एक्स्प्लोर

IPL 2024 Virat Kohli: 'संघाला तुमच्याकडून ही अपेक्षा नाही...'; कोहलीने अर्धशतक झळकावले, तरीही सुनील गावसकर संतापले!

IPL 2024 RCB vs SRH Virat Kohli: हैदराबादविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 37 चेंडूत अर्धशतक झळकावले. या काळात त्याने 4 चौकार आणि एक षटकार मारला.

IPL 2024 RCB vs SRH: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने IPL 2024 मध्ये  सनरायझर्स हैदराबादचा 35 धावांनी पराभव करून दुसरा विजय नोंदवला. विराट कोहली (Virat Kohli) आणि रजत पाटीदार यांच्या अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीमुळे आरसीबीने हैदराबादचा त्यांच्याच घरात पराभव केला. या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतक केले. पण त्याचा स्ट्राईक रेट 120 पेक्षा कमी होता. विराट कोहलीच्या या संथ खेळीमुळे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले.

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सुनील गावसकर म्हणाले, मधल्या षटकांमध्ये विराट कोहलीने आपली लय गमावल्याचे दिसत होते. 31-32 धावांवर असताना सुमारास तो आऊट होईल असे वाटत होते. त्याने एकही चौकार मारला नाही. तुम्ही डावाच्या पहिल्या चेंडूपासून स्ट्राइक घेता आणि 14-15 षटकांत बाद झालात आणि तुमचा स्ट्राइक रेट 118 आहे. संघाला तुमच्याकडून ही अपेक्षा नाही, असं सुनील गावसकर यांनी सांगितले. एकेरी, एकेरी आणि एकेरी धावा कोहलीकडून घेतल्या जात होत्या. फलंदाजीला मागे दिनेश कार्तिक होता. महिपाल लोमरोर होता. विराट कोहलीने जोखीम पत्करायला हवी होती, असं सुनील गावसकर म्हणाले.

कोहलीने योग्य स्ट्राईक रेटने फलंदाजी केली असती तर...

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू सायमन कॅटिचनेही यावर भाष्य केलं. सायमन म्हणाला की, “मला वाटते रजत पाटीदारने चांगली फलंदाजी केली.  तो चौकार-षटकार मारण्याचा प्रयत्न करत होते. विराट कोहलीनेही हे करायला हवे. जर त्याने योग्य स्ट्राईक रेटने फलंदाजी केली असती तर आरसीबीची धावसंख्या 206 ऐवजी 220 झाली असती.

कोहलीचे 37 चेंडूत अर्धशतक-

या सामन्यात विराट कोहलीने 37 चेंडूत अर्धशतक झळकावले. या काळात त्याने 4 चौकार आणि एक षटकार मारला. कोहलीने रजत पाटीदारसह तिसऱ्या विकेटसाठी 65 धावा जोडल्या, तर फाफ डू प्लेसिससोबत पहिल्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. विराट कोहलीचे या मोसमातील हे चौथे अर्धशतक आहे. याआधी त्याने पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध 50 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.

विराट कोहलीनं 10 हंगामात 400 पेक्षा जास्त धावा केल्या - 

आयपीएल 2008 पासून विराट कोहली आरसीबीसाठी खेळत आहे. विराट कोलीने 2011 मध्ये पहिल्यांदा 400 धावांचा पल्ला गाठला होता. त्यानं 16 सामन्यात 557 धावांचा पाऊस पाडला होता.  त्यानंतर 2012, 2014, 2017 आणि 2022 या चार हंगामात विराट कोहलीला 400 धावांचा पल्ला पार करता आला नाही. म्हणजेच, 2008,2009,2010, 2012, 2014, 2017 आणि 2022 या सात हंगामात विराट कोहलीला 400 धावांचा पल्ला पार करता आला नाही. तर विराट कोहलीने 10 हंगामात 400 धावांचा टप्पा पार केला आहे. 

संबंधित बातम्या:

10 व्या स्थानावरुन प्ले ऑफच्या फेरीपर्यंत; आरसीबीचा पुढील मार्ग कसा असेल?, जाणून घ्या समीकरण!

Kavya Maran: हैदराबादची वाईट अवस्था पाहून काहीतरी बडबडली; काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video

हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Embed widget