एक्स्प्लोर

सूर्यग्रहणासारखं देशाला ग्रहण लागलंय : प्रकाश आंबेडकर

एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, भीमा कोरेगाव प्रकरणी नुसती पोलिसांची चौकशी नाही तर त्या पोलिसांना ज्या पॉलिटिकल बॉसेसने सूचना दिल्या. भिडे आणि एकबोटे यांना मोक्का लागणार होता, तो लावू नये म्हणून कोण पॉलिटिकल बॉसेस प्रयत्नशील होते तेही समोर आले पाहिजे, असेही आंबेडकर म्हणाले.

मुंबई : देशाची आर्थिक स्थिती खराब आहे आणि त्यात सीएए आणि एनआरसीसारख्या गोष्टी घडत आहेत. सूर्यग्रहणासारखे देशाला ग्रहण लागले आहे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवही (NRC) विरोधात वंचित बहुजन आघाडीने दादरमध्ये गुरुवारी धरणे आंदोलन केलं. यावेळी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलकांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान आणि अमित शाह खोटं बोलत आहेत. आधी संसदेत त्यांनी एनआरसीबद्दल बोललं गेलं होतं. आरएसएसचा हा अजेंडा आहे, हे खोटं बोलतात. याआधी जनगणना झाली आहे. आता कशी करत आहे. आमच्या मोर्चात भटके विमुक्त देखील सहभागी होतील, आम्हाला जाणीव आहे, त्यांच्याकडे कागदपत्र नसतात. भाजपला आता जाणीव होते की रस्त्यावर फक्त मुस्लिम उतरत नाही. तर इतरही घटक उतरत आहे, आर्थिक स्थिती वरून लक्ष हटवण्यासाठी हे सर्व सुरू आहे, असे ते म्हणाले. या आंदोलनाच्या आधी एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, भीमा कोरेगाव प्रकरणी नुसती पोलिसांची चौकशी नाही तर त्या पोलिसांना ज्या पॉलिटिकल बॉसेसने सूचना दिल्या. भिडे आणि एकबोटे यांना मोक्का लागणार होता, तो लावू नये म्हणून कोण पॉलिटिकल बॉसेस प्रयत्नशील होते तेही समोर आले पाहिजे, असेही आंबेडकर म्हणाले. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलकांना संबोधित करताना म्हटलं की, भाजपाकडून देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकारने आणलेली डिटेन्शन कॅम्पची जी पद्धत आहे, ती ब्रिटिशांनी आणलेली पद्धत आहे. त्यावेळी त्यांनी जो गुन्हेगारी जमात कायदा केला यामध्ये ज्या जमातींना गुन्हेगार ठरवलं गेलं, त्या जमातींना डिटेन्शन कॅम्पमध्ये ठेवण्यातं आलं होतं. या देशात ज्यांना शिक्षणाची दारं व्यवस्थेनं बंद केली होती, त्यांच्याकडे जमिनी नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या अलीकडच्या पिढीकडे कुठलीही कागदपत्रे नाहीत. एनआरसी या लोकांविरोधात असणार आहे. जर तुम्हाला या डिटेन्शन कॅम्पमध्ये जायचं नसेल तर हे सरकार पाडा, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केलं. हेही वाचा-  'वंचित'ला भाजपची बी टीम म्हणणारे आता काँग्रेस-राष्ट्रवादीला शिवसेनेची बी टीम म्हणणार का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत हातमिळवणी केली आहे. मग आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेची बी टीम आहे, असं का बोलत नाही, असा प्रश्न बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी काल विचारला होता. प्रकाश आंबेडकर एबीपी माझाच्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत बोलत होते.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 5 March 2026: आज गुरूवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दत्तगुरूंच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, आजचे राशीभविष्य वाचा...
आज गुरूवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दत्तगुरूंच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, आजचे राशीभविष्य वाचा...
Iran Israel War : चीन सोडून एकही जहाज हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ देणार नाही, इराणचा जगाला इशारा, डोनाल्ड ट्रम्प भडकले
चीन सोडून एकही जहाज हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ देणार नाही, इराणचा जगाला इशारा, डोनाल्ड ट्रम्प भडकले
धक्कादायक! पालघरमध्ये मध्यरात्री धावत्या ट्रकला भीषण आग, चालकाचा जळून मृत्यू तर वाहक गंभीर जखमी 
धक्कादायक! पालघरमध्ये मध्यरात्री धावत्या ट्रकला भीषण आग, चालकाचा जळून मृत्यू तर वाहक गंभीर जखमी 
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget