एक्स्प्लोर

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांनी राजीनामा का दिला?; बाळा नांदगावकरांनी सांगितलं कारण, पालघरमधील अंतर्गत वादावरही बोलले!

Bala Nandgaonkar On Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्या या राजीनाम्यावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

Bala Nandgaonkar On Avinash Jadhav: मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी विधानसभेत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पत्र लिहित अविनाश जाधव यांनी काल ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 

अविनाश जाधव यांच्या या राजीनाम्यावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठीक आहे चांगली गोष्ट आहे. अविनाश जाधव एक चांगला कार्यकर्ता आहे. पराभव त्याच्या मनाला लागला असेल म्हणून त्यांनी राजीनामा दिला आहे.  यावर पक्षप्रमुख विचार करतील काय करायचं?, असं बाळा नांदगावकरानी स्पष्ट केलं. दरम्यान बाळा नांदगावकरांना देखील शिवडीमधून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवावर त्यांना विचारले असता निवडणूक लढत नाही मी खेळत असतो. खेळात विजय-पराभव होत असतो.  लोकांमध्ये जाऊन प्रामाणिकपणे काम करायचे, ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करायचे...थांबायचं नाही, थकायचे नाही, जोरात कामाला लागायचं, असं बाळा नांदगावकर म्हणाले. 

पालघमधील मनसेतील वादावर बाळा नांदगावकर काय म्हणाले?

पालघमधील मनसेतील वादावर बाळा नांदगावकरांना विचारले असता मला विषय माहिती नाही तर मी काय बोलणार...आपल्या कुटुंबामध्ये असं भांडण होणं चांगलं नाही. एकमेकांशी भांडण करून काय होणार आहे. आपल्याला लोकांसाठी काम करायचे आहे, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितले. 

पालघरमध्ये मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर-

अविनाश जाधव यांनी राजीनामा देताच पालघरमध्ये मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांना जबर मारहाण करत त्यांचे बंधू आतिश मोरे यांच्यावर पंधरा ते वीस मद्यधुंद अवस्थेत असलेल्या गावगुंडानी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला असून हा हल्ला ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केल्याचा आरोप मोरे कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. अविनाश जाधव यांनी याबाबत अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 

नेमकं प्रकरण काय?

दरम्यान पालघर मधील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आज राज ठाकरेंची भेट घेऊन पराभवाची कारण सांगितली . यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी निवडणूक काळात दिलेली जबाबदारी पार पाडली नसल्याची तक्रार काही मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना केल्यानंतर राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांची कानउघाडणी केली आणि हाच राग मनात धरून अविनाश जाधव यांनी हा हल्ला केल्याचं मोरे यांच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात येते.

संबंधित बातमी:

Eknath Shinde Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला जाण्याची शक्यता; शपथविधीआधी राजकीय हालचाली वाढणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 All Candidate List: 10 जागा, 10 उमेदवार...भाजपपासून, शिवसेना, राष्ट्रवादीपर्यंत..., विधान परिषदेच्या उमेदवारांची संपूर्ण यादी!
10 जागा, 10 उमेदवार, भाजपपासून, शिवसेना, राष्ट्रवादीपर्यंत...,विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी
Harshwardhan Sapkal On Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी काँग्रेस उमेदवार जाहीर करणार; अंबादास दानवेंची आमदारकी धोक्यात?, निवडणुकीत ट्विस्ट
विधान परिषदेसाठी काँग्रेस उमेदवार जाहीर करणार; अंबादास दानवेंची आमदारकी धोक्यात?, निवडणुकीत ट्विस्ट
NCP Vidhan Parishad : राष्ट्रवादीचा विधानपरिषदेसाठी उमेदवार ठरला; माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना दिली संधी
राष्ट्रवादीचा विधानपरिषदेसाठी उमेदवार ठरला; माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना दिली संधी
Bacchu Kadu On Vidhan Parishad Election 2026: बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता; विधान परिषदेआधी मोठी घडामोड, प्रहार जनशक्ती संघटनेचं काय?
मोठी बातमी: बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता; विधान परिषदेआधी मोठी घडामोड, प्रहार जनशक्ती संघटनेचं काय?

व्हिडीओ

Uday Samant On Bachchu Kadu : कडू शिवसेनेत दाखल होतायत ही आनंदाची गोष्ट- सामंत
Bachchu Kadu Will Join Shiv Sena : मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय, कडूंच ठरलं
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरु; कसा असेल मार्ग आणि वैशिष्ट्ये काय
जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरु; कसा असेल मार्ग आणि वैशिष्ट्ये काय
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंकडून अधिकचा उमेदवार देण्याची हूल अन् उबाठाची बत्तीगुल; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका, म्हणाल्या, 'मविआचे भविष्य...'
एकनाथ शिंदेंकडून अधिकचा उमेदवार देण्याची हूल अन् उबाठाची बत्तीगुल; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका, म्हणाल्या, 'मविआचे भविष्य...'
Donald Trump: 'ट्रम्पचं डोकं ठिकाणावर आहे असं वाटतं का?' थेट खासदाराने खोचक सवाल करताच संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं भूवया उंचावल्या!
'ट्रम्पचं डोकं ठिकाणावर आहे असं वाटतं का?' थेट खासदाराने खोचक सवाल करताच संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं भूवया उंचावल्या!
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल
एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग लागून अल्पवयीन मुलीसह 5 जण जिवंत जळाले; फक्त हाडं सापडली, मुलाची नोकरीची इच्छा पूर्ण झाली म्हणून गेले होते वैष्णो देवीच्या दर्शनाला
एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग लागून अल्पवयीन मुलीसह 5 जण जिवंत जळाले; फक्त हाडं सापडली, मुलाची नोकरीची इच्छा पूर्ण झाली म्हणून गेले होते वैष्णो देवीच्या दर्शनाला
राष्ट्रीय महामार्गावर शंभरीच्या स्पीडने सुसाट, टायर फुटताच पिकअप पलटीवर पलटी मारत दुभाजकाच्या पल्याड जात समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओवर धडकला; तब्बल 16 जणांचा करुण अंत
राष्ट्रीय महामार्गावर शंभरीच्या स्पीडने सुसाट, टायर फुटताच पिकअप पलटीवर पलटी मारत दुभाजकाच्या पल्याड जात समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओवर धडकला; तब्बल 16 जणांचा करुण अंत
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Mankhurd Traffic Jam : 15 मिनिटांच्या अंतरासाठी 5-6 तास वाहतूक कोंडी, मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर प्रवाशांचे अतोनात हाल, पाणी नाही, टॉयलेट, बाथरूम नाही; सोशल मिडीयावर नागरिकांचा संताप
15 मिनिटांच्या अंतरासाठी 5-6 तास वाहतूक कोंडी, मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर प्रवाशांचे अतोनात हाल, पाणी नाही, टॉयलेट, बाथरूम नाही; सोशल मिडीयावर नागरिकांचा संताप
Embed widget