एक्स्प्लोर

Asia Cup: पाकिस्तानी चाहत्यांचा पाठिंबा कोणाला?

आशियातील अन्य देशांचा पाठिंबा कोणाला, याचीही उत्सुका आहे. एबीपी माझाने पाकिस्तानी चाहत्यांना हाच प्रश्न विचारला.

दुबई: आशिया चषकाच्या फायनलमध्ये आज भारत विरुद्ध बांगलादेश सामना रंगणार आहे. रोहित शर्माची टीम इंडिया की मशरफी मुर्तझाचा बांगलादेश, आशियाचा किंग कोण हे आज ठरणार आहे. या संपूर्ण मालिकेत भारताने धडाकेबाज कामगिरी केली आहे. एकही सामना न गमावणाऱ्या भारताने सहज फायनलमध्ये धडक मारली आहे. तर दुसरीकडे बांगलादेशने सुपर फोरच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करुन, फायनलमध्ये एण्ट्री केली. दोन्ही देशाचे चाहते आजच्या सामन्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. मात्र आशियातील अन्य देशांचा पाठिंबा कोणाला, याचीही उत्सुका आहे. एबीपी माझाने पाकिस्तानी चाहत्यांना हाच प्रश्न विचारला. सफाकत, तैमूर आणि सलमान हे तिघेही पाकिस्तानी क्रिकेटर आहेत. ते तिघेही आज आशिया चषकात भारताला पाठिंबा देणार आहेत.  हे तिघे दुबईतील अॅमॅच्युअर लीगमध्ये रोअरिंग लायन्स या संघाकडून खेळत आहेत. रोअरिंग लायन्स या संघात 8 भारतीय आणि 3 पाकिस्तानी खेळाडू आहेत. वर्षभर ते भारतीय संघसहकाऱ्यांसोबत ते या स्पर्धेत खेळतात.  त्यामुळे आशिया चषकाच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा संघ न पोहोचल्याने ते आता भारताच्या बाजूने उभे राहिले आहेत. Asia Cup: पाकिस्तानी चाहत्यांचा पाठिंबा कोणाला? आज महामुकाबला भारतीय गोलंदाजांनी आणि भारतीय फलंदाजांनीही सुपर फोरच्या सामन्यात बांगलादेशवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं. पण त्या पार्श्वभूमीवर फायनलच्या लढाईत बांगलादेशचं आव्हान कमी लेखता येणार नाही. कारण त्याच बांगलादेशने तमिम इक्बाल आणि शकिब अल हसनसारख्या बिनीच्या शिलेदारांच्या अनुपस्थितीत सुपर फोरच्या मैदानात बलाढ्य पाकिस्तानला लोळवलं. पाकिस्तानवरच्या या विजयाने बांगलादेशला नक्कीच नवा जोश आणि नवा आत्मविश्वास दिला असेल. बांगलादेशच्या खेळाडूंमधला आणि त्यांच्या पाठीराख्यांमधला उत्साह ही त्यांची मोठी ताकद आहे. टीम इंडियाला ऑन द फिल्ड आणि ऑफ द फिल्डही त्या उत्साहाचा बोचरा अनुभव आला आहे. बांगलादेशने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बड्या बड्या संघांची हवा काढून घेणारा संघ म्हणून ख्याती मिळवली आहे. टीम इंडियाने बांगलादेशकडून ढाक्यात चारवेळा आणि 2007 सालच्या विश्वचषकात एकदा पराभवाची कटू चव चाखली आहे. त्यामुळे फायनलची लढाई जिंकायची तर बांगलादेशला कमी लेखण्याचा धोका टीम इंडिया पत्करणार नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवनने सलामीला दाखवलेलं सातत्य ही आशिया चषकात टीम इंडियाची सर्वात जमेची बाजू आहे. रोहितने चार सामन्यांमध्ये 269, तर धवनने चार सामन्यांमध्ये 327 धावांचा रतीब घातला. त्या दोघांनी अखेरच्या सुपर फोर सामन्यातून विश्रांती घेतली आणि अफगाणिस्तानने तो सामना टाय करण्याचा पराक्रम गाजवला. त्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी आणि दिनेश कार्तिक यांना पायचीत देण्याचा निर्णय चुकीचा होता असं मान्य केलं तरी धोनीला घडणारा धावांचा उपवास टीम इंडियाला परवडणारा नाही. दुबईतल्या संथ खेळपट्ट्यांवर जिथे छोट्या लक्ष्यांचा पाठलाग करणंही कठीण ठरतंय, तिथे धोनीची बॅट तळपण्याची प्रतीक्षा आता त्याच्या कट्टर चाहत्यांनाही सहन होत नाही. भारताच्या भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराचं वेगवान, तर कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, रवींद्र जाडेजा आणि केदार जाधवचं फिरकी आक्रमण आशिया चषकात जबरदस्त फॉर्मात आहे. त्यांना फायनलमध्येही आपल्या लौकिकाला जागावं लागेल. इंग्लंडच्या कसोटी मालिकेतल्या लाजिरवाण्या पराभवाची खरं तर भरपाई होऊ शकत नाही. पण त्या पराभवाच्या ओल्या जखमेवर आशिया चषक किमान फुंकर घालू शकतो. अफगाणिस्तानविरुद्धच्या टाय सामन्यानेही टीम इंडियाला आणि तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्या हुकलेल्या विजयाने छोट्या सरदाराचं रडू थांबता थांबत नव्हतं. त्यामुळे टीम इंडियाचं नाणं पुन्हा खणखणीत वाजवून दाखवायचं आणि भारतीय मनाला नवी उभारी द्यायची तर रोहित शर्मा आणि त्याच्या शिलेदांना आशिया चषक जिंकावाच लागेल. भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उप कर्णधार), लोकेश राहुल, अंबाती रायडू, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक, दीपक चहर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, सिद्धार्थ कौल आणि खलील अहमद. संबंधित बातम्या बांगलादेशला धूळ चारुन भारताला आशिया चषक जिंकण्याची संधी  
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
अक्षर पटेलने ते दोन अफलातून कॅच कसे पकडले? मनात नेमकं काय चाललं होतं? 'बापू'चा व्हिडीओ व्हायरल
अक्षर पटेलने ते दोन अफलातून कॅच कसे पकडले? मनात नेमकं काय चाललं होतं? 'बापू'चा व्हिडीओ व्हायरल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Ind vs Nz T20 World Cup 2026 Final Ticket : भारत-न्यूझीलंड महामुकाबला! नरेंद्र मोदी स्टेडियमचं 3,000 ते 75,000 तिकीट दर, ऑनलाइन बुकिंग कशी करायची?, A टू Z माहिती
भारत-न्यूझीलंड महामुकाबला! नरेंद्र मोदी स्टेडियमचं 3,000 ते 75,000 तिकीट दर, ऑनलाइन बुकिंग कशी करायची?, A टू Z माहिती

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget