Anjali Damania On Suresh Dhas: धनंजय मुंडे अन् सुरेश धसांची भेट; अंजली दमानिया कडाडल्या, म्हणाल्या, मी हे धनंजय देशमुखांनाही सांगितलेलं!
Anjali Damania On Suresh Dhas: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे.

Anjali Damania On Suresh Dhas: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Murder Case) आणि बीड जिल्ह्यातील दहशतीवरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गेले काही दिवस सातत्याने जोरदार हल्लाबोल करणारे भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) हे मुंडे यांना भेटल्याचे समोर आल्याने राजकीय वादळ निर्माण झाले आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी देखील सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे.
अंजली दमानिया एक्सवर पोस्ट करत म्हणाले की, खूप खूप खूप राग येतोय. किळस येतेय या राजकारणाची. एका सामान्य माणसाचा इतका क्रूर मृत्यू होतो तरी हे फक्त राजकारण करणार?, मी बीडला गेल्यापासून मी कधीही सुरेश धस यांच्या बरोबर मोर्च्यात गेले नाही. मला खात्री होती की हे कधीही पलटतील. मी हे धनंजय देशमुख यांना देखील म्हटले होते, असं अंजली दमानिया म्हणाल्या. तसेच आज प्रश्न पडतो की सुरेश धस यांना हृदय आहे की नाही? धसांचे पाय कसे चालले? कसे गेले ते धनंजय मुंडेंची भेट घ्यायला? एका कुटुंबाला न्याय मिळवून देणार होता ना? इतके निर्दयी कसे हे राजकारणी?, इतक्या मोर्च्यांमध्ये गेलात, इतके डायलॉग मारले ते फक्त नाटक होते?, असा सवालही अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.
खूप खूप खूप राग येतोय. किळस येतेय या राजकारणाची. एका सामान्य माणसाचा इतका क्रूर मृत्यू होतो तरी हे फक्त राजकारण करणार?
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 14, 2025
मी बीडला गेल्यापासून मी कधीही सुरेश धस यांच्या बरोबर मोर्च्यात गेले नाही. मला खात्री होती की हे कधीही पालटतील. मी हे धनंजय देशमुख ह्यांना देखील म्हटले होते.…
आता सगळ्यांवरचा विश्वास संपला- अंजली दमानिया
आता सगळ्यांवरचा विश्वास संपला. आता आम्हाला फक्त फॅक्ट्स पाहिजे. जे पोलीस तानाजी सावंत यांच्यासाठी पत्रकार परिषद घेतात, पुण्याच्या पोर्शे प्रकरणात पत्रकार परिषद घेतात, ते इतक्या क्रूर हत्येत का पत्रकार परिषद घेऊन माहिती देत नाहीत?, असा सवालही अंजली दमानिया यांनी उपस्थित केला. तसेच जे 2 मोबाईल स्कॉर्पिओ गाडीत सापडले त्याचा डाटा अजून रिकव्हर झाला की नाही, ते जाहीर करा, असंही दमानिया यांनी म्हटलं आहे. जून महिन्यात अवादा कंपनीचे लोकं, सातपुडा या शासकीय बंगल्यात गेले होते की नाही? त्यांची टॉवर लोकेशन काढा...तर सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांच्या आवाजाचे नमुने जुळले का?, असा प्रश्नही अंजली दमानिया यांनी विचारला आहे.
धनंजय मुंडे, सुरेश धस... दोनदा भेटले, प्रकरण मिटले?, VIDEO:
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
