एक्स्प्लोर

भाजपनं महाराष्ट्र आणि राजभवनाचा काळाबाजार केला : खासदार संजय राऊत

राष्ट्रवादीच्या पाच आमदारांच्या बदल्यात अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद दिलं असल्याचं देखील ते म्हणाले. अजित पवार काही मोठे नेते नाहीत. अजित पवारांना फोडणे हा भाजपचा शेवटचा डाव होता मात्र तो डाव फसला आहे. अजित पवारांना घेऊन सत्ता बनविण्याच्या भ्रमातून भाजपनं बाहेर यावं,

मुंबई : खोट्या कागदपत्रांच्या आधारे राज्यपालांनी सरकार बनवायला दिलं असून भाजपनं महाराष्ट्र आणि राजभवनाचा काळाबाजार केला असल्याची टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप आणि अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. आम्हाला सत्ता स्थापनेसाठी 24 तासाचा वेळ दिला जातो. मात्र भाजपला बहुमत सिद्ध करायला 30 तारखेपर्यंत वेळ दिला. बहुमत आहे तर एवढा वेळ कशासाठी घेत आहेत. फोडाफोड करण्यासाठीच 30 तारखेपर्यंत मुदत दिली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. भाजपला व्यापारी समजत होतो पण त्यांचा व्यापार चुकला. भाजपनं सचोटीनं व्यापार करायला हवा होता असेही संजय राऊत म्हणाले. व्यापार प्रामाणिकपणे केला असता तर भाजपला अशी 'दर-दर की ठोकरे' खाण्याची वेळ आली नसती. भाजपनं राष्ट्रपती भवन आणि राजभवनात काळाबाजार केला. या देशात खालच्या स्तरावर राजकारण केलं जात आहे, याचं उदाहरण काल पाहायला मिळालं. बहुमत होतं तर चोरुन शपथविधी का केला?, असेही राऊत म्हणाले. तीन पक्षाच्या महाविकासआघाडीला 165 आमदारांचं बहुमत असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादीच्या पाच आमदारांच्या बदल्यात अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद दिलं असल्याचं देखील ते म्हणाले. अजित पवार काही मोठे नेते नाहीत. अजित पवारांना फोडणे हा भाजपचा शेवटचा डाव होता मात्र तो डाव फसला आहे. अजित पवारांना घेऊन सत्ता बनविण्याच्या भ्रमातून भाजपनं बाहेर यावं, असेही राऊत यावेळी म्हणाले. आम्ही घाबरणारे नाहीत. हा त्यांचा शेवटचा खेळ आहे. आता त्यांचा खेळ संपला, असे राऊत म्हणाले. शरद पवार यांना महाराष्ट्र मानतो. अजित पवारांनी मोठी चूक केली. त्यांचा पक्ष फोडणे हे नैतिक नाही. असं करुन भाजपला काहीही फायदा होणार नाही. सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स, पोलीस हे चार त्यांचे प्रमुख कार्यकर्ते आहेत. हे चार खेळाडू आणि राष्ट्रपती आणि राजभवन तर राखीव खेळाडू आहेत. या चौघाच्या जीवावर त्यांना जेवढा हैदोस घालायचा आहे तेवढा घालू द्या. या राज्याची जनता त्यांना भीक घालणार नाही. राज्यपाल आम्हाला एक न्याय देतात आणि भाजपला वेगळा न्याय देतात, असा आरोप देखील त्यांनी केला. आमच्या आमदारांना आता 10 मिनिटात जरी बहुमतासाठी बोलावलं तरी आम्ही बहुमत सिद्ध करु शकतो, असेही ते म्हणाले. कालचा दिवस हा काळा दिवस होता. यापुढे इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीच्या दिवसाला काळा दिवस म्हणण्याचा भाजपला अधिकार नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Budh Gochar 2026 : 7 जुलैपासून सुरु होणार 4 राशींचा सुवर्णकाळ; बुध ग्रहाच्या संक्रमणाने नशिबाला लागतील चार चॉंद, हातात येणार पैसाच पैसा
7 जुलैपासून सुरु होणार 4 राशींचा सुवर्णकाळ; बुध ग्रहाच्या संक्रमणाने नशिबाला लागतील चार चॉंद, हातात येणार पैसाच पैसा
Weekly Horoscope: धनु, मकर राशीचे मेहनतीचे फळ मिळण्याची हीच वेळ, जुलैचा नवा आठवडा कसा असेल? कोण नशीबवान? साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशीचे मेहनतीचे फळ मिळण्याची हीच वेळ, जुलैचा नवा आठवडा कसा असेल? कोण नशीबवान? साप्ताहिक राशीभविष्य
Sanjay Raut on Ameet Satam: मुलाच्या मृत्यूवर अमित साटम फिदीफिदी हसल्याचा आरोप, संजय राऊत संतापून म्हणाले, 'तुमच्या अंत्ययात्रेला लोकं भाड्याने बोलवावी लागतील'
मुलाच्या मृत्यूवर अमित साटम फिदीफिदी हसल्याचा आरोप, संजय राऊत संतापून म्हणाले, 'तुमच्या अंत्ययात्रेला लोकं भाड्याने बोलवावी लागतील'
Eknath Shinde and Bacchu Kadu: एकनाथ शिंदे दगदगीमुळे रुग्णालयात, बच्चू कडू म्हणाले,'रात्री दोनपर्यंत लोकांना भेटता, पण आता सवय बदलायला पाहिजे'
एकनाथ शिंदे दगदगीमुळे रुग्णालयात, बच्चू कडू म्हणाले,'रात्री दोनपर्यंत लोकांना भेटता, पण आता सवय बदलायला पाहिजे'

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Jalna Bus Accident News : भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
Raigad Rain Rice Farming: चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो सावधान! पावसाचा जोर आणखी वाढणार; यलो मेट्रो बंद पडली, विरारमध्ये धडकी भरवणारी दृश्यं
मुंबईकरांनो सावधान! पावसाचा जोर आणखी वाढणार; यलो मेट्रो बंद पडली, विरारमध्ये धडकी भरवणारी दृश्यं
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Eknath Shinde Health: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
मोठी बातमी: एकनाथ शिंदे अचानक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु
Embed widget