋतुराजनं सांगितलं काय चुकलं?
RCB vs CSK IPL 2026 Update : RCBचा नादच खुळा! 43 धावांनी विजयी, चेन्नई 207 धावांवर ऑलआऊट; टिम डेव्हिडनंतर भुवनेश्वरचा कहर
RCB vs CSK Update : RCBचा नादच खुळा! 43 धावांनी विजयी, चेन्नई 207 धावांवर ऑलआऊट; टिम डेव्हिडनंतर भुवनेश्वरचा कहर

व्हिडीओ

Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा
Sunetra Pawar Speech Baramati : दादांना श्रद्धांजली वाहण्याची बारामतीकरांना संधी,सुनेत्रा पवार भावूक
Dhananjay Munde Speech Baramati : दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचे नुकसान, वहिनीसाहेब विनविरोध येतील
Sunetra Pawar Baramati Election : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Today: ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा, सोने-चांदीच्या दरात मोठे चढउतार, एक तोळा सोन्याचा भाव किती?
ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा, सोने-चांदीच्या दरात मोठे चढउतार, एक तोळा सोन्याचा भाव किती?
शरद पवार व्हीलचेअरवर, ज्योती वाघमारे सावित्रीमाईंच्या पेहरावात; राज्यसभेत 19 नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ
शरद पवार व्हीलचेअरवर, ज्योती वाघमारे सावित्रीमाईंच्या पेहरावात; राज्यसभेत 19 नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ
Baramati Byelection : काँग्रेसला महाराष्ट्रात काय त्रास होईल, हे त्यांना दिसेल; बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा थेट इशारा
काँग्रेसला महाराष्ट्रात काय त्रास होईल, हे त्यांना दिसेल; बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा थेट इशारा
Mumbai Goregaon Crime: मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
राहुरीत शिंदेंच्या शिवसेनेतून बंडखोरी, युवा नेत्यानं भरला उमेदवारी अर्ज; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून कोण?
राहुरीत शिंदेंच्या शिवसेनेतून बंडखोरी, युवा नेत्यानं भरला उमेदवारी अर्ज; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून कोण?
Ashok Kharat and Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
Rahuri byelection: राष्ट्रवादीने मुंबईतून राहुरीत दोन एबी फॉर्म धाडले, प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतल्यास प्लॅन बी तयार? फडणवीसांच्या एका फोनने गणित बदललं
राष्ट्रवादीने मुंबईतून राहुरीत दोन एबी फॉर्म धाडले, प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतल्यास प्लॅन बी तयार? फडणवीसांच्या एका फोनने गणित बदललं
Rahul Gandhi on PM Modi: मोदींनी गॅसचे संकट कोरोनासारखं हाताळण्याचे वचन दिलं आणि त्यांनी तेच करून दाखवलं, प्रत्येक संकटात सर्वात आधी गरीबच का मरतात? राहुल गांधींचा प्रहार
मोदींनी गॅसचे संकट कोरोनासारखं हाताळण्याचे वचन दिलं आणि त्यांनी तेच करून दाखवलं, प्रत्येक संकटात सर्वात आधी गरीबच का मरतात? राहुल गांधींचा प्रहार
Embed widget