एक्स्प्लोर

Avinash Jadhav Resignation: राज ठाकरेंनी एक फोन फिरवला अन् अविनाश जाधवांना पुन्हा कामाला लावलं, म्हणाले....

Raj Thackeray & Avinash Jadhav: राज ठाकरे यांनी जाधव यांना राजीनामा मागे घ्यायला सांगितला आहे. त्यामुळे अविनाश जाधव हे मनसेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी कायम राहणार आहेत.

मुंबई: विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) निराशाजनक कामगिरीनंतर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणाऱ्या अविनाश जाधव यांना राज ठाकरे यांनी पुन्हा कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी मनसेच्या (MNS) पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी याबाबतचे पत्र मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पाठवले होते. मात्र, यानंतर अवघ्या 24 तासांमध्ये अविनाश जाधव यांनी आपण राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. राज ठाकरे यांच्या आदेशाने मी पुन्हा जिल्ह्याध्यपदाचा कार्यभार स्वीकारत असल्याचे अविनाश जाधव यांनी म्हटले होते.

अविनाश जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. मी तुझा राजीनामा अमान्य केला आहे, ठाणे आणि पालघरची जबाबदारी मी तुला दिली आहे, पुन्हा स्वीकार आणि कामाला लाग, असे राज ठाकरे यांनी जाधव यांना सांगितले. त्यामुळे आता अविनाश जाधव यांनी पदभार स्वीकारुन पुन्हा कामाला सुरुवात केली आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेने जवळपास 128 जागांवर उभे केले होते. मात्र, एकाही जागेवर मनसेचा उमेदवार विजयी झाला नव्हता. ठाणे जिल्ह्यात अविनाश जाधव यांच्यासह मनसेचे 12 उमेदवार पराभूत झाले होते. ठाणे विधानसभा मतदारसंघात अविनाश जाधव हे भाजपच्या संजय केळकर यांना कडवी टक्कर देतील, अशी चर्चा होती. मात्र, संजय केळकर यांनी ठाण्यातून पुन्हा एकदा सहजपणे विजय प्राप्त केला. दरम्यान, विधानसभेतील पराभवानंतर मनसेचे पालघर विक्रमगढ तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांनी अविनाश जाधव यांच्यावर गंभीर आरोप केला होता. निवडणूक काळात जाधव यांनी पालघरमधील उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांना सहकार्य केले नाही, अशी तक्रार योगेश पाटील यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली होती. पक्षातील या अंतर्गत कुरबुरींमुळे अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, आता जाधव यांनी राजीनामा मागे घेतला. यावरुन आता आरोप होत आहेत. अविनाश जाधव यांनीच हे औटघटकेचे राजीनामानाट्य घडवल्याचा आरोपही केला जात आहे.

अविनाश जाधव राजीनामा देताना काय म्हणाले?

विधानसभा निवडणुकीत ठाणे व पालघर येथे पराभवाची जबाबदारी घेऊन मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. काम करताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असल्यास आपण मला माफ करावे, असे अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते.  

आणखी वाचा

अविनाश जाधव यांनी राजीनामा का दिला?; बाळा नांदगावकरांनी सांगितलं कारण, पालघरमधील अंतर्गत वादावरही बोलले!

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: राम मंदिर लुटारूंना अब हिंदू माफ नहीं करेगा; 5 जुलैला दादरमध्ये 'रामरक्षा' आंदोलन, उद्धव ठाकरेंनी भाजपविरोधात रणशिंग फुंकलं!
राम मंदिर लुटारूंना अब हिंदू माफ नहीं करेगा; 5 जुलैला दादरमध्ये 'रामरक्षा' आंदोलन, उद्धव ठाकरेंनी भाजपविरोधात रणशिंग फुंकलं!
Uddhav Thackeray: राम मंदिरावर दरोडा टाकला, भाजप राम मंदिराचं ऑपरेशन करतंय का? चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
राम मंदिरावर दरोडा टाकला, भाजप राम मंदिराचं ऑपरेशन करतंय का? चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Shivsena Leader Death: ताप आल्यानं रात्री उपचारांसाठी दाखल केलं; सकाळी शिवसैनिकाचा मृत्यू; विक्रोळीतील घटना, रुग्णालयात काय घडलं?, सुनील राऊतांसह सगळे जमले
ताप आल्यानं रात्री उपचारांसाठी दाखल केलं; सकाळी शिवसैनिकाचा मृत्यू; विक्रोळीतील घटना, रुग्णालयात काय घडलं?, सुनील राऊतांसह सगळे जमले

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: राम मंदिरावर दरोडा टाकला, भाजप राम मंदिराचं ऑपरेशन करतंय का? चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
राम मंदिरावर दरोडा टाकला, भाजप राम मंदिराचं ऑपरेशन करतंय का? चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case: केतन अग्रवाल प्रकरणात बीडमधील तरुणाची एन्ट्री; लोहगडावरुन ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतन पहिले त्याला भेटले-बोलले!
केतन अग्रवाल प्रकरणात बीडमधील तरुणाची एन्ट्री; लोहगडावरुन ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतन पहिले त्याला भेटले-बोलले!
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
Hind Al-Abbasi Viral News: सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
Kolhapur Rain Update: पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 24 तासात 13 फुटांनी वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 24 तासात 13 फुटांनी वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली
Cristiano Ronaldo : डोळ्यात पाणी, आकाशाकडे बोट अन् 7 ऐवजी घातली 'ती' 21 नंबरची जर्सी... रोनाल्डो अचानक भर मैदानात लागला रडू, सगळे हैराण, पाहा Video
डोळ्यात पाणी, आकाशाकडे बोट अन् 7 ऐवजी घातली 'ती' 21 नंबरची जर्सी... रोनाल्डो अचानक भर मैदानात लागला रडू, सगळे हैराण, पाहा Video
Maharashtra Rain: पाऊस धुव्वाधार, मात्र राज्यातील जलसाठ्यात अत्यल्प वाढ; मुंबईतील तलावक्षेत्रात गेल्या 24 तासात जलसाठा केवळ 0.81 टक्केच वाढला, वाचा कुठे काय परिस्थिती
पाऊस धुव्वाधार, मात्र राज्यातील जलसाठ्यात अत्यल्प वाढ; मुंबईतील तलावक्षेत्रात गेल्या 24 तासात जलसाठा केवळ 0.81 टक्केच वाढला, वाचा कुठे काय परिस्थिती
Embed widget