एक्स्प्लोर

राज ठाकरेंनी महायुतीला पाठींबा देण्याचे आदेश नाही दिले, मग आम्हाला वाटतं त्याला मत देऊ : संदीप देशपांडे

MNS Sandip Deshpande: राज ठाकरे यांनी पाठिंबा देण्यासंदर्भात कुठलाही आदेश दिलेला नाही. त्यामुळे आम्ही आमच्या म्हणण्यांनुसार, आम्हाला वाटतं तसं मतदान करू, असंही संदीप देशपांडे म्हणाले आहेत. 

Sandip Deshpande on Vidhan Parishad Election: मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत (Legislative Council Elections 2024) महायुतीला (Mahayuti) पाठिंबा देण्याचा कुठलाही आदेश राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिलेला नाही, असं वक्तव्य मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी केलं आहे. संदीप देशपांडे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) चर्चा सुरू झाल्या असून अनेकांच्या भुवया उंतावल्या आहेत. आज विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर संदीप देशपांडे यांनी एबीपी माझाशी बातचित केली. त्यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. 

मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विविध मतदान केंद्रावर सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. माहीममधील लॉस एंजलिस शाळेत संदीप देशपांडे यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बोलताना मुंबईचा महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात सुशिक्षित लोकांचे अनेक प्रश्न आहेत. या निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचा कुठलाही आदेश राज ठाकरे यांनी दिलेला नाही. त्यामुळे प्रत्येकजण आपल्याला जे वाटेल, त्याला मतदान करू शकतं, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी पाठिंबा देण्यासंदर्भात कुठलाही आदेश दिलेला नाही. त्यामुळे आम्ही आमच्या म्हणण्यांनुसार, आम्हाला वाटतं तसं मतदान करू, असंही संदीप देशपांडे म्हणाले आहेत. 

भाजपच्या मनधरणीनंतर मनसेची विधान परिषद निवडणुकीतून माघार 

विधान परिषदेची रणधुमाळी सुरू झाल्यापासूनच मनसे आणि भाजप यांच्यात विधान परिषद निवडणुकीवरुन राजकीय नाट्याचा एक अंक रंगल्याचं पाहायला मिळालेलं. मनसेनं अचानक कोकण पदवीधरमधून आपल्या उमेदवाराची घोषणा केली. पक्षाच्या वतीनं अधिकृत पत्रक जारी करुन अभिजीत पानसेंना कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पण, त्यानंतर मनसेच्या या खेळीनं भाजपची गोची झाल्याच्या चर्चांनी जोर धरला. त्याला कारणंही तसंच होतं. कोकण पदवीधर मतदारसंघ म्हणजे, भाजपचा पारंपारिक मतदारसंघ. त्या ठिकाणी राज ठाकरेंनी उमेदवार दिल्यानं मनसे आणि भाजप यांच्यात काहीतरी बिनसल्याचंही बोललं जाऊ लागलं. या चर्चांना पार्श्वभूमी म्हणजे, लोकसभेच मनसेनं महायुतीला दिलेला बिनशर्त पाठींबा. पण काही काळानंतर भाजपकडून मनसेची मनधरणी करण्यात आली. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या फोनवरील संभाषणानंतर मनसेनं विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेतली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Mudda EP 7 : पायाला 56 लोक, खोक्या, दिशा, औरंगजेब, अधिवेशनातून महाराष्ट्राला काय काय मिळालं?Job Majha : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. येथे विविध पदांसाठी भरती : 26 March 2025Chhatrapati Sambhajiraje On Waghya Dog | वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत नोंद नाही, संभाजीराजेंचा दावाABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 26 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
IPL 2025 : रिषभ अन् गोयंकांच्या चर्चेमुळं राहुलची आठवण,आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का? BCCI चे नियम नेमके काय सांगतात?
रिषभ पंत अन् संजीव गोयंकांच्या चर्चेमुळं केएल राहुलची आठवण, आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का?
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
Embed widget