एक्स्प्लोर

Palghar: हुतात्मा दिनी पालघरवासियांकडून अभिवादन; पालघरमधील पाच हुतात्म्यांना वाहिली आदरांजली

14 August 1942 Hutatma Din Palghar: 14 ऑगस्ट हा दिवस पालघरमध्ये हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो.

पालघर: 14 ऑगस्ट 1942 रोजी इंग्रजांविरोधात चाले जाव आंदोलन करणाऱ्या क्रांतिकारांवर पालघर येथे गोळीबार करण्यात आला होता. 'चले जाव' चळवळीत पालघर (Palghar) तालुक्यातील पाच स्वातंत्र्य सैनिकांना (Freedom Fighters) हौतात्म्य प्राप्त झालं होतं. त्यामुळे 14 ऑगस्ट हा दिवस पालघरमध्ये 'हुतात्मा दिन' म्हणून पाळण्यात येतो. त्यानिमित्ताने आज पालघर येथे मोठ्या उत्साहात हुतात्मा दिन साजरा करण्यात आला.

पालघर शहरातील हुतात्मा चौकातील हुतात्मा स्तंभ येथे विद्यार्थी, नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. 14 ऑगस्ट 1942 रोजी इंग्रजांविरोधात पुकारण्यात आलेल्या आंदोलनातील गोळीबारात पालघरमधील गोविंद गणेश ठाकूर, सातपाटी येथील येथील काशिनाथ हरी  पागधरे, पालघर येथील रामप्रसाद भीमाशंकर तिवारी, मुरबे येथील रामचंद्र महादेव चुरी, सालवड येथील सुकुर गोविंद मोरे या पाच स्वातंत्र्यसैनिकांना हौतात्म्य प्राप्त झालं. त्या दिवसापासून 14 ऑगस्ट हा पालघरमध्ये 'हुतात्मा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी पालघरमधील बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात येतात, कडकडीत बंद पाळून हा दिवस साजरा केला जातो. सदर घटनास्थळी उभारण्यात आलेल्या बत्ती येथे श्रद्धांजली वाहिली जाते.

पालघरचा इतिहास

1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर महाराष्ट्राचा 36वा जिल्हा बनला. जव्हार, वसई आणि पालघरला ऐतिहासिक वारसा आहे. वसई (तेव्हा बसीन म्हणून ओळखलं जायचं) पोर्तुगीज साम्राज्याच्या अंतर्गत होतं. चिमाजी अप्पा, मराठा सैन्याने पोर्तुगीजांकडून वसई किल्ला काबीज केला आणि वसईवर मराठा ध्वज फडकवला. 1942 मधील चले जाओ चळवळीत पालघर हा एक महत्त्वाचा मुद्दा होता.

14 ऑगस्ट 1942 रोजी पालघरमध्ये इंग्रजांविरुद्ध उठाव झाला, त्यात काशिनाथ हरी पगधरे, गोविंद गणेश ठाकूर, रामप्रसाद भीमाशंकर तिवारी, रामचंद्र महादेव चुरी आणि गोविंद सुकुर मोरे यांना हौतात्म्य मिळालं. पालघरचे मुख्य मंडळ या शहिदांच्या सन्मानार्थ "पाचबत्ती" (मराठीत 'पाच दिवे') म्हणून ओळखलं जातं. 14 ऑगस्ट पालघरमध्ये "हुतात्मा दिन" म्हणून घोषित करण्यात आला आहे. यादिवशी पालघरचे नागरित पाचबत्ती चौफुलीवर जमतात आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या पाच हुतात्म्यांनी आदरांजली वाहतात.

14 ऑगस्टला प्रत्येक वर्षी संपूर्ण तालुक्यातून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मंडळी, व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, लोक प्रतिनिधी, सरकारी अधिकारी हजारोंच्या संख्येने तहसील कार्यालयापासून मूक मिरवणूक काढून आदरांजली वाहण्यासाठी पालघरच्या हुतात्मा चौकात उपस्थित राहतात. हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्याचा पहिला मान स्वातंत्र्यसैनिक अथवा त्यांच्या पत्नी वा कुटुबियांचा असतो. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Independence Day: भारताव्यतिरिक्त कोणते देश 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतात?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीतAiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणारABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 07 July 2024Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget